गुजराती साहित्याचा इतिहास
गुजराती साहित्याचा इतिहास
लेखक मनसुखलाल झव्हेरी
अनुवादक जयंत र, जोल्ली
चूल
स्राव्हेत्य अव्हादेमी, नवी दिल्ली
टघाबचया ऊवा २३ रचा गुजराती साहित्याचा एतिहास ) : ऐशा) 808181 ७४. ४४ ]ठडाा 0: णवाडपाता19 11९९७१5 अगा ठिबकत यॉलवाधयाट, 59011१8. ताणा, [बठण७/ 126111 (1984) एलटद २७. : 35-00
(ल साहित्य अकादेमी
प्रथमावृत्ती : १९८४
प्रकाशक :
साहित्य अकादेमी,
रवीन्द्र भवन, फिरोजणाष्ठ रोड, नवी दिल्ली ११०००१
प्रादेशिक कार्यालये :
रवीन्द्र सरोवर स्टेडियम, ब्लॉक ५ बी, कलकता.७०० ०२५९
२९, एलडाम्स रोड, तेनाम पेठ, मद्रास ६०० ०१८
१७२, मुं. म. ग्र. सं. मार्ग, दादर, मुंबई ४०० ०११४
मुद्रक :
प्रदीप मुनोत
प्रभात प्रिटिंग वक््सं,
४२७ गुलटेकडी, पुणे ४११ ०३७
किंमत : ३५ रुपये
प्रस्तावना
साहित्य अकादमीने ठरविल्याप्रमाणे हा इतिहास गुजराती' साहित्य प्रत्यक्ष न जाणणाऱ्या वाचकांसाठी लिहिलेला आहे. म्हणून मी असा प्रयत्त केला आहे की, हा इतिहास गुजराती लेखकांच्या नावाची केवळ जंत्री होऊ नये व त्या बरोबरच अनावश्यक तपशील अथवा दीर्घ साहित्यसमीक्षा ह्थांनाही येथे वाव असू नये. गुजराती साहित्यातील सर्वसामान्य अशा गोष्टीच मी येथे नमूद केल्या आहेत. वादग्रस्त मुद्दे आवर्जून टाळले भाहेत. गुजराती साहित्याशी खूप परिचित अशा बहुश्रुत पंडितांताच केवळ आवडेल अशा गोष्टीही येथे समाविष्ट केल्या नाहीत. म्हणूनच वल्लभाने लिहिलेल्या आख्यानावर आधारित अणा प्रेमानंदांच्या जीवता- वरील गोष्टी येथे वाचकांना आढळणार नाहीत'. कारण त्याचे भस्तित्वच वादग्रस्त आहे. तसेच मध्ययुगीन कवींच्या निश्चित समयाबद्दल'चा वादही 'वाचकांना हचात आढळणार नाही. तसेच नरसिह मेंहताच्या मनात भक्तींची ज्वाला कशी एकदम प्रकट झाली अशा विषयांचीही हृघात चर्चा केलेली नाही.
येथे सवं गुजराती लेखकांचे साहित्याच्या दृष्टीनेच मूल्यमापन केले आहे. त्यात इतर बाबी उदाह्रणार्थ- नात, धम, संप्रदाय, स्ती अथवा पुरुष ह्यांना नराही महत्त्व दिलेले नाही.
हे लेखन करीत असताना माझ्या दृष्टीपुढे असा वाचक आहे कौ, जो गुजराती भाषा न जाणणारा पण ज्याला -उच्च प्रकारच्या साहित्याची व सांस्कृतिक बाबींची अभिरुची आहे. तो भारतीय असो किंवा परदेशस्थ असो; पण ज्याला गुजराती साहित्याची प्रगती व विकास पहिल्यापासून ते आजपर्यंत कसा होत गेला याची सर्वसाधारणपणे माहिती करूत घेण्याची इच्छा आहें अशा वाचकांसाठीच हा इतिहास लिहिला आहे. १९५५ नंतरच्या साहित्यातील मात्र मुख्य प्रवाहू व लक्षणे देण्याचा मी प्रयत्त केला आहे कारण ते साहित्य अद्याप नवीन आहे. व विकसित
होत आहें म्हणून त्याबद्दल सध्या फार खोलवर जाऊन ठाम विधाने' करणें अनुचित' होईल.
हे पुस्तक लिहिताना माझ्या आधी प्रसिद्ध झालेले लेखक, पुस्तके, साहित्याचे स्वरूप व प्रवाह हया विषयांवरील लेखांचा मी खूप उपयोग केला आहेव मी
दोन
डॉ. रमणलाल सी. शाह हयांच्या सहयोगाने लिहिळेल्या गुजराती. भाषेतील माझ्या हैत ठप ल 3ाठ ताडण ० जहा 1,७४७ (गुजराती साहित्याच्या इतिहासाची रूपरेखो) ह्या पुस्तकाचाही उपयोग केला आहे.
त्याशिवाय मुख्यत्वे के. एम. झव्हेरी, के. एम. मुनशी, अनंतराय रावळ, धीरुभाई ठाकर, सुंदरम, जयंत पाठक, रघुवीर चौधरी, अनिरूद्ध प्रह्माभटू, उशनस् आणि चंद्रकांत टोपीवाला व इतर लेखकांच्या पुस्तकांचा मी फार मोठा आधार घेतलेला आहें व त्याबद्दल मी त्यांचा फार क्रणी आहे.
ह्याशिवाय प्रो. अनंतराय रावळ, डॉ. चिमणलाल त्रिवेदी, श्री. मुऊुंद पाराशर्य, डॉ. भोगीलाल सांडेसरा आणि डॉ. सुरेश' दलाल ह्यांनी काही विशिष्ट मुद्द्यावर मला महत्त्वाची जी माहिती पुरवली त्याबद्दल मी त्यांचा फार त्ररणी आहे.
तसे'च प्रोफेसर विष्णुप्रसाद त्रिवेदी आणि श्री गुळाबदास त्रोकर हृद्यांनी पुस्तक वाचून मला ज्या बहुमोलाच्या सूचना दिल्या त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे.
तसे'च साहित्य अकादेमीने हे पुस्तक लिहिण्याचे काम माझ्यावर विश्एबास- पूवक सोपविले-ज्याला मी माझा बहुमान समजतो-ऱत्याबद्दल व पुस्तकाची हस्त- लिखित प्रत सोप्वण्यास मला विलंब लागला तरी तो चालवून घेतल्याबद्दल मी साहित्य अकादेमीचा फार आभारी आहे.
ज्या ठिकाणी खास निर्देश केलेला नसेल अक्या सवं गुजराती अवतरणांचा अनुवाद (छा्ठा!$1 मध्ये) मीच केलेला आहें.
४ ऑगस्ट १९७६ -मनसुखलाल एव्हेरी
प्रकरण
अनुक्रमणिका
सामास्य पाएवंभूमि
जुने साहित्य
मध्ययुगीन गुजराती साहित्य- १५ वे' शतक सोळावे' शतक
सतरावे' शतक
अठरावे' शतक
अठरावे' शतक ते एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध एकोणिसावे शतक : समा*्तर वाडमथीन प्रवाह १८५० ते १ट८५ चा क्रालखंड'
विसावे' शतक
पुरवणी- ९
पुरवणी-२
परिशिष्ट अ,ब, क, ड, इ, फ, ग, ह, ळ संदर्भ ग्रंथांची सूची'
सुची
१७८
२९्डॅ
३०६ ११५ ३११७
प्रकरण पहिले
सामान्य पार्श्वभूमि
[१]
गुज'रात' हा प्राचीन देण आहें. गुजरातच्या चतुःसीमा मात्र काल व परिस्थितीच्या भ्रभावाने अनेकदा बदलत गेल्या आहेत. अखेरीस १ मे १९६० ह्या दिवशी' स्वतंत्र संयुक्त भारतातील एक घटक प्रदेश म्हणून सध्याचा गुजरात' स्वायत्त व स्थिर प्रदेश झाला. त्याच्या सीमा अशा आहेत- उत्तरेस मारवाड, मेवाड, सिरोही, कच्छचे रण, आणि' आवू आररासुर, तारंगा ह्या टेकड्या व साबरकाठ. दक्षिणेस ठाणे जिल्हा, प्शचिमेस अरबी समुद्र, खंब्रायव ब कच्छचे आखात आणि पूवस सातपुडा प्वेत व पश्चिम घाट. त्याचे काही भाग समुद्रापासून शंभर मेलापेक्षा अधिक दूर आहेत.
सध्याच्या गुजरातचे मुख्य तीन विभाग पडतात. १) कच्छ २) सौराष्ट्र व ३) गुजरात या नावाने प्रसिद्ध असलेला विभाग. या विभागात कच्छ हे ताव फार प्राचीन काळापासून मशहूर आहे. सौराष्ट्र हे नावही' प्राचीनच आहे. मध्यंतरी' थोडा काळ ते काठेवाड ह्या नावाने ओळखले जात होते. संपूर्ण गुजरातला दुसरे कोणतेही' नाव दिलेले नव्हते. गुजरातच्या काही' छोट्या-मोठ्या विभागांना आनते, लाट, शूर्पीरक, अनूप आणि अप'रान्स अशा संज्ञा मिळालेल्या होत्या. इसवी' सनाच्या पोचव्या शतकात गुर्जरांच्या शासनकालात शक नावाच्या टोळीने भारतात प्रवेश' करून सहाव्या शतकाच्या शऐवटी पश्चिम राजस्थान व सध्या ज्यास' उत्तर गुजरात भ्हणतात तो प्रदेश जिकून घेतला. त्यावेळेपासुन हा प्रदेश गुर्जरात्र, गुज्जराष्ट्र किवा गुर्जर देण ह्या नावाने ओळखला जाऊ लागला. ८ व्या शतकात आलेल्या अरब प्रवाशांनी त्याचा उच्चार 'झर', 'गुझरा' असा केला व त्यातूनच 'गुझरात' व नंतर गुजरात? असा उच्चार दहाव्या शतकात रूढ झाला.
गुजराती" हे ह्या प्रदेणाच्या भाषेचे नाव पक्के होण्यासाठी जवळ जवळ ५०० चर्षे लागली. नर्रासह मेहता आपल्या भाषेस 'अफभ्रंश गिरा! असे संबोधतो.
२ ! गुजराती साहित्याचा इतिहास
पद्मनाथ ' प्राकृत ' म्हणतो. भालण अपभ्रंश अथबा गुर्जर 'भापा असे उल्छेगितो. 'गुजराती' असे नामाभिधान प्रथम येते ते प्रेगानंद (१६२६-१७३४) छाया गध्यसूगीन महान कवीच्या लेखनातून आणि १७३१ मध्ये आलेल्या ला क्रॉस (1.8 (10५6) नावाच्या जर्मन प्रवाशाच्या ,लेखनातून-गुजराती ही राध्या दोन कोटी लोकांची बोलीभाषा आहें व त्यामध्ये हिंदु, मुसळमान, पारसी आणि स्त्रिशचन धर्माचे ळोता आहित. गुजराती भाषेच्या उच्चारात गात्र निरनिराळ्या विभागात, प्रांतात, जिल्ह्यात कमी अधिक तफावत आढळते. तसेच मेर, दुबळा, चोधरा, बारेया, भिल्ल इ. निरनिराळ्या जाती-जमातीमध्येही उच्चारणभेद आढळतो एवढेच. व्यवसायाच्या लोकातही वाक्यरचना व शब्दावली ह्यात खूप 'मेद असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे गुजरातीस विविध उपभापा आहेत हे ही स्पष्ट होते. अहमदाबाद व आसपाराच्या मोठ्या शहरातील उच्चवर्णीय व शिक्षित लोक जी भाषा बोलतात व लिहितात ती णुद्ध गुजराती भाषा समजली जाते, पण प्रादेशिक व सामाजिक परिस्थिती- प्रमाणे तिची निरनिराळी रूपे दिसतात.
[२]
सोळाव्या शतकापयंत गुजरात व पश्चिम राजस्थानात एकच भाषा होती. अर्थात दोन्ही विभागातील बोलीभाषेत काही फरक होते. त्या भापेला डॉ. टेसी ठोरी ' जुनी पश्चिम राजस्थानी ' असे नाव देतो. नरसिहराव दिवेटिया तिला ' अन्तिम अपभ्रंश' असे म्हणतात तर डॉ. उमाशंकर जोणी गुजरात व मारवाड (मारु) मध्ये एकच भाषा होती हें भारपूर्वक दर्शविण्यासाठी तिचे ' मारुगुर्जर * हे नामकरणच उपयोगात आणतात.
प्राकृत व्याकरणकार भाकडेय ह्याने आपल्या ' प्राकृत गर्बस्ब ' नागवा ग्रंथात वणिळेल्या अपभ्रंशाच्या २७ प्रकारातील गौर्जरी ह्या उपभापेतुन हो भाषा विकास पावलेली असावी असे वाटते. गुजरात व लाट ह्या प्रदेशातील लोकांच्या 'गापेचा जुन्यातील जुना उल्लेख इ. स. ७टट मध्ये उद्योतनसूरीने' लिहीळेल्या ' तुवयगाला ! ह्या ग्रंथात आढळतो. त्यानंतरचा उल्लेख म्हणजे भोजाच्या ' सरस्वती कंठाभरण ' या (इ. स. १०००) व्या सुमाराच्या ग्रंथातील आहे. पण ह्या दोन्ही ग्रंथामुळे त्या काळच्या भाषेच्या प्रत्यक्ष स्वरूपावर मात्र जवळजवळ काहोच प्रकाण पडळेला नाही.
उत्तर व मध्य भारतातील मुख्य मुख्य भाषांप्रमाणे गुजराती भाषा इंडो-आर्यन भाषावंशातीलच आहे. तिचा उगम संस्कृत भाषेतून झोला ञाणि मग प्राकृत व अप'भ्नंश' ह्यांच्या प्रवाहातुन तिची उत्क्तांती होत आलेली दिसते. तिचा सर्वात जवळ'चा पूर्वज म्हणजे गौर्जर अपभ्रंश आहे आणि व्रज व राजस्थानी भापांचाही पुवेज गौजेर अव'भ्रंशच आहे. |
सामान्य पाश््वंभूमि:३
हेमचंद्राने (१०८८-११७२) आपल्या प्राकृत व्याकरणात उद्धृत केलेल्या काही अपभ्रंश दुह्याची भाषा म्हणजे अपभ्रंश भाषेची शेवट शेवटची अवस्था किवा गुजराती भापेची गर्भावस्था असे म्हणावयास हरकत नाही. .नरसिहराव दिवेटिया तिला अंतिम अपभ्रंश अथवा गुर्जर अपभ्रंग म्हणतात. हेमचंद्राने ह्या भाषेचे बारकाईने सविस्तर व्याकरण वणिलेले आहे. त्याने आपल्या प्रत्येक विधानाचे लोकांच्या बोलीभाषेतून व त्याकाळी लिहिलेल्या काव्यग्रंथातुत अतेक उदाहरणे देऊन समर्थन केले आहे. हेमचंद्राची अवतरणे म्हणजे जुन्यातळे जुने प्राचीन गुजरातीचे नमूने म्हणण्यास जराही प्रत्यवाय नाही.
अनेक पंडितांनी गुजराती भाषेची उत्क्रान्ति हेमचंद्रापासून थेट आधूनिक काळापयंत होत असळेली दाखविली आहें. तथापि गुजराती भाषेच्या विकासाचे मुख्य-मुख्य टप्पे समजण्यासाठी केशवलाल ध्रुव ह्यांनी सुचविलेले तीन कालखंड ध्यानात घेणे उचित होईल. ते कालखंड पुढीलप्रमाणे आहेत.
१) अपभ्रंश अथवा जुनी गुजराती १० व्या अथवा ११ व्या शतकापोसून ते. १४ व्या शतकाप्यंन,
२) मध्यकालीन गुजराती-१५ ते १७ वे' शतक.
३) अर्वाचीन गुजराती-१८ व्या परतकापासूनची. १
[३]
गुजराथी बोलींचे (१191805) मुख्य दोन भाग पडतात :
१) गिरिप्रदेशातील भाषा
२) मैदानी प्रदेशातील भापा
(१) गिरिप्रदेशातील बोली अनेक आहेत. त्यांना भिल्लो बोली असे म्हणतात. हया बोलीमध्ये प्रदेशांप्रमाणे व समूहाप्रमाणे खूप फरक आहेंत. सर जॉर्ज ग्रिअ्सनने अणा बोलीचे २२ प्रकार सोदाहरण वणिळे आहेंत.
(२) मंदानी प्रदेशातील बोलींचे मुख्य आठ वर्ग आहेत. सुरती, चरोतरी, पाटणी, (उत्तर गुजराती), झाळावाडी, गोहिलवाडी, सोरठी, हालारी व कच्छी, हया शिवाय-
अ) अनुसूचित जातीजमाती- उदा : मेर, चोंधरा, बारेया, नायक वगेरे.
ब) पारसी, बोहरा, खोजा, भरिया वगैरे जाती व धर्माचे लोक.
क) सोनार :- वगैरे धंदेवाईक लोक ह्यांच्या बोलीत एक विशिष्ट शब्दसमूह आहेत. ह्या .जातीजमाती, जनसमूह व धंदेवाईक लोक त्यांच्या विशिष्ट शब्दभांडारामुळे ;एकच प्रादेशिक बोली' असणाऱ्या इतर लोकांपेक्षा वेगळे ओळखू येतात.
४ : गुजराती साहित्याचा इतिहास
[४]
गुजराती लिपी देवनागरी लिपीसारखीच असली तरी' काही अक्षरात फरक आहे. उदाहरणार्थ पुढील स्वर - अ, आ, ह' ४, उ, ऊ, ब पुढील व्यंजगे- क् ख, वू, जू, झू, णू, दू, फू, हू आणि ळू शिवाय देवतागरीतीळ अक्षरांच्या शिरोरेखेलाही त्यांस वाव नाही. अनेक शतकापासून गुजरातीतून ल्, त्र आणि ष् ध्वनीही लोप पावले आहेत. संस्कृत तत्सम शब्दात मात्र ही अक्षरे येतात. निरनिराळया वेळी' दुसऱ्या भाषांशी झालेल्या संपर्कामुळे गुजरातीत काही नवीत ध्वनी रामाविष्ट झाले आहेत. उदा.- अर्धताल्व्य च्, छू, ज्, श् (मूर्धव्यतर) ड्, दृ.
तीन प्रकारची अतुनासिके (तीब्र)*, .(कोमल) 3, (कोमलतर)४ ब (वितृत) ९-अओ आणि ० (ञओ)*"*.
देवनागरी' लिपीतील काही उच्चार नि:संदिग्धपणे दाखविण्यास मार्गे नाही म्हणून ते ध्वनी' विशद करण्यासाठी त्यावर (भेददर्णक) चिन्ह वारण्यात येतात.
[५]
संस्कृत भाषेशी प्राणभूत व ऐतिहासिक दृष्ट्या सतत संबंध राहिल्याने गुजरातीत संस्कृतमधून कमी-जास्त परिवर्तन होऊन आलेले शब्द यांचा खूप' भरणा आहे. तसेच देश्य शब्दांचे प्रमाणही बरेच आहे. देश्य शब्द म्हणजे हुधा प्रांतात गुर्जर लोक व त्यांची गुर्जर भाषा' येण्यापुर्वी तेथे राहणाऱ्या लोकांच्या भाषेतील शब्द. भारतातील इतर भाषांतील शब्दांशी या देण्य शब्दांचे जराही साम्य' नाही,
तसेच गुजरातला १००० सैल लांब अशी समुद्रपट्टी लाभली असल्याने आणि तेथील लोकांचा इतर लोवांशी सांस्कृतिक, आथिक, व्यापारबिषभथव आणि राजकीय संबंध आल्याने गुजरातीने एका बाजूने हिंदी, बंगाली, गराठी, उर्घ सिंधी व' द्रविड भाषा ह्या भाषांतुन शब्द घेतले आहेत, तर दुराष्या बाजुने परशियन, अरबी, पोत्ंगीज, डच, फ़ेंच व इंग्रजी ह्या परदेशी गाषांतूनही शब्दाचा भरणा तीत झालेला. आहें. मुसलमानांचे राजकीय वर्चस्व असतानाच' गुजराती भाषेची' सुरवात (ब विकास) झाल्याने गुजराती भाषेत पारसी, अ'रबी शब्द प्रथमपासून समाविष्ट झालेले आहेंत,
इंग्रजी' भाषेने तर आपल्या प्रभावाने ह्या भाषेत मूलभूत फरक बारून तिचे स्वरूपच बदलून टाकले आहें. संप्रदाय, म्हणी, विरामचिन्हे व विशिष्ट वाबयरचता हे सवे तर आलेच पण इंग्रजीमुळे गुजरातीत (एताःहल एळाडप॥ाटाला) अपरोक्ष रचनाही आली.
सामान्य पार्श्वेभूमि: ५
[६]
जुनागडला गिरनारच्या पायथ्याशी मोठ्या शिलाखंडावर तीत शिलालेख कोरलेले आहेत. प्राचीन भारतातील तीन श्रेष्ठ राजवंशानी (त्यातील महान राजांनी) केलेल्या उत्तम कार्याची त्यामध्ये महत्त्वाची माहिती' मिळते. एका शिला- खंडावर मौर्य सम्राट अशोक ह्याने प्रसारित केलेले १४ आज्ञालेख (661०5) आहेत. दुसऱ्यावर क्षत्रप राजा रूददामन् ह्याचा जाहीरनामा आहें. व तिसऱ्यावर गुप्तसम्राट स्कंदगुप्त ह्याचे आदेश आहेत.
गुप्त राजवंशाचे वर्चस्व गुजरातेत ७० वर्षे होते. पण त्याच्या भागून आलेल्या मेत्रकांचाही' प्रभाव ह्या भूमीवर खूप वर्षे चालला. सौराष्ट्रात मेत्रक- कालाच्या ३० मंदिरांचा शोध लागलेला आहे. त्यावरून भारतीय वास्तुकलेबद्दल बरीच ऐतिहासिक सामुग्री मिळते. मैत्रकाच्या कारकीर्दीत सूर्योपासनेंचा फार प्रसार झाला. त्या काळची बरीच महृत्त्वाची' सूयमंदिरे गुजरातेत आहेत. रन्नादे-रांदेळ ह्या! सूर्यॅपत्तीची पुजा गुजरातेत अनेक ठिकाणी अजूनही प्रचलित आहे-
मैत्रकानंतर चापोकट, तंतर राष्ट्रकूट व त्यानंतर प्रतिहार असे' राजवंश गुजरातेत आले. ते गुजरात आपलाच देण आहे असे मानून येथील प्रजेशी एकरूप होऊन गेले. त्यानंतर चालुक्य अथवा सोलंकी ह्या नावाने' प्रसिद्ध असलेल्या लोकांती' व्यापार उद्योग खूप' वाढवून, समुद्रवाहतुक व राजकीय व्यवहार ह्यांचा अतुलनीय विकास करून गुजरातला वेभवाच्या शिखरावर नेऊन बसविले. त्यांच्याच काळात जैनधरमं व अहिसा गुजरातेत दृढमूल झाली'.
सोलंकीनंतर आलेल्या वाघेला सत्ताधीशांती' “गुजरातच्या शिल्पंकलेत' महत्त्वाची भर घातली. देलवाडा, आबू येथील , सोंदर्यसंपत्न भव्य संगमरवरी' भंदिरे ह्याच काळातील आहेत.
ह्या सर्वांप्रमाणे बाहेरून आलेल्या मुसलमान व पारशी लोकांनीही गुजरातळा आपँड्रा देश मात्तून येथे वास्तव्य केले.
'ह्या विविध धर्माच्या व विविध प्रकृतीच्या 'जाती-जमाती' येथे कायम रहिंबाशी झाल्याने व त्यांच्याशी घनिष्ट संपक आल्याने गुजराती, प्रजा अत्यंत सहनशील व भनमिळाऊ क्ाली' आहे. सूर्य, विष्णू, शिव, महावीर आणि त्यांच बरोबर पीर (मुसल्मानी' संत) हे सर्व व इतर अनेक देवदेवतांची पुजा गुजरातेत 'वालू आहे. येथे अनेक संप्रदाय, धर्मपीठे आपापल्या पद्धतीने सुखाने आपला धर्म पाळीत' आहेत. आंध्र प्रदेशातील वल्लभाचार्यांनी स्थापलेला पुष्टि संप्रदाय गुजरातेत' फारच महत्त्व पावला आहे. आणि अयोध्येच्या' सहजानंद स्वामीनी स्थापन केलेल्या स्वामिनारायण संप्रदायाते आपे मुख्य स्थात गुजरातेतच स्थापिले आहें.
६ : गुजराती ताहित्याचा इतिहास
हधुएनसांगने असे लिहून ठेवळे आहे की मैत्रकांचे बळी विद्यापीठ हि वैदिक, जैन आणि बौद्ध पंडितांचे घर्मांचे ब जानाने मोठे वेंब्र होते.
अर्थातच गुजरातची य अशी खारा वैशिष्टयपूर्ण शिल्पकला अथा स्थापत्सकला नसली' तरी इ. स. '५ व्या शतकापासून ते १३ व्या शतकापयंत श्रेष्ठ अरो ठरलेळे वास्तुकलेचे नमुने गुजरातगध्ये आहेत. उदा :- गोढेराचे सुर्यंगंदिर, सिव्व[ूरचे रुद्रमाळ आणि धृमली ब सेजवापुर येथळी नवळखीची मंदिरे एत्यादि गुजरातेतील उत्कृष्ट वास्तुकलेचे नमुने म्हणून प्ररिद्ध आहेत.
तेराव्या शतकात व त्यानंतर आलेल्या गुजरातगध्रील मुसलमान सुळतानांती कलावम्तांची खूप कदर करून त्यांना उदार आश्रय दिला, त्यांनी शिल्पशास्त्रात नवीनता आणली. मशिदी ब इतर मुराळगानी वास्तुशिल्पे ह्यागध्ये मनुष्य आणि प्राणी ह्यांच्याऐवजी सुंदर वृक्ष, लता, फुळे व भूगितीच्या आकर्षक आकृती' ह्याना स्थात मिळाले. अहमदाबाद येथील सिही सय्यद मणिदीतील एक कोरीव काम असलेली खिडकी शिल्पशास्त्राची एक अप्रतिम कृती म्हणून सार्या जगभर प्रसिद्धी पावली आहे' दिल्ली व आग्रा सेथीळ भोगल कालातील कोरीव कामापेक्षाही' अहभदाबाद येथील कोरीव कामें व रुशोभन काळा श्रेष्ठ आहेत असे मानले जाते.
भारतीय चित्रवाळेच्या उत्तमोत्तम परंपरांचे रक्षण गुजरातने केले आहे. १! व्या शतकापोसून विशिष्ट गुजराती चित्रकलेचे उत्कृष्ट नमुने ब तसेच मोगल व रजपूत चित्रकलेचे नमुने जैन हस्तलिखितांतुत आणि सिहोर, पांडरणिंगा व जामनगर ग्रेथील भित्तिचित्रांतुन रक्षण करून ठेवछेळे आहेत.
गुजरातचे असे विशिष्ट रांगीत नाही हे खरे पण भारतीय्र संगीताचा बृहुतूकोशच अशा ' संगीतरत्नाकर * ह्या ग्रंथात नमूद केलेल्या बाही रागांची नावे' उदा. :- गुर्जरी;, वेलावली (बिरावल), चावण, सौविरी', खंगावती, आहिरी, लाटी, सोरठी ही गुजरातमधील विणिष्ट भागावरून आळेली नावे आहेंत ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. विचित्रबीणा हे वाद्य-जे आजही बाजविले जाते ते अहमदाबादच्या जेसिगभाई नावाव्या संगीतकाराने शोधून काढले आहे. हायका, भोजक, तरगळे, गंधर्व, भी'र, लांधा इ. जातीचे लोकव हे असे आहेत बी ज्यांत्ती ओओफ्ले-सवे जीवन संगीत व नाटक ह्यांच्या विकासासाठी अर्पण वेळे आहे. आणि ते त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात.
रास, गरबी व लोकनृत्ये हा तर गुजरातचा परंपरागत वारसाच आहे. अर्थात रास हा एकट्या गुजरातचा सांस्कृतिक ठेवा नाही. तो प्रफार.थोड्या फार फरकाने भारतात इतर प्रांतातही चाळू आहे. पण सगळीकडून छिव्रे पाडलेला च' आंत मातीची पणती तेवत असळेला घडा डोक्यावर ठेऊन स्त्रियांनी केलेला 'गरबो हा नाच मात्र फक्त गुजरातचाच विशेष प्रकारचा नाच आहे.
सामान्य पाश्वंभूमि: ७
तळटिपा
१. (अ) तरसिहराव दिवेठियांच्या गुजराती भाषेच्या विकासाचा आलेख असा आहे. १) अप'भ्रंश- विक्रम संवत् ९५० पर्यंत. २) मध्य अपभ्रंश- विक्रम संवत् १३०० फ्यँत. ३) अंतिम अथवा गुजर अपभ्रंश (ज्याला डॉ. टेसीटोरी * 00 ०४५०९ 1२७1४७५५४1 ' म्हणतो) विक्रम संवत् १३०० पासून १५५० पर्यंत. ४) जुनी' गुजराती, विक्रम संवत् १५५० ते १६५०. ५) मध्ययुगीन गुजराती १६५० ते १७५० विक्रम संवत्. ६) अर्वाचीन गुजराती विक्रम संवत् १७५० पासून पुढ. (ब) श्री. केशवराम शास्त्रींनी दिळेला विकासाचा आलेख- १) गौर्ज॑र अपभ्रंश अथवा जूनी गुजराती- पहिला टप्पा : इ. स. ६ व्या शतकापासून ११ व्या शतकापर्यंत. दुसरा टप्पा: इ. स. १४ व्या शतकाचा पूर्वार्ध. २) गुर्जर भाषा अथवा मध्यकालीन गुजराती इ. स. १४व्या शतकाच्या उत्तरार्धापासूत १७ व्या शंतकाचा पूर्वार्ध. ३) अर्वाचीन गुजराती- पहिला टप्पा : १७ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून इ. स. १८२५ पर्यंत. दुसरा टप्पा : सध्याची चालू भाषा. २, पंकज, खंडेर, पंजो, गंध, डुंगर वगेरे प्रमाणे. ३. पांच, आंगळी, खांचो, खांड, आंधण वगेरे. ४, कई, दहीं, अहीं, सुंवाळुं वगेरे. ५, अ) असे, पॅसे, वॅर, पॅठो, बैठो वगरे. ब) गॉळ, मॉर, पाँक, काडी, कॉण वगेरे.
प्रकरण दुसरे
जुने साहित्य
[१]
हृ. स. ७४६ ते १२९८ च्या दरम्यान गुजरातेत रजपूत राजे राज्य वरीत असताना अनेक ब्राह्मणेतर कवींनी संस्कृत भागेत ग्रंथ रचले, पण १० व्या शतकापासून अपभ्रंश भाषा प्रचलित काली व तेव्हापासून दरबारी वावि लोबाभाषेतुन 'रास' लिहु लगले. ही भाषा म्हणजे मारवाडी, ब्रज व इनर देणी' भाषा ह्यांचे मिश्रणच होते हे ' रारा ' मुख्यत; आपापल्या आश्रयदात्यांची स्तुतिस्तोत्रेच असत. तत्कालीन जेत साधूही रास'१व फागु '* ह्या काव्यप्नकारात आपल्या थ्रीमंत निष्ठावंतांची स्तुृत्ति करीत' आणि आपल्या अनुयायांना धामिक व नैतिक शिक्षण देण्याचे कार्य करीत. हेमचंद्र- युगानंतरच्या व नरसिंह-युग सुरू होण्यापर्यंतच्या काळात असे ३०० किंवा थोडे अधिकच रास लिहिलेळे होते असे जेन पंडितांनी नमूद बोळे आहेत. साहित्यगुणाच्या दृष्टिने पाहूता ह्या रचता जरा वानिष्ठ प्रकारच्याच होत्या पण त्यांच्या प्रयत्नानी' भाषेची संपन्नता धर वाढ यांची दिशा सावध बर्याच प्रमाणात' दिसून येते.
आत्मज्ञानप्राप्तीसाठी दीक्षा घेऊन प्रपंचाचा संत्याश घेतलेल्या जैन साधुंधे' वर्चस्व 'ह्या काळात स्पप्टपणे दिसून येते. धर्म व नीतिचा उपदेश बारण्सासाठीच त्यांनी आपे जीवन समापित केले होते आणि त्यासाठी त्यांनी छ्या परप'रागत काव्य-प्रकारांचा आधार घेतला व जनमानसावर प्रभाव पाडला.
त्या काळच्या सर्वसाधारण ववीवर अशा प्रकारची बंधने नव्हती म्हणून त्मांनी' आपल्या काव्यात प्रेम व शौर्य ह्या, मनुष्यांच्या हृदयावर प्रणाव गाजविणाऱ्या दोन भावनांचे आपल्याकडून होईल तितके प्रभावीपणे वर्णन केले आहे.
संख्येच्या दृष्टीने' ह्या काळातील साहित्य-निर्मिती' खूपच मोठी' होती पण तिंचे' साहित्यिक भूल्य मात्र साधारणतः कमी प्रतीचेच होते.
इ. स. १२९७ ते. १४२० हा काळ गुजरातेत मुसलगानी' राजकीस वर्चस्वाचा होता. सवेत्र राजकीय आणि सामाजिक अस्थिरता व अस्वस्थता होती. म्ह्णून
जुत्ते साहित्य : ९
लेखकांना आपल्या कृतींचे रक्षण करण्यासाठी पाटण, जेसलभीर, खंबायत वगेरे ठिकाणच्या जैत भांडारांचा आधार घ्यावा लागला व तेथे त्यांची हस्तलिखिते बंदोबस्तात व सुरक्षित रहात असत.
मुनि जिनविजयजी हें मोठे विद्वान प्राच्यविद्यानिष्णांत व सशाधक पंडित होते. ते म्हणतात, “ जुन्या जेन भांडारांमध्ये सुरक्षितपणे सापडलेल्या गुजराती हस्तलिखितांची' संख्या फार भोठी आहे. तत्कालीन मराठी अथवा बंगाली हस्तलिखितांची' संख्या त्या मानाने थोडी' आहे. हेंमचंद्रापासुन प्रेमानंदापर्यंतच्या कालातील गुजराती हस्तलिखितांची यादी केल्यास एक फार मोठा ग्रंथ होईल. त्यामानाने आपल्या दुसऱ्या भाषाभगिनींच्या १४ व्या, १५ व्या, व १६ व्या शतका- तील चांगल्या साहित्यिक मूल्यांच्या ग्रंथांची संख्या फारच तुटपुंजी आहे. ही हस्त- लिखिते पद्य व गद्य दोन्हीत आहेत. जुन्या गुजरातीत गद्यरचना नाही हें म्हणणे असत्य आहे. “ मी' माझ्या वाचकांना शिफारस करतो की त्यांनी माझा गुजरात' विद्यापीठाने' प्रसिद्ध केलेला ' प्राचीन गुजराती गद्य संदर्भ' हा ग्रंथ पाहावा, त्या ग्रंथात संवत् १४११ मध्ये लिहिलेल्या ग्रंथातील काही कथा मी समाविष्ट केल्या आहेत. त्यांचा लेखक तरुणप्रभा होता. मी त्यातील काही नमुने, उध्दृत केळे आहेत. हे कथा वाडमय इतके मोठे आहे कौ ते समग्र छापावयाचे म्हटल्यास त्याचे गुजराती' प्रिटींग प्रेसच्या ' काव्यदोहन '? ह्या आकाराचे २०-२५ प्रंथ होतील.”
' भाषा आणि साहित्य या दृष्टीने पाहता जुनी' गुजराती' साहित्य-संपत्ती विपुल व वाखाणण्याजोगी' आहे. गुजरात ही अशी' एकच भूमि आहे की' जीत मौर्य अशोकापसून मोंगळ अकबरा ४ पयंतच्या आर्यावर्ताच्या भाषांची-प्रादेशिक बोलळीची- वाढ व विकास कसा होत गेला ह्याचा अभ्यास करण्याची फार मूल्यवान सामग्री आपणास उपलब्ध होते.”
[२]
हेमचंद्र १०८८-११७२
हेमचंद्र हा जैन साधु फार प्रतिभाशाली होता. त्याचे बहुश्रुतत्व व विहत्ता आजही' अतुलनीय वाटतात. त्याचा वैभवाचा काळ म्हणजे सिद्धराज व कुमारपाल 'ह्या' दोन श्रेष्ठ सोलंकी राजांची कारकीदे. ह्या दोन्ही राजषिनी हेमचंद्राच्या सुविचारी' व बुद्धिणाली' मार्गदर्शनाखाली गुजरातची' सांस्कृतिक प्रगति उच्च कोटीला पोहोचविली. हेमचंद्र हा स्वतः सर्जक लेखक नव्हता. पण आपल्या तीब्न बुद्धीने त्याने व्याकरण, भाषाशास्त्र व काव्यशास्त्र इ. विद्याणाखात विपूल तिमिती' केली, त्याने ' अनेकार्थसंग्रह', ' अभिधान चिंतामणि ' ' देशी' नाममाला,' हे सर्व कोशग्रंथ आणि ' छन्दोनुशासन,' व ' काव्यानुशासन,' हे काव्यग्रंथ लिहिले. त्याची'
१० ! गुणराती साहित्याचा इतिहास
साहित्यविषयक दृष्टी गर्यादित तरून ती फार विशाळ होती. त्यान 'निपंटु शेप हा वैद्यकणास्त्रावरीळ ग्रंथ, 'योगणास्त्र' हा योगाचे रील ग्रंथ न 'नियष्टिशळाचा पुसाप' हा जैन तीर्थकरांच्या गोष्टींचा संग्रह, अरे ग्रंथ रचळ. पण त्यांचा रावेश्रेप्ळ ग्रंथ म्हणजे ' सिद्ध-हेम-शब्दानुशासन ' हा आहे. हा ग्रंथ म्हणजे रांस्कृत, प्राहत ब अभ"भ्रंश भाषांचे व्याकरण आहे. पाणितीने संस्कृत भाषेसाठी जे कार्य तोळे तेच कार्य हेमचंद्राते प्रथम अप'भ्रंश भाषेच्या (नियमांची) व्याकरणाची संहिता बनवून केले. हे व्याकरण त्याने रिद्धराजाच्य़ा विनंतीवरून बनविळे अरो र्हूणतात. असे सांगतात कौ, हा ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर सिद्धराज इतका प्रराच्न व आनंदित झाला की त्या ग्रंथाचा गौरव करण्यासाठी त्य़ाने आपल्या सर्वात श्रेष्ठ अलफुत गजराजा- वरून शहरातुन त्यांची मिरवणूषा काढली वब दरबारात आल्यावर स्वत: त्या ग्रंथाची' विद्यादेवी सरस्वतीचे प्रतीक म्हणून महापूजा केली.
हेमचंद्राते व्याकरणाच्या नियमांच्या उदार्रणांसाठी निवडलेळे दुहे त्यातील साहित्यिक गुणांबद्दल प्रसिद्ध आहेत.
“तो लाखो मैल दूर असेना का ? त्याचे प्रेमपुष्प कोमेजलेळे नसे म्हणजे झाले. त्याला परत येण्याला शंभर वर्षे का' लागेनात तरी हे सखी, तोच' माझ्या सुखाचे निधान* आहे.”
५ माझ्या अंगाशी' त्याच्या अंगाचा स्पर्श झाला नाही, माझे ओठ त्याच्या ओठाला भिडले नाहीत पण सखी' मी' त्याचे मुखवामल* पाहिले मात्र आणि आमतची' क्रीडा पूर्ण झाली."
'* खऱ्या सद्गुणांनी' संपत्ती मिळतेच असे नाही, पण कौर्ती तरी' गिळतेच; नणशिबाल लिहून ठेवलेल्या फळाचाच लोक उपभोग घेऊ शकतात. सिह्ागागून एपा कर्पदिकेचीही प्राप्ती होत नाही, पण हत्ती मिळवायला मान लाखो राये ख्नावि' लागतात”,
“ सर्खि, ईएवराने चांगळे केले, माझा वंथ रणांगणात मृत्यू पावला, जर तो लढाईतून पळून घरी' येता तर मळा आपल्या मैनिणींपुढे ळज्जेने खाळी' भान घालावी' लागली' असती,”
५ “ आम्ही थोडे आहोत, शत्रू संख्येने कितीतरी आहेत ' असे फकत' शिप्रेच म्हणतील. ' बाबा, आकाशाकडे जरा पहा. किती चांदण्या प्रकाणाबाबत चंत्राची' बरोबरी' करू शकतील ? '*''
“ सर्खि, खोटं बोळू नकोस. माझा कंथ दोन गोष्टींनी अपुर्ण आहे. तो सर्वांना उदारपणे खैरात करीत असताना मला मात्र त्याने वगळळे आणि तो ळढत असतात्ता फक्त त्याची तलवारच मागे राहिली १",
* सर्खि, ही माझी ताठर व मोठाली वक्षस्थळे म्हणजे एक अडचण'च आहे.
जुने साहित्य : ११
त्यामुळे माझा प्रियकर (मळा आलिंगन देताना) माझ्या अधरापर्यंत मुश्किलीने पोहोचू एकतो? १.”
प्रिकर जवळ असताना झोप कशी येऊ शकेल ? आणि तो जवळ नसताना क्षोप येणे कसे शक्य आहे ? एकंदरीत ह्या दोन्ही गोष्टींनी माझी झोप उडून गेली हे खरे१*.”
हेमचंद्राने ' इृरथाश्रय काव्य ' दोन भागात लिहिले आहे. पहिले ' इृाश्रय ' महाकाव्य संस्कृतामध्ये लिहिले आहे. त्यामध्ये २० अध्यायात चालूक्य राजवंशाचा इतिहास' आहे. भूळ राजापासून सिद्धराज जयसिहाच्या दिग्विजयापर्यंतचे वर्णन त्यात आहे. त्याचबरोबर त्यात त्याने आपल्या ' सिद्ध-हेम-शब्दानुशासना"च्या पहिल्या सात अध्यायात विस्ताराने लिहिलेल्या संस्कृत व्याकरणाच्या सूत्रांची उदाहरणे दिली आहेत.
' दुद्याश्रय ' काव्याचा दुसरा भाग प्राकुतमध्ये आहे व त्यात आठ अध्याय आहेत. त्याला ' कुमारपाल चरित ' असे दुसरे नाव आहे, कारण त्यांत कुमारपाल राजांचे चरित्रही आहे. त्याबरोबरच त्यात प्राकृत, सौरसेनी, मागधी, पैशाची, चूलिका पैशाची व अपभ्रंश भाषांच्या सूत्रांची उदाहरणे आहेत. सिद्ध-हेम-शब्दातु- शासनाच्या आठव्या अध्यायातील प्राकृत व्याकरणात त्याने ह्या भाषांचे विवरण केले आहे.
ह्याप्रमाणे संस्कृत ' द्र्याश्रय ' काव्यात संस्कृत व्याकरणाचे नियम व प्राकृत ' द्रधाश्रय ' काव्यात प्राकृत व्याकरणाचे नियम आहेत. त्याचप्रमाणे त्यात चालुक्य राजवंशाचा मूळराज ते कुमारपालपर्यंतचा इतिहासही वणिलेला आहे.
' दृघाश्रय ' ह्याचा अर्थ ' दोन अथ असलेले ' असा आहे. हे नाव ग्रथा्थ आहे, कारण 'ह्यात सोलंकी राजवंशाचा इतिहास आहें व त्याचवरोबर हेमचंद्राने केलेल्या व्याकरणाच्या नियमांची' उदाहरणेही आहेत.
* भरतेशवर बाहुबली ' (सन ११८५) हा शालिभद्रसूरीने लिहिलेला त्या काळचा सर्वात जुना 'रासग्रंथ आहे. ह्यामध्ये भरत व बाहुबली' ह्यांच्यात सत्तेसाठी' झालेल्या लढ्याचे वर्णन आहे. जैनांचा आद्य तोर्थंकर त्ररषभदेव ह्याचे हे दोन पुत्र, करषभदेवाला १०० पुत्र होते. अंतर्गत लढाईमुळे कुटुंबाला कष्ट व त्रास भोगावा लागू नये म्हणून असे ठरविण्यात आले की ज्येष्ठ पुत्र भरताने राजगादीवर यावे' व इतर सर्वांनी संन्यास ('दीक्षा') ध्यावा. बाहुबली शिवाय इतर सर्व भावांनी ह्याचा स्वीकार केला व त्यांनी संसाराचा त्याग' करून दीक्षा घेतली, पण बाहुंबेलीला आपल्यात शारीरिक व वौद्धिक सामथ्यें फार आहे ह्याचा गर्व असल्यामुळे त्याने ह्या निर्णयाला विरोध केला. भरत हा अर्थात ज्येष्ठ पुत्र होता. पण आपण सर्व दृष्टींनी सर्वात उत्तम आहोत असे म्हणून आपणाला राजा करावे असे बाहुबली म्हणू लागला. निरनिराळ्या कसोट्या करून बाहुबलीचा हक्क मान्य करण्यात
१२९: गुजराती साहित्याचा इतिहास
आला. तेव्हा भरताने दारूण निराणा व अरुयेच्या भरात बाहुबलीला जोरात एवा थप्पड मारली, त्यासरणी' कोधाने संतप्त होऊन बाहुबलीने आपला राक्षसी पंजा उगारला. सर्वे लोक स्तब्ध व क्षुव्ध होऊन पोहू लागले, त्यांना बाटले की' हा बाहुबलीचा हात व'जञाप्रमाणे भरताच्या डोक्यावर प्रणार, पण बाय चमतार झाला, बाहुबलीची उगारलेली मूठ त्याच्या स्वतःच्याच मस्तनाबर पडळी, त्याने' त्वेषाने आपलेच केस' उपटले.१ २
बाहुबलीचे दुसरे ९८ भाऊ वयाने लहान असले तरी त्यांनी त्याच्या आधी दीक्षा घेतलेली असल्यामुळे ते. त्या दृष्टीने श्रेष्ठ होते. म्हणून त्यांच्यापुढे नतमस्तक होणे आवश्यक होते, पण तसे करणे बाहुबलीला अवघड वाटल्यामुळे त्याने आपल्या तपस्येच्या जोरावर केवलज्ञानप्राप्ति करण्याचा निएचय केला. ह्या कामी आपली' शक्ति, उत्साह ब दु्देम्य इच्छाशक्ति त्याने पणाळा लावली. आपला हेतू साध्य करण्यासाठी तो अधिकाधिक णारीरिक काष्ट वरून तगएचर्या करू लागला, पण त्याचा काही' उपयोग होईना. त्याच्या ज्य! दोन बहिणींनी दोक्षा घेतली होती' त्या' प्रसंगवशात् त्याचेकडे आल्या. त्यांनी त्याचो 'भयंकर आर्त अशी व्यथा पाहिली' आणि त्या त्याला म्हणाल्या, “लाडक्या भावा, हत्तीवरून खाली' उतर१?४, “वीरा मोरा गजथी हेठा उतरो"” बाहुबलीला तत्क्षणी त्यांच्या सांगण्याचा बोध झाला. तो स्वतःची' दुबेळता व अहंभाव रूपी हत्तीवरूत खाली उतरला. (त्य़ाने दुर्बलता ब' अहंभाव ह्याचा त्याग केला) व त्याने आपल्या भावांकडे जाऊन त्यांना मात वेऊन व त्यांचा आदर करून नम्न' होण्याचे ठरविले, त्याने ज्याक्षणी' असा चिएचग्र केला' त्याचक्षणी त्याला केवळ ज्ञानाची प्राप्ति झाली-
विनयचंद्राने लिहिलेली ' नेमिनाथ चतुष्पदिका ' (१२४४) ही. सर्वात णुनी' ' बारमासी*"*“ आहे. ह्या काव्याचा नायक नेमिनाथ हा एक उदार्चरित व कनवाळू पुरुष आहे. दारकेच्या उग्रसेन राजाच्या राजुल नावाच्या करत्येणशी विवाह करण्यासाठी तो निघतो. मिरवणूक वधूच्या घराजवळ ग्रेते. रस्त्याने येताना नेमिनाथला एका अंगणात' असंख्य पणु एवात्र आलेले दिसतात, तपास' करता! त्याला असे कळते की ते पणु लग्नाच्या जेवणावळीसाठी' मारे जाणार आहेत. त्याचे हृदय दयेने द्रवते व तो एकदम ळग्नाचा मंडप' सोडून निधून जातो. तरण राजुळ मंडपात तो परत येईल म्हणून आओशेते त्यांची वाट पहात असते. ती' वाट पहातच राहते. महिच्यांमागून महिने जातात, च्ह्तु बदलतात. त्याबरोबर निसर्गाचे राही बदलत जाते. पण बदलत नाही' राजुळ्चे मन. जसजसा समय जातो. तसतसे तिचे दुःख व एंका वाढतच जातात. अधिक महिना*६ सुरू होतो. नेमिनाथ' परत' येतो पण तो नवरदेव म्हणून नव्हें तर साधू म्हणून येतो. त्याचे भन ऐहिक गोष्टीतून उठून गेलेले असते. त्याते तर संसाराचा त्याग केळेलाच असतो. पण तो राजुललाही' प्रपंचाचा त्याग करण्यास' सांगतो व राजुल तसे करण्याला वबूळ होते.
जुने साहित्य : ११
'ह्या काव्याचा बराचसा भाग राजुल व' तिची सखी' ह्यांच्या संवादानी' भरलेला आहें. सखी राजुलला सांगत असते की', ' तु नेमिनाथला विसरून जा.'
' नेमि' गेला म्हणून काय बिघडके ? तुळा दुसरे अनेक योग्य वर मिळती'ळ१४' राजुल म्हणते, ' सूर्याचा उदय होईपर्यंतच स'गळे तारे तेजाने तळपत असतात १ <.'
आश्विनाच्या महित्यात राजुळचे' कष्ट पाहून व्याकुळ होऊन तिची सखी' म्हणते. 9 “ अग राजुल, आता तेमीचा नाद सोड. त्याने पहिल्यापासूनच तुझा विएवास- घात केला आहे. इतकेच नाही तर गेले आठ जन्म' त्याने तुझ्या प्रेमाचा अव्हेरच केला आहे.!** राजुल, एकच उत्तर देते, 'सखी', त्या दयाळू नेमीचा काय दोष आहे? ज्याने अंगणात' एवढे पशु गोळा केळे आणि माक्षी' व माझ्या प्रियकराची' ताटातुट केली' त्या माझ्या पित्माला, उग्रसेनाला दोष दे.'११
अशा रीतीने ह्या काव्यात राजुळच्या नेमीनाथावरील अढळ प्रेमाचे वर्णन कवीने' समर्थपणे केले आहे.
हे काव्य शऐेवटी' सुखपर्यवसायी' झालेले आहे. कवि म्हणतो,-. ' अधिक मास” न्रामाने सर्वे महित्यात येऊ लागतो आणि सहा क्रतूंच्या २१ गुणधर्मांचे दर्णन घडविंतो' राजुल आपले दोन्ही बाहू उभारून आपल्या प्रियकराला भेटू पहाते. उग्रसेनाची' ती' कन्या आपल्या प्रियकराला संदेश पाठविते. तिचे हृदय प्रियकराविषयीच्या प्रेमाने व आदराने भरून गेलेले असते व राजुल आपल्या पाच सख्यांना बरोबर घेऊन गिरनार पर्वतावर जाते. तेथे सद्गुणसंपन्न अशी' राजुल आपल्या सख्यांसह प्रभु नेमीनाथाकडून दीक्षा घेते. संन्यास ग्रहूण केल्यावर तिला केवल ज्ञानाची' प्राप्ति होते व तिला सव सिद्धींवर* २ प्रभुत्व*3 प्राप्त होते.
'श्री थूलिभदूद फागु' (अदमासे १३२४) हे जिनपद्मसुरीने रचलेळे गुजराती' मधील पहिले 'फागु' काव्य ह्या काव्याचा नायक थूलिभद्द (स्थूलिभद्र) हा एक रूपसंपन्न तरुण जेन साधु असतो. त्याची सत्वपरीक्षा घेण्यासाठी त्याचा गुरु त्याळा वर्षाक्रतुचे चार मास' (चातुर्मास) कोणा नावाच्या एका तरूण आणि रूपवती' वेश्येच्या घरी' राहण्याची आज्ञा करतो. पूर्वी गुरु स्वतः तिच्यावर आसक्त झालेला असतो आणि संन्या'स घेऊन दीक्षा घेण्यापुर्वी तो १९ वर्षे कोशाबरोबर राहिलेला असतो. मादक तारुण्य, अनावर आकर्षण व अनुकूल क्रतुही सर्वच एकत्र होऊन स्थूलिभद्राला मोहात पाडण्याचा प्रयत्न करतात. पण सवं व्यर्थ-तो अढळ व निश्चल राहतो. त्याची पवित्रता, गंभीरता व संयम पाहून कोशाच्या चंचल मत्तावर परिणाम होतो आणि' ती' शांत व गंभीर बनते. त्या तरुण साधूच्या चारित्र्यबळाने स्वर्गातीह' देव प्रसन्न होऊन त्याच्यावर पुष्पवृष्टी करतात,
'फागु' ह्या काव्य प्रकाराचा मुख्य विषय वसंतत्र्तुतील विलासांचे वर्णन
१४ : गुजराती साहिन्याचा इतिहास
करणे हा असतो. पण 'ह्या 'फागु' मध्ये कबीने वर्षान्नतुची (चातुर्मासाची ) पाार्ब- भूमि घेतली आहें. कारण त्यामुळे ह्या पाव्याच्याःनायकाला चार महिने संतत एका जागी' वास्तव्य करावे' लागले आहे. ( मोहाणी' टवधार देत' रहावे. लागळे आहे) शिवाय गुजरातेत वर्षाक्रतुचे तिरागंसौंदर्य वसंतक्रतुतीळ निसर्गसौंदर्यापेक्षा कोणत्याही दृष्टीने तिळमात्र कमी दिसत ताही.
पण आजपर्यंत उपलब्ध झालेल्या सर्व 'फागु' काव्यामध्ये 'बसंत' विळास' हा फागु सर्वेश्रेष्ठ आहे. त्याचा लेखक अज्ञात आहे. पण तो जैन नव्हता हे मात्र निश्चित आहे. त्याचा निश्चित रचनाकालही' अज्ञातच आहे. काही' विद्वानांच्या मते. त्याचा लेखनकाल पंधराव्या शतकाचा पहिला चरण (१/४ भाग) आहे तर काहींच्या मते' तो १४ व्या शतकाचा मध्यभाग आहे व वाहींच्या मते. त्याहूनही आधीचा आहे. ह्या काव्यात फक्त ८४ द्रिपद्या (6001615) म्हणजे दोन दोन भोळींच्या प्यावली आहेत. पण साहित्यगुणात ह्याच्यापेक्षा उत्तम अथवा ह्याची बरोबरी' करणारे असे दुसरे त्यावेळचे काव्य क्वचितच सापडेल, हे काव्य जीवनातील उत्साह व आनंदाचे एक गीत आहे. जिचा मोठ्यात' मोठा दुर्गुण 'गविष्ठपणा' हा आहे अशा एका मातिनी' नायिकेस तिची सखि म्हणते :
' अग मूर्खे-तुझे पयोधर अनंत कालपर्यंत कठीण का राहणार आहेत ? मूर्खासारखी' बागू नकोस. रागावतेस कशाला ? तारूण्य एव' दोन दिवसापुरते'च टिकते.**'
दुसरी' एक स्त्री विरहवेदनांनी व्याकुळ झाल्यामुळे 'भ्रमरावाडे विवा चंद्रावाडे पाहू शकत नाही व असह्य व्यथेने ती उद्गारते, ' मरा, चाळता हो इथून, करपा करून मला एकटीला राहू दे. माझं शरीर आधीच अगदी कृश आहे. त्यात तू आणखी त्रास कणाला देतोस, बा चंद्रा ? सूड उगवायला आपले काही' पुर्वीचे वैर नाही १६,
वसंत' चटतूचे आगमन, त्याचे सौंदर्य, वेंगव, उन्मादवा यौवन, उत्णाह्र व अभिलाषा, गावाबाहेरीळ उद्यानात युवयूवतींच्या सभूहाच्या चेप्ठा व क्रीडा, प्रेमिकांचे कलहू व प्रेम, विरहूवेदला व पुनमीलनाचा आतंद ह्या सर्व गोण्टींचे वर्णन पदा काव्यात' कवीने फार प्रभावीपणे केले आहे.
' त्रिभुवन-दीपक प्रबंध ७ ' (अदमासे १४०६) हे जयशेखर सूरीने आपल्याच ' प्रबोधचिन्तामणी' या संस्क्रुत ग्रंथांचे केलेले मापांतर आहे. हो वावि संस्कृत, प्रात व गुजराती' भाषावर प्रभुत्व असळेळा पंडित कवि होता.
' त्रिभुवन-दीपक प्रबंध ' हे एक रूपक काव्य भाहे. भायेच्या कचाट्यात सापडलेल्या जीवात्म्याची काय दुर्दशा होते हे त्यात वणिळे आहे.
परमहंस (आत्मा) नावाचा एक राजा होता. तो आपली' राणी' चेतना (विवेकशक्ति) हिच्यावर फार आसक्त होता. एक दिवस राजाचे माया नावाच्या
जुने साहित्य : १५
रूपवतीस पाहिले व तो तिच्यावर मोहिंत झाला. राजाची मायेविषयींची' आसक्ति पाहून चेतना दु:खित होते. व त्याला सोडून निघून जाते.
राजा आपले राज्य ' विश्व ' सोडून देतो आणि ' कायानगरी ' ची स्थापना करतो. आपला कारभार ' मन ह्या मंत्र्यावर सोपवून तो मायेबरोबर सुखोप'भोगात' मग्न होऊन जातो. पण माया 'मनता'शी संगत्तमत करून 'परमहुंसा'ला कैदेत ठाकते व * मन ! आपल्या लह्रीप्रमाणे राज्यावर सर्वसामर्थ्यानिशी' सत्ता गाजवू लागतो.
* मनाला' दोन भार्या असतात '-'प्रवृत्ति' व 'निवृत्ति', आपली' लाडकी राणी' 'प्रवृत्ति' हिच्या पासून झाळेल्या 'मोह' नावाच्या पुत्राला तो राज्यपद देतो व आपली' नावडती' राणी 'निवृत्ति' व तिचा मुलगा 'विवेक' ह्यांना हृह्पार करतो.
'विवेक' दोघी' जणींशी लग्न करतो-'सुमति' व 'संयमश्री' ही त्यांची नावे. विवेक 'पुण्यरंग-पट्टण' नगरीचा राजा' होता. तो 'मोहा'शी' लढाई करून त्यांचा प'राभंव करतो व त्याला भारून टाकतो.
पुत्रशोकाने हताश क्षालेली 'प्रवृत्ति' झिजून-झिजून मृत्यु पावते आणि विवेकाच्या उपदेशाने ' मन ' आपले स्वतःचे सांत्वन करण्याचा खूप', प्रयत्न करत पण तो 'मोहा'ला विसरु शकत नाही' व शेवटी' तो 'शूक््लध्यान' ह्या चितेत आत्मार्पण करतो.
'चेतना' आता' योग्य वेळ आली' आहे असे पाहून प्रगट होते. ती आपला पति 'परमहंस' ह्याच्याकडे जाते व त्याला स्वस्थानावर येण्यास विनेति करते. कारण आता 'माये'चा प्रभाव नाहीसा क्षाला होता. मत्ताने चितेत प्रवेश केला होता व' मोह लढाईत मरण पावला होता.
आता फ'रमहंस कायानगरीच्या बंधनातून मुक्त होऊन पुन्हा 'विश्वा'चा राजा होतो.
ह्या काव्यातील सखोळ आध्यत्मिक उपदेणशामुळे ह्या काव्याला 'प'रमहृंस- प्रबंध] किवा काही हस्तलिखितात दिलेले 'हंस-विचार-प्रबंध' हे नाव सा्थच ठरते.
ह्या काव्याचे संपादक केशवळाळ ध्रुव म्हणतात “ह्या एकाच गुजेर काव्यामुळे ह्या जेन कवीला सर्व लेखकांमध्ये पहिल्या प्रतीचे स्थान प्राप्त झाले आहे. 'प्रबोधच-चितामणि' (गुजराती' काव्य) 'प्रबोध प्रकाश' ह्या काव्यापेक्षा नक्कीच अधिक ल्यातताम होईल. संविधानकाच्या रचनेत, पात्रांच्या चित्रणात, आणि रूपकाच्या सुसंवादित विकासात कवीची' प्रतिभा एकसारखीच यशस्वी' झाली' आहे. वण्यं विषयात विविधता असल्याने सर्वे रस एकत्र आले आहेत. त्यात कथेचा धावता प्रवाह आहे. कथानकातील घटनांची मांडणी कुशलतेने केळी आहे व त्यामुळे वाचकांची' उत्सुकता शेवटपर्यंत टिकूत राहते. जेनेतर लेखकांच्या साहित्याइतकी' प्रसिद्धी जर जेन हेखकांना मिळत गेली असती तर जयशेखरसूरि हा सुद्धा गुजराती जनतेत भाळण आणि प्रेमानंद यांच्या इतकाच लोकप्रिय झाला असता *€ .”
१६ ! गुजराती साहित्याचा इतिहास
अशा रीतीने ह्या काळी जैन साधू बबींचे फार वर्चस्व होते. त्यांचा मुख्य उद्देश जैन धर्मांचा प्रसार करणे हा होता. तथापि' त्याकाळी असेत ठावूर, श्रीधर व्यास, भौम व अबदुर रहेमान हे चार कवि झाळे की. ज्यांची भूमिका सागान्य सांसारिक निधर्मी मनुप्याची' होती.
ह्यांच्यापैकी 'हंसौली” (१३६१) ह्या काव्याचा लेखक अशात ठाकोर हा लोकप्रिय गुजराती 'भवाई' चा जनक समजला जातो. 'भवाई' ही बहुतेक लोक- कथांवर आधारित असते. 'हंसौली' ही भवार्ह चार भागात विभागळेली आहे. पहिल्या भागात हंसौली व नरवाहून ह्यांच्या विवाहाचे वर्णन आहे. नंतरच्या तीन भागात त्यांच्या हुंसराज व वच्छराज 'ह्या दोन जुळ्या मुलांच्या तीन जन्गांची2० कथा आहे. त्यांचे संगोपन निरतिराळ्या ठिकाणी' होते. , ही ताटातूट न आवडूत ते' एकमेकांच्या भेटीसाठी झुळू लागतात. त्यांना पुष्कळ संकटांना तोंड द्यावे' लागते. अत्तेक दुर्दैवाच्या फेऱ्यांतून जावे' लागते, सरते शेवटी ते. कांतिनगरीत' एकमेकांना भेटतात. देवाच्या विविध घटनाचक्रातूृत निघता-निघता हंसराज सुदैवाने ध कर्मधर्भ संयोगाने, कांति तगरीचा राजा झालेला असतो. मग ते दोघे भाऊ पैठणला जातात. आपल्या' माता-पित्यांना व इतर कुटुंबियांना भेटतात व नंतर सर्व सुखाने एकत्र राहतात.
*रणमल्ल छंद' (१३१९९) हे काव्य श्रीधर व्यास ह्याने लिहिले, ह्या काव्यात ईडरचा राणा रणमल्ल हा हिंदु रजपूत राजा व पाटणचा' सुलतान ह्यांच्यामधील लढाईचे वर्णन आहे. 'ह्या युद्धात रणमल्ळ बरिजयी होतो. ह्यात सिंहाभ्रमाणे गर्जना करून शत्रूवर चालून जाणारे रजपूत, थकून-भागून मागे हटणारे शत्रू, आपल्या जबरदस्त हल्ल्याने शत्रूंना 'त्रोहि भगवान्' करून सोडणारा आणि स्वतःचे स्वामित्व गाजविणारा ,राणा ह्याचे वर्णन फारच बहारीचे' व' प्रभावी आहे. हे ७० एळोयांचे' लहानसे काव्य आहे. त्यातील पहिले ११ एलोक संस्कृतमध्ये आहेत पण त्यातही' फारसी' व भरनी' शब्दांचा भरणा आहे.
'सदय वत्स 'चरित' (१४१०) ह्याचा ठेवा 'भीग आहे. हे काव्य एका लोककथेंवर आधारित आहे. ही' लोककथा शेकडो वर्षे 'गुजरातभध्ये व' भारताच्या दुसऱ्या बऱ्याच प्रांतात अतिशय प्रसिद्ध होती. नागवा सदेवंत ब नायिका संवालिंगा 'ह्यांच्या अढळ, तीव्र प्रेमाची ही कहाणी' आहे. एकामागून एक शालेल्या भाठ जन्मापावेतो चाललेल्या त्यांच्या प्रेमाची ही कथा' आहे. त्यांच्या प्रेमामध्ये अनेक विघ्ने आलेली' आहेत.
* संदेशक रास ' (१४२०) हे एकच काव्य मीर अब्दुर रहेमान ह्या त्या वेळच्या एका मुसळूमात कवीने लिहिलेले काव्य आहे. हे एक दुततकाव्य आहे. विजयनगरमधील एक युवती एका सत्परवृत्त प्रवाश्यांच्या माफेत' खंबायत मध्ये राहणाऱ्या आपल्या प्रिय पतिला संदेश पाठवते.
जुने साहित्य : १७
“विरहाग्नीने जे जळून भस्मसात झाले नाही' त्या माझ्या ह्या कठोर हृदयाने भी. त्याला संदेश** तरी' कसा पाठवू ?” असे विचारून ती पुढे म्हणते, ' मृण्मय हृदय पाण्याशिवाय ठिन्नभिन्न होऊत जाते.? * मानवाचीही' जेव्हा अंशी स्थिती होईल तेव्हाच त्याला खरे प्रेम म्हणता येईल.”
'ह्या काव्यात खंबायतचे सुंदर शब्दचित्र रेखाटळे आहे. याचे पहिले १७ एलोक प्राकृतमध्ये आहेत.
बरेच दिवस असा एक समज होता की त्या काळचे बरेचसे साहित्य पद्यातच लिहिलेले होते, पण मुति जितविजयजीनी दार्खावल्याप्रमाणे त्या काळी लिहिलेल्या गद्यग्रंथांची संख्याही काही अगदी कमी नव्हतीं. तरुण प्रभासूरिने लिहिलेल्या 'प्रतिक्रमणबाळावबोध' (१३५५) हा गद्यप्रंथ सर्वात आधी प्राप्त झालेला गद्यग्रंथ आहेच. पण त्याशिवाय ' मुग्धावबोध औक््तिक * हा कुलमंडल गणी याते लिहिलेला गद्यग्रंथही उल्लेखतीय आहे. 'ह्या ग्रंथामध्ये कवीने संस्कृत व्याकरणाचे नियम उदाहरणे देऊन गुजरातीत विशद केले आहेत'. ह्या ग्रंथावरून तत्कालीन भाषेच्या स्थितीचे उत्तम ज्ञान प्राप्त होते. त्या काळचा दुसरा उल्लेखनीय गद्यग्रंथ म्हणजे माणिक्य सुरिचा ' पृथ्वीचंद्र चरित ' (१४२२) हा होय. ग्रंथकर्त्याने स्वत; त्या काव्याला ' वाग्विलास ' असे म्हटले आहे. त्याचे कथानक अगदी साधे आहे. पैठणचा राजा पृथ्वीचंद्र अयोध्येचा राजा सोमदेव ह्याच्या रत्नमंजरी' ह्या नावाच्या कन्येशी विवाहू करतो. शौर्याची व' धैर्याची अनेक कृत्ये करून दाखवून तो स्वतःचे सामथ्यं सिद्ध करतो. लग्मानंतर थोड्याच दिवसांनी त्याळा संसार कसा निःसार आहें हे पटल्याने तो आपल्या पुत्राला गादी' देऊत संसाराचा त्याग करतो. अशी ही सोपी' व सरळ कहाणी काव्यात्मक वरणंनांनी नटविलेलीं आहे. त्याचा एक नमुत्ता-
“ वन त्यालाच म्हणावे' ज्यात अनेक वृक्ष आहेंत, ज्यांत दया आहे तेच मन, पाण्याने संपुर्ण भरलेली तीच नदी, तोच पाऊस जो वेळेवर येतो, जेथे लोकांची' समृद्धी होते त्याळाच देण म्हणतात, जिला पुत्र होतो तीच स्त्री, पुष्कळ वस्तूंनी भरळेले असेल तेच दुकान, खरा भाट तोच जो णब्दप्रभु आहे व जिथे सोबतीला भार्या आहे तीच खरी गय्या, जेथे मुनि राहतात. तोच मठ, जो सत्य आहे तोच शब्द, जो अत्यंत प्रेमळ आहे. त्यालाच भाऊ म्हणावे, जे स्वच्छ धुतलेले आहें त्यालाच वस्त्र म्हणावे, जिचा पुर्ण उपभोग घेता येतो तिलाच संपत्ती म्हणावे ११,”
गु.सा.इ....२
१८ : गुलराती साहित्याचा इतिहास
2 कण टण ०
१७!
तळटिपा
परिशिष्ट 'अ" पहा.
परिशिष्ट 'ब' पहा
जवळ-जवळ ८०१० पृष्ठांचा ग्रंथ
१२ व्या गुजराती-साहित्य-तरिषदेचे विभागीय अध्यक्ष म्हणून मुनिजींनी गुजराती भाषेत दिळेल्या-'गुजरातेत ऐतिहासिक संणोधनाच्या' क्षेत्रात झालेल्या कार्य प्रवृत्तीवर केळेळा एक वृष्टिक्षेप' ह्या विषयावरील व्याख्याना- तील एका उताऱ्याचा मी केलेला अनुवाद,
अगलिअ-णेहेमिवद्वाहं जोअण-कक्खंनिजाउ
वरिस-सएण वि जो मिळड राहि सोवखडं सो ठाउ ॥
अंगहिं अंगु ण मिलिउ हलि अहरे अरुण पत्त
पिअ' जोअंतिहे मृहकमलू एवंड सुरउ सगत्तू ॥
गूणिहि ण संपद्द कित्ति पर फललिहिआ भुंजति' ।
केसरि ण लहइ बोडिडि अ वि गय लक््खेहि धेप्पं ॥
भल्ला हुआ जु मारिअआ बहिणी महारा बांतु ।
लज्जेज्जं तु वयंसिअहु जड भग्गा घर एंतु ॥
अम्हे थोबा रिउ बहुअ' कायर एवं भणन्ति' ।
मुद्धि णिहालहि गयणअलळूु करजण जोण्हु करन्ति' ।।
महु कन्तहो बे दोसडा हेल्लि म झळडखहि आल ।
देल्तहो हूउं पर उव्वरिअ जुज्भुन्वही करवालु ॥
अईतुंगत्तणु जे थणहं सो छेअउ ण हु लाहु ।
सहि जद्द केव तुडि वसिण अहरि पहुच्चर णाहु ।।
पियसंग्मि वाउ णिद्दडी पिंअही परोक््खहो केवे' ।
मह बिण्णि वि विण्णासिञा णिद्दृण' शत्र ण' तेथें ॥
'ह्याला 'केशळुंचत' म्हणतात', दीक्षा घेण्यापुर्वी हे करावेच' लागते',
वीरा मोरा गजथी हेंठा ऊतरो,
कृपा करून परिशिष्ट 'क' पहा.
हिंडु पंचांगाप्रमाणे दर तीन वर्षांनी एक अधिक महिना येतो. त्याला 'अधिक मास' म्हणजे जास्तीचा महिना म्हणतात.
गयउ नेमि तउ विणठइ काह, अछई अनेरा रह सयाई ।
धर तेजु गहगण सविताव', गयणि त उग्गई दिणयरू जाव ।
.१९,
२०.
२१,
२२
२३२.
२४.
२५.
२६.
२७. र्ट,
जुने साहित्य : १९
सखि नवि खीना नेमीहिरिसि, मत आपणपउं तउं खय नेसि' । जिणि दिक्खाडिउ पहिलउ छेहु, न गमिउ अठठ्भवंतर नहु । नेमि दयालु सखि निरदोसू, कौजइ उग्रसिण उपरि रोषु ॥ पसुय भराविउ मूकउ वाडू, मुक्षु प्रियसरिसउ कियउ बिहाडू ॥ एका वर्षात, दोत महिन्यांचा एक ह्याप्रमाणे शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद व हेमंत असे सहा कघतु येतात.
सिद्धि-अतिमानवीय शक््ति-एकंदर आठ सिद्धि आहेत. अधिक मासु सवि मासहिफिरई,
छह रितुकेरा गुण अहरइ,
मिलिवा प्रिय ऊबोहिलि हुय,
सउ मुकलाविउ' उग्रसेणधूय,
पंच सखी' सइ जसु परिवारि,
प्रिय ऊरमाहि गद्द गिरनारि
सखी सहित राजल गुणरासि,
लइ दिक्खु परमेसर पार्सि,
निम्मल केवल नाणु लहेंवि,
सिद्धि सामिणि राजलदेवि.
जेन साधूना सबंध वर्षभर एका जागेहून दुसऱ्या जागी फिरत रहावे' लागते. फक्त' पावसाळ्याचे चार महिने ते. एकाच जागी 'उपाश्रयात' वास्तव्य करतात.
थभण थिर न फ्योहर मोह रचउ म गमारि
मान रचउ किस्या कारण तारुण दीह बिच्यारि ॥
भमरला छांडि न पोषल' षोणलथ्या अम्ह सहर ।
चांदुला सइरसंतापण आपण तां नहि वदइर ॥
कृपया परिशिष्ट 'ड' पहा.
“आ एक ज गुर्जर काव्यथी जैन कवि प्रथम पंक्तिनो साहित्यकार बने छे. ' प्रबोधतवितामणि', 'प्रबोधप्रकाश'ना करता अधिक यशस्वी थवा निर्मित छे. कविती प्रतिभा वस्तुती गृंथणीमां, पात्रनी योजनामां अने रूपकनी खील- वणीमां एकसरखी विजयणशाली तीवडे छे. प्रस्तावोन. वेचित्र्य अनेक रसनी मिळावटने पोसे छे, अने कार्यनो वेग तया संथिधाततुं चातुर्य वांचनारनुं कौतुक छेवट सुधी टकाबी राखे छे. जैनेतर साहित्यनी पेठे जेन साहित्य चकले ने चौटे गवाय होत, तो जयणेखरसूरिए फण भालण अते प्रेमानंदना जेवी प्रसिद्धि लोकमां मेळबी' होत. ”
२० : गुजराती साहित्याचा इतिहास
२९. ३०.
३१.
र्र.
१३.
(पंदरमा शतकनां प्राचीन गुर्जर काव्य, आवृत्ति १ लौ, प्रस्तावना पृ. २९- ३३).
कृपया परिशिष्ट ' इ ' पहा.
आत्म्याचे अमरत्व आणि जन्माची पुनरावृत्ति हे हिंदू छोकांच्या श्रद्धेचे विषय आहेत.
जसु णिग्गामि' रेणुक््करडि करअ वि'रहुदवेण ।
किम' दिज्जई संदेसडउ तसू णिठ्ठूरद्द मणेण'।।
पाणी तणइ विओहइ कादमि ही फाटदद हियउ' ।
जद इम' माणसु होय नेहु ते साचउ' जाणियई ।
वन ते व्ण्णंविद्द जे बंहु वृक्षवंत, मति' ते जे दयावंत, नदी ते जे नीरवंत, मेघ ते जे समयवंत, देस ते जे प्रजावंत, स्त्री ते जे पुत्रवंत, हाट ते' जे वस्तुबंत' भाट ते जे वचनवंत, खाट ते जे धरणिवंत', मठ ते जे मुतिवंत,... ... वःचत ते जे सत्यवंत,... ... वस्त्र ते पखालसार, द्रव्य ते जे भोगसार ...
प्रकरण तिसरे मध्ययुगीन गुजराती साहित्य-१५ वे शतक
[१]
इ. स. १२९७ साली उलघखान ह्या अल्लाउद्दीन खिलजीच्या धाकट्या भावाने करण वाघेलाचा पराभव केला. ह्या घटनेने गुजरातच्या इतिहासात' एक नवे' प्रकरण सुरू झाले.
ह्यामुळे गुजरात दिल्लीच्या सुलतानांनी' नेमलेल्या नाझीमांच्या वर्चेस्वाखाली आले.
१२९८ पर्यंत असेच चालू राहिले. त्यावेळी तैमूरलंगाते दिल्लीवर स्वारी केळी, दिल्लीच्या सुलतानशाहीचे तुकडे-तुकडे केले. मग त्याने दिल्ली लुटली आणि तो निघून गेला, अशा रीतीने केत्मसत्ता भरत झाल्याने सर्व देशात अराजकता व अव्यवस्था बोकाळली. प्रादेशिक प्रशासक (गव्हर्नर) स्वतंत्र राजे बनले. गुजरातचा नाझ्ीम (गव्हनंर) जाफरखान ह्याने पाटण येथे आपली स्वतंत्र सल्तनत' स्थापिली.
बहाडुरशहाच्या कारकीर्दीपासूत (१५२५ ते १५३६) गुजरातची सुलतान- शाही विस्कळीत होत चालली. १५६० पासून तर गुजरातचे सुलतान हे केवळ नामधारी सुलतान 'राहिले आणि खरी सत्ता अमीरांच्या हाती आली.
सुलतात मुजफ्फरणहाच्या कारकीर्दीच्या शेवटी-गेवटी तर अमीरांनी त्याची नामधारी सत्ताही क्षुगारून दिली व त्यांनी गुजरातचा जो भाग भापल्या हाती यईल तो बळकावून त्या-त्या भागांचे' ते स्वतंत्र सत्ताधीश' बनले. नंतर तते आपाप- सातही भांडू लागले. अशा राजकीय अस्थिरतेच्या आणि सावंत्रिक अंदाधुंदी व असंतोषाच्या वातावरणात दिल्लीचा मोगल बादशहा अकबर हा इतिमदखान गुजराती याच्या आमंत्रणावरून ५७२ मध्ये गुजरातेत' आला व त्याने संबं गुजरात' प्रांत आपल्या मोगळ साम्राज्यांत समाविष्ट केला.
ह्याच सुमारास पोतृंगीज लोकही गुजरातमध्ये आले व त्यांनी १५३८ मध्ये दीव येथे व १५५९ मध्ये दमण येथे आपली वसाहत स्थापिली.
२२ ! गुजराती साहित्याचा इतिहास
१४१२ मध्ये अहूमदाबादची स्थापना झाली, तेव्हापासून ते. १५३६ मध्ये बहाहुरशहा मरण पावण्यापरयंतचा गुजरातच्या सुळतानंणाठीचा फाळ हा गुजरातच्या इतिहासातील ' सुवर्णयुग म्हणता येईल असा गोठ्या वेंगबाचा वाळ होता. सिद्धराज ज्यसिह ह्याने मध्यंतरी गुजरातची सत्ता ब भत्ता खूप उच्च घोटीला पोहोचविली होती हे खरे; पण' सुलताबांच्या कारकीर्दीत' कळा, स्थापत्य, नगर रचना, व्यापार, उद्योगधंदे बगैरे क्षेत्रात गुजरातने जी उच्चकोटीची प्रगति कोळी तिला तोड नाही,
ह्या काळात साहित्याची प्रगति भाग ,म्हूणण्यासारवी झाली नाही, १२९९७ साली हिंदू राजांची व त्यांच्या हिदू मंत्र्यांची राजकीय सत्ता नष्ट झाल्या- मुळे व राजकीय अस्थिरता न अंदाधुंदी असल्यामुळे कलि ब विहान यांना कोणी आश्रयदाता राहिला नाही. संरक्रत १' प्राकुत' या भाषांना महत्त्व राहिले नाही. गुजरात प्रांत एकठा प'डळा, मारवाड, माळवा व दुसरे प्रांत ह्यांच्याशी गुजरातचा सांस्कृतिक संबंध मुळीच राहिळा नाही. सर्वे गुजरात. सास्करृतिवा क्षेत्रात हृतबळ झाला. जुनी पचिम राजस्ताती अथवा ' मारु गुर्जर ' ही भागा. गुजरात वगैरे प्रांतात चालत' होती. ती जाऊन तिळा प्रादेशिक उपभाषेचे (018180) स्वरूप आले आणि काही काळाने अशी परिस्थिती आली की' जी भाषा फक्त गुजरातेत बोलली जाऊ लागली तिलाच गुजराती' ' भाषा ' असे मानण्यात येऊ लागले.
मुसळूमानपूर्व काळातही लोकसाहित्य आपआपल्या प्रांतातील प्रोदेशिक भाषेतच रचले जात असे, पण उच्च वर्गातील छेखवांचे साहित्य मात्र संस्कृत' व' प्राकृत भाषेतच रचण्यात येत. असे. पण आता. अणी ॥रिस्थिती' उद्भवली की उच्च वर्गीय लेखकही प्रादेशिक भाषेतच लेखन वाख लागले.
मात्र १५ व्या शतकातील एक प्रवाह उल्ठेखतीय आहे. उत्तर हिंदुस्तातात सांस्कृतिक व सामाजिक हुतोशा उद्भबल्यामुळे तेथे भवतिधर्णाचा उद्रेव झोला व त्याचा परिणास गुजराती प्रजनर वब विशेषत! हिंदु कनींवर 'चांगळा खोलपर्यंत झाला व ते श्रीमत् भागवताच्या दशम स्वंधात वणिलेल्या प्रेमलक्षणा भष्तीकडे वळले, ी
प्रेमलक्षणा भक्तीचे मुख्य व्यवच्छेदक लक्षण म्हणजे 'प्रेम', जीवात्मा हा गोपी व परमात्मा म्हुणणे श्रीकूण अणी भावना होणे ह्यानेच नाव' प्रेमजक्षणा भक्ती.
खरा भक्त श्रीकृष्णावर प्रेम करतो ते एखादी मुग्ध युवती आपल्या प्रिय- करावर जितक्या आसक्तीने व प्रखरतेने करते, तितक्या आसक्तीचे' व' प्रसरतेचे असते. खाता, पिता, बसता, उठता आपापले व्यावसायिक अथवा नित्य नैमित्तिक गृहूहृत्य करीत असता भक्ताचे मन सतत परमेश्वराकडे लागलेले असते, त्याच्या.
मध्ययुगीन गुजराती साहित्य-१५ वे शतक : २३
पासून दूर राहण्याचा एक क्षण म्हणजे सुद्धा वेळेचा अपव्यय होय. परमेश्वराचे सालिध्य म्हणजेच जीवनानंद. ह्यात मिळणाऱ्या परमोच्च आनंदापुढे त्याला मोक्ष- सुद्धा तुच्छ वाटू लागतो.
ही गोष्ट मुख्यतः कृष्णभक्तीच्या साहित्याबद्दल आहे. राम किवा शिव व' शक्ति ह्या देवतांची आणि इतर देवदेवतांची पुजा आराधना, प्रार्थना इ. प्रणालीगत' पद्धतीने चालू होती. त्यामध्ये भक्त' व उपास्यदेवतेचे नाते बालक व माता किंवा पिता असे असते.
भक्तिधर्म किंवा भागवतधर्म ह्याचा उदय अथवा प्रचार इ. स. पुर्व ६ व्या शतकातील वृष्णिकुलात जन्मलेल्या वासुदेवापासून क्षाला, कालाच्या वाहत्या प्रवाहाबरोबर त्यामध्ये इतर प्रवाह-उदाहरणा्थ वैदिक धर्माचे व महाभारतातील नारायणधर्माचे प्रवाह मिसळू लागले. एवढेच नव्हे तर कालांतराने अहिर कुळातील गोपालकृष्णाच्या खोड्या व क्रीडाही त्यात समाविष्ट झाल्या. ह्या विविध प्रवाहांच्या मिश्रणामुळे मूळच्या भागवतधर्माच्या स्वरूपात संपुर्ण परिवर्तन झाले. मध्ययुगीन काळात' श्री रामानुजाचार्यांनी त्या काळच्या सामाजिक व आथिक स्थितीचा विचार करून त्यात थोडे बदल करून, त्यामध्ये एकसूत्रता आणली. निबार्काचार्यांनी त्यात राधेचा समावेश' करून त्यामध्ये एक नवे परिमाण आणले, रामातन्दानी' जुन्या प्रस्थापित झालेल्या परंपरेच्या विरुद्ध जाऊन आपली धार्भिक प्रवचने प्राकृत (सामान्य लोक णी' भाषा बोलत असत' व समजत' असत) भाषेतून करू लागले. संस्कृत भाषेत धमंग्रंथ लिहिले गेळे पण ती सामान्य लोकांच्या व्यवहारातून लूप्त झाली' होती' म्हणून त्या संस्कृत भाषेचा त्यांनी अव्हेर केला. काही' विशिष्ट उच्च वर्णाच्या लोकांनाच धर्मकुत्ये करण्याचा अधिकार असावा 'ह्या प्रथेचा त्यांनी निषेध केला, धर्मांच्या बाबतीत सर्वे सारखे आहेत. धर्माचरण करण्यास जात-पात, स्त्री- पुरुष, वय, शिक्षण अथवा समाजातील स्थान ह्यातील भेद आड येता कामा नयेत असे प्रतिपादत्त करून धर्माची' दारे त्यांनी सर्वांना खुळी करून दिली व अश रीतीने भकक्तिधर्म सर्वांना सुलभ रीतीने आचरता येईल अशी' व्यवस्था केली.
भक्तीचे' असे' व्यापक स्वरूप' बनत चालले त्यामुळे ती केवळ ' प्रेमलक्षणा भवती राहिली नाही तर ज्ञान आणि वैराग्य ह्यांनी युक्त अशी आपल्याला देवा- वरील दृढ भक्ती' ही भक्तीची' कल्पना मध्ययुगीन गुजराती' साहित्याची प्राणशक्ति बनली.
भालण [१४०५ ते १४८९]
भालण हा एक ख्यातताम कवि व अनुवादकार होऊन गेला. हिंदुंचे धार्मिक ग्रंथ, महाकाव्ये व' पुराणे सर्वे संस्कुतमध्ये लिहिलेली होती
२४ : गुजराती साहित्याचा इतिहास
आणि त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे सामान्य माणसारा त्यांचे आाकळग होणे शक्य नव्हते. सर्वसामान्य जनतेळा ते' ग्रंथ कळावे म्हणून त्यांचा गुजरातीत अनुबाद करणे आवपरमक'च होते.
मध्ययुगातील लेखवांची असुवाव करण्याची पद्धत गात्र, केवळ गुज'राती भाषेत तो ग्रंथ अचूक अर्थारहू तसाच उतरावयाचा अशी' नव्हती. धमंग्रंथातून एखादी कथा, आख्यायिका, विचार अथबा बोधप्रद प्रसंग शोधून तो लोकांना समजण्यास सूलभ होईल ब भावडेळ अशा रीतीने तो लोकांपर्यंत पोहोचबीत असत, त्यासाठी भूळ प्रसंग किंवा गोष्ट ह्यातील काही भाग वगळून किंवा बदल करून अथवा पदरचे त्यात काही अधिक घालून ते-ते काव्य पुन्हा रचीत.
प्रेमानंदासारखा कवि म्हणतो-' एका बाजूला व्यास संस्कृतमध्ये प्रवचन करीत' आहे. दुसऱ्या बाजूला मी प्राकृुतमधून बोळत' आहे. एकही प्रसंग मी गाळत' नाही. मी सहूज' व सोप्या भाषेत लोकांपर्यंत माझे सुविचार पोहोचवितो.''
पण स्वत; प्रेमानंदाने वेळेळे अनुवाद मूळ प्रंथाशी ताडून पाहता भात्र आपणास आएवयं वाटेल. कारण त्याने त्यात कितीतरी' बदल केलेले असतात', त्यातील कित्येक गोष्टी वगळलेल्या अरातात. वित्येक तवे' प्रसंग घुसडलेले असतात ब ह्यामुळे तो 'अनुवाद' असे त वाटता 'स्ततंत्र ग्रंथ'च आहें असे वाटते,
मध्ययुगीन अनुवादकाच्या समोरच त्यांचा श्रोतृवर्ग असे ब ते श्रोते साधे, परिश्रम करणारे स्त्री-पुरुष असत, त्यांना संस्क्रतचे' ज्ञान नसे, पण त्यांना मनो" विनोदाची व' एक्य तेवढ्या बऱ्याच गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असे. अभ्यासू विद्यार्थ्यांना योग्य अशी भीमांसा करणे अथवा मूळचा अर्थ अगदी तंतोतंत ग्रावा असे अनुबादकारांचे धोरण नसे. श्रोत्यांची आवालनशवित व रुचि ह्यावाडे ते मुख्यत्वे' पाहात अरात, ह्या परिस्थितीमुळे अनुयादकांवर अभेक मर्यादा ब बोघधने' पडत असत.
भाळण कवीचे' मोठे वार्य म्हणजे त्याने' केळेला बाणपद्राच्या 'काढंब'री" चा अनुवाद, 'कादंबरी' हा संस्कृतातील महान गयग्रंथ, ह्या ग्रंथाचा अतुवाद भाणि तो सुद्धा फ्थरूपाने 'गुजराती'त म्हणजे देशी भाषेत करणारा भालण प'हिळाच' भारतीय कवि असाबा, भाळणला माहीत' होते की, बाणभट्टाची संस्थात भाषा विलक्षण विलष्ट व कठीण' आहें. पण भाळणने त्याचे सुलभ आख्यान? बनविले, 'कादंबरी' फक्त मोठे संस्कृत विद्ठानच समजू शकतील अशी आहे. पण भाळणने ती' सामात्य माणसाला समजावी अशा रीतीने रूपांतरित केली आहें व ती (लौकिव) भाषेत (गुजरातीत) अनुबादित केली आहे.
हा अनुवाद करताना भाळणने खूप संक्षेप केला आहें. त्याने काही गोष्टी पुर्णपणे वगळल्या आहेत तर काही आपल्या पदरच्या त्यात गोबल्या आहेत. साधारण माणसाच्या बुद्धीला सुगम होईल अशी रचना त्याने केली आहे. वत्वालीन भाषेच्या
मध्ययुगीन गुजराती साहित्य-१५ वे शतक : २५
दुष्टीने व' श्रोत्यांच्या बुद्धिमत्तेच्या व सांस्कृतिक पातळीच्या दृष्टीने जितका उत्तम अनुवाद करता येईल तितका कादंबरीचा उत्तम व सुंदर अतुवाद भाळणने केळा आहे.
भालणने केलेळे विध्याटवी, पंपा व अच्छोद सरोवरांचे वर्णन अत्युत्कृष्ट आहे. कथेतील पात्रांचे भावविश्वही त्याते फार सुंदर रीतीने व बारकाईने वणिले आहे. व त्यात काही प्रसंगी तर त्याच्या प्रतिभेने उच्च भरारी मारली आहे. उदाहरणाथ पोपटाच्या रूपात असलेला वैशंपायन, विध्याटवीत पारध्यांनी पोपटाच्या वस्तीवर कसा हल्ला केला ब त्यात दुसऱया अनेक पोपटांबरोबर आपल्या आईबापांनाही' कसे मारून टाकले, त्याचे दु:खमय वर्णन करतो ते सवे वर्णन अप्रतिम आहे.
पोपट म्हणतो, “ हे राजा, मी जास्त विस्तार कशाला करू ? कोणालाही' आपल्या जीवनाइतकी प्रिय वस्तु दुसरी कोणती' असू शकेल ? नाहीतर एका क्षणा- पूर्वीच माझा पिता भरण पातला ही गोष्ट मी' कशी' विसरू शकलो असतो ? आणि एवढ्या ह्या दु:खानंतर जिवंत कसा राहू शकलो असतो ? खरोखर माझ्यासारखा निदँय दुसरा कोणी तसेळ. माझ्या आई-बापांती माझ्यासाठी काय काय केले, ते मी सवे विसरून गेलो. माझ्या आई-बापांच्या वधाचे दुःख मी पचविले आणि मी स्वतः मात्र जिवंत राहिलो. खरोखर माझ्यासारखा दुष्ट दुसरा कोणीही नसेल.
भालण हा कवि म्हणूनही सुप्रसिद्ध होता. वात्सल्यभावाचे त्याने केलेले वर्णत अतुलनीय आहे. मध्ययुगीन गुजराती कवींपैकी ह्या बाबत काही थोडेच कवि त्याची बरोबरी करू शकतील. ह्या बाबतीत त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कवि तर दुसरा कोणीही नाही, त्याने आपल्या पदात राम व कृष्ण यांच्या बालळीलांचे वर्णन केळे आहे. त्यांनी केळेल्या निरतिराळ्या बालसुलभ खोड्या, चेष्टा व' माता-पित्यांचे त्यांच्या- वरचे प्रेम ह्यांचे फार रोचक वणंन त्याने एका कवितेत केले आहे. कौसल्या आपल्या रामाला शोधीत आहे. तो नजरेआड झाला आहे.
ती म्हणते, '" बायानो, कृपा करून माझ्या रामाला शोधू आणा, तो म्हणजे माझा प्राणच आहे. मी त्याला शहरभर कानाकोपर््यातही' धृंडून आठे. काहीतरी महत्त्वाचे काम' करण्यासाठी भी त्याला कडेवरून खाली उत्तरविळा आणि तेवढ्यात, अरे' देवा, माझं रत्न कुठेतरी नाहीसं झालं. सेवकांनो, आत्ताच्या आत्ता जा, पाणी प्यायलासुद्धा थांबू नका. जा, सगळी पृथ्वी पालथी घाळा आणि त्याला शोधून आणा.”* राजा दशरथ सुद्धा अतिएय अस्वस्थ होतो व' म्हणतो, ' जा, श'रयूच्या पाण्यात रामाचा शोध करा.” मग शेवटी कवि म्हणतो ' आणि भाळणांचा परमेश्वर त'र कौसल्येच्या मागेच लप'ला होता.
श्रीकृष्ण गोकुळ सोडून कायमचा मथुरेला जातो. त्याची पालक माता यशोदा तो परत येण्याची आतुरतेने वाट पहात क्षूरत असते.
२६ ! गुंजराती साहित्याचा इतिहास
* माझ्या गोड गोड 'गावजी', घरी परत ये. तू आता. मधूरेत फार श्रीमंत ब' एक्तिमात झाला आहेस, पण' हे. विसरू नकोस को तेथे तुश्याबर माझ्याइतव प्रेम कोणीही करणार नाहो. जर तू मला आपली आई मानायला तयार नसलास त'र भला निदान आपली वार्ड तरी मात. माझ्यावर तू एवबेळ जे प्रेम केळेस ते कोणीही दतक्या' ळवकर विसरून जाणार नाही, भाळणच्या प्रभु रघुनाथा, एक क्षणभर तरी त्या प्रेमाची आठवण कर.”
। आख्यान ह्या गुजराती काव्य प्रकाराचा भाळण हा जनक होय. नरसिंह भेहताच्या ' सुदामा चरित्रा'मध्ये आपल्याला आचद्यानाच्या पुर्वावस्थेचे बीज आढळते. आणि त्यानंतरच्या कावींमध्ये वीर्राशह, कर्मन, जनारदेत ब मंडन इत्यादींच्या काव्यात'-आल्यानाचे निश्चित स्वरूग भापणास दिसते, पण भाळणच्या * नलाख्यान ', ' मृगी आख्यान ' आणि ' दुर्वासा आख्यान ' वगेरे काव्यात, ज्याला आख्यान असे म्हणता येईल असे आखूय़ाताचे पूर्ण स्वरूप सिद्ध झालेले आपणास दिसून येते, भाळणने केलेळे ' कादंबरी ', 'दशमस्वंध' आणि' ' दुर्गा सप्तशती' (ज्याला तो 'चंडी आख्यान' म्हणतो) यांचे अनुवाद हे सुद्धा आड्याताच्या' रूपातच आहेंत.
एवंच अनुवादक, कवि व आख्याताचा जनवा म्हणून भालणची' मध्ययुगीन श्रॅठ गुजराती कवीमध्ये गणना होते.
नररासिह मेहता १४१४-१४८०
नरसिह् मेहूताच्या पुर्वी अनेक उल्लेखतीय गुजराती काव्यरचना झाल्या असल्या तरीही नरसिह मेहता ह्यालाच गुजराती काव्याचा 'जतव' मानले जाते. 'ह्याचे कारण नसे असावे की नर्राराह मेहतांच्या अनेवा कविता (विशेषवारून * प्रभातियां ' म्हणजे भूपाळ्या ह्या पिढ्यानपिढ्या चाळत आल्या आहेत. आणि भक्त वा कवी म्हणून नरसिहू मेहूताला शतकामुशतके गुजरातमधील प्रत्येक हिंदुच्या हृदयात फार भाताचे स्थान प्राप्त झाले आहे.
आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती. म्हणजे नरसिहपूर्व कवींची काव्ये नरसिंह मेहताच्या काळानंतर विततीतरी वर्षांनी गुजरातळा परिचित झाली. व' त्या काव्याची भाषा क्लिष्ट असल्यामुळे त्यांनी फवल' गध्ययुगीन गुजराती भाषा व साहित्याच्या काही अ'भ्यासू व विद्वानांनाच प्रभावित केळे,
: नरसिंह मेहताने आपल्या आयुष्यातील वित्येक महत्त्वाच्या प्रसंगांवर काव्य- रचना केली आहे. तक्षेच त्याच्या मागून झाळेल्या विष्णुदास, विश्वनाथ आणि प्रेमातंद ह्यांनी सुद्धा त्याच्या आयुष्यातील इत'र प्रसंगांवर आपली' काव्ये लिहिली आहेत. नरसिंह मेहतांचे जीवत, त्यात घडलेळे काही चमत्कार, तरसिंह मेहताच्या
मध्ययुगीन गुजराती साहित्य-१५ वे शतक ; २७
नावाने लिहिलेली कित्येक काव्ये, त्याच्या हृदयात एकाएकी प्रज्वलित झालेली भबतीची ज्वाला, आणि त्याच्या काही अती लोकप्रिय कवितांची भाषा अणि ज्या कविता फार छोकप्रिय झाल्या ताहीत त्यांची भाषा-ह्या दोन्ही भाषातील फरक हे सवे गुजरातमध्ये कितीत'री वर्षे लूप वादाचे विषय झालेले आहेत.
भारतातील अनेक संत. व भक्त' कवींच्या जीदनाप्रमाणे तर्रासह मेहतांचे जीवनही चमत्कारानी भ'रठेळे आहे ब त्यावर अनेक दंतकथा रचल्या गेल्या आहेंत. त्याचे विवेचन येथे करणे अप्रस्तुत आहे. फक्त' येथे काही निविवाद अशा त्याच्या जीवनातील सत्य घटतांचाच विचार करणे योग्य होईल.
नरसिंह मेहताचा जन्म सुमारे इ, स. १४१४ मध्ये 'तलाजा' येथे झाला. नंतर त्याने जुनागडला वास्तव्य केले, लहानपणीच आई-वाप मरण पावल्यामुळे नरसिंह मेहतांचे भरण-पोषण त्यांच्या चुलत भावाच्या घरी झाले, गिरनार पर्वताच्या दर्शनाला जाताना जुनागडला आलेले साधु-संत व संन्यासी ह्यांना भेंटणे त्याला लहानप'णापासूनच आवडत असे आणि त्यांनी' म्हठलेळी भजने व॒ त्यांची धर्गचर्चा ऐकणे त्य़ाला फार आवडत असे, ह्यामुळे, व सांसारिक गोष्टीमध्ये त्याचे मन ज'राही' लागत तसल्यानेही, त्याचे आप्त-मित्र त्याच्यावर नाराज झाले. त्यांच्याकडून मिळालेल्या वाईट वागणुकीमुळे व त्याच्या भावजयीने मारलेल्या टोमण्यामुळे त्याचे मत विषण्ण झाले आणि मग कंटाळून तरुणपणीच नरसिहने गृहत्याग केला. तो एका अरण्यात गेला. फिरता-फिरता त्याला एक शिवलिंग सापडले. त्या शिव- लिंगाकडे कित्येक वर्षेपर्यंत कोणाचे लक्षही गेळे नव्हते. त्याने काही दिवस भवति- भावाते त्या शिवलिंगाची पूजा केली, नंतर तो द्वारकेला गेला. तेथे त्याने "रासलीला”"* पाहिली.
ह्या 'रासलीले'चा त्या तरुण कवीच्या मनावर फार खोल असा परिणाम झाला. त्याची कल्पनाशकिति उद्दीपित झाली व तो खरा कवि बनला. द्वारकेहून तो जुत्तागडळा प'रत' आला तेव्हा तो अगदी बदलून गेलेला होता. त्याने लग्न केले; € पण' सांसारिक गोष्टीकडे त्याच्या मनाचा कल मुळीच नव्हता. त्याचा संसार दारिद्रयोत कष्ठमय रीतीने चालला होता. पण त्याच्या अडचणीच्या वेळो' त्याला अचानक कोठून तरी मदत' मिळत' अशे व तो संकटातृत पार पडत असे. त्याचा मृळगा शामळ ह्याच्या विवाहाच्या वेळी व त्याची भुलगी कुंवरबाई हिच्या 'सीमंत' प्रसंगी त्याला अशीच ईशएवर कृपेने मदत' मिळाली. त्यांचे सवे जीवत श्रीकृष्णाला संपूर्णपणे सर्मापेत झालेळे होते. तो इ, स. (४८० मध्ये ईश्वरचरणी विलीन झाला.
नरसिहृ गेहताची' ग्रंथसंपत्ती खूप मोठी आहें. ग्रंथांची नावे 'हारमाळा”, 'शामळशानो विवाह', 'गोधिद गमन', 'सुरत-संग्राम', 'सुदामा-चरित्र', "रास-
२८ ! गुजराती साहित्याचा इतिहास
सह्षपदी' व' 'बाळ-लीला', 'दान-ळीळा', 'बरांत', "हिंडोळा' ही पदे व 'भक्ती, ज्ञान व वैराग्यविषयक' पदे, नरसिह् मेहताच्या तावाब'र असलेळी पाही पदे त्याचीच आहेत की काय हचावबद्दल विबाद आहे. 'हारमाळा' ह्या काव्याची 'रचनाही' नरसिह मेहताची आहें की' नाही ह्याबद्दल शंका आहे.
“हारमाळा' हया काव्यात नरसिहाच्या देप्ट्यांनी केलेले त्याच्या विषयीचे आव्हान श्रीकृष्णाने स्वीकारले व आपल्या विषयीची' त्याची भक्ती अभंग व भचल आहे हें सिद्ध करून दाखविले अशी हकीधत आलो आहे. त्याच्या शत्रूनी त्याला एकांतवासात एका खोलीत बंदिस्त करूत ठेवले होते. तेथे श्रीकृष्णाने' स्वत': त्याच्या गळ्यात फुलांची माळ घातली. 'हारमाळे'तीळ हया प्रसंगावरची' तेवढी' पदे निश्चित' नरसिह मेहताचीच आहेत. इत'र मात्र त्यात नंतर घुसडण्यात आली असावीत.
'गोविंद ग्रमन”, 'सूरत-संग्राम' व 'सुदामा-वरित्र ही तरसिह मेहतांनी रचलेली तीन आख्याने आहेत'.. आछ्यासाचे पूर्णावस्थेरा पोहोचलेले स्वरुप जरी ह्यात पाहावयास मिळत नाही तरी भागवतातील वर्ण्ये धिपय निवडून त्याला सुंदर आश्यानाचे रूप दिलेले येथे दिगून येते.
“गोविद-गमन? : अक्रूर गोविदाला (श्रीकृष्णाळा) गोकुळातून मथुरेला घेऊन जातो हघाचे' वर्णन हया काव्यात आहे. श्रीकृष्ण दुर जाणार हया कल्पनेनेच गोपींची जी' विकल भावावस्था होते त्याचे सुंदर करण चित्रण ह्यात केले आहे.
'सुरत-संग्राम' ह्यात युद्धाच्या स्वरूपात एका बाजूला श्रीक्रष्ण व' त्याचे गोपबन्धु व दुसऱ्या बाजूला राधा व गोपी ह्यांनी फरस्परांशी केलेल्या प्रेमचेष्टांचे वर्णन आहे.
'सुदामा-चरित्र' सुवामा : हा. एक गरीब म्राह्मण व श्रीकृण्णाचा गुरुबंधु दारिद्र्याचे पीडळेला असतो. श्रीकृष्ण द्वारेचा राजा झालेला असतो. सुदामाची पत्नी त्याला आग्रह करून श्रीकृःणाकडे जाऊन त्याच्याबाडून काही मागून घ्या फ्हणून सांगत असते. तो तिकडे जाण्यास नाराज अरातो. पण' ऐवढी त्याच्या पत्नीच्या अत्याग्रहाने तो जाण्यास तयार होतो. श्रीकृष्णाला भेटतो वगैरे गोष्टींचे वर्णन या काव्यात फार प्रभाबीपणे केलेळे आहे. वरील तिन्ही भाख्यानात ' सुदामा चरित ' हे. आख्यान सर्वात उत्तम आहे,
नरसिंह मेहताने ' रास सहस्रपदी'' व 'शुंगार-माळा ह्या पुस्तकात' शेकडो पंदे लिहिली आहेत. तसेच श्रीकृष्णाचा जन्म, ब त्याच्या बाळपणातील खोड्या व विविध लीळा ह्यावर अनेक पदे त्यांने आपल्या ' दान-लीला'!१" व' ' रास-लीला ! ह्या काव्यात लिहिली. आहेत. त्याशिवाय भवती, क्ञान व' वैराग्य ह्यावरही' त्याने पंदे लिहिली' आहेत,
गुजरातमध्ये असे एकही घर नसेल की जे प्रत्येक दिवशी' पहाटे नरसिह
मध्ययुगीन गुजराती साहित्य-१५ वे शतक : २९
मेहताच्या 'प्रभातियां'ती दुमदुमले नसेळ. आणि हा क्रम दशकानृदशके चाळत आला आहे'. त्याची बाल-लीलांची पंदे-त्याच्या काही ओळी अशा आहेत, “ बाळा या. पाण्यातूत निघून जा कसा. कारण माझा नाथ आत्ता जागा होईल” १ (कालिया नागाच्या बायकोने कृष्णाला उद्देशून म्हटळेले बोल),
यशोदा कृष्णाला म्हणते-“ यादवा, ऊठ, गोपालकृष्णा, जागा हो, तुझ्या शिवाय गाईंना रानात चरायला कोण बरं नेईल? 7१२
तसेंच ज्ञात, भक्ती व वैराग्यपर पदांच्या काही पहिल्या ओळी, “ आकाशा- कडे बघ. तो आकाशात फिरणारा कोण आहे ? तो सारखा कोणता मंत्र म्हणत आहे? सो$5हं, सो5हं हाच तो ध्वनि. 702
“ज्या क्षणी मी जागा होतो त्या क्षणीच मला जग दिसेनासे' होते. झोपेत मात्र मला नाना प्रकारचे भोग स्पष्ट दिसतात.”१ ४
“खरा वैष्णव त्यालाच म्हणावे' ज्याचे हृदय दुसऱ्याचे दुःख पाहून द्रवते”१'"*
* सच्चिदानंद आतंदाने क्रीडा करीत आहे व सोन्याच्या पाळण्यात बसून झोके' घेत आहे."
नरसिंह हा खरा भक्त व खरा आत्मनिष्ठ कवि होता. त्याच्या मुखातून निघालेला प्रत्येक उद्गार त्याच्या सत्निष्ठेचा द्योतक आहे. त्याने आपल्या जादूच्या कांडीने' तत्त्वज्ञानाला काव्याचे रूप दिले आहे व ह्याच किमयेने त्याची ज्ञान व वैराग्यपर पदे त्याच्या श्रेष्ठत्वाची प्रचीति आणून देतात. पण त्याची भक्ती' विषयक पदे अतुलनीय आहेत आणि त्यातच त्याचे समग्र जीवन व तत्त्वज्ञान समाविष्ट झालेले आहे. त्याच्या' दृष्टीने “ भक्ति म्हणजे ह्या जगातील अलौकिक व एकमेव' अशी' वस्तू आहे की, जी अह्यालोकात सुद्धा मिळणार नाही.”?१४
पदानाभकृत * कान्हड दे प्रबंध! ( १४५६ ) : हें पक्षताभाने लिहिलेले ऐतिहासिक्र काव्य आहे. “रणमल्ल छंदा'तील नायकाप्रमाणे ह्या काव्याच्या नायकाने एका रजपुत' राजाने-सुसल्मानांविरद्ध दाखविलेल्या शौर्याचे व धेर्याचे वर्णन ह्यात बहारीने केलेले आहे. ही चार भागांची एक दीर्घ कथा आहे. करण वाघेला हा गुजरातचा शेवटचा रजपूत राजा होय, माधव हा त्याचा प्रधान. काही व्यक्तिंगत' भांडणामुळे आपल्या धन्याचा सूड घेण्याच्या इच्छेने तो दिल्ढीहा जातो व तो अल्लाउहीनत खिळजीला गुजरातवर हल्ला करून गुजरात जिंकून घेण्यासाठी आमं- भरण देतो. झालोरचा राजा कहनाड दे हा अल्लाउद्दीनच! सेनापति अलफखान ह्यास आपल्या सैन्यासह झालोर मधूत पुढे जाण्यास मनाई करतो.
अलूफखान रस्ता बदलून दुसऱ्या मार्गाने गुजरातेत येऊन हल्ला करतो व करण वाघेलाचा संपुर्ण पराभव करतो. परत जाताना तो झालोरवर चाल करून जातो, पण कान्हूड दे त्याची डाळ शिजू देत नाही व अलफक्षाताच्या सैन्याची' तो
३० ! गुंजराती साहित्याचा इतिहास दाणादाण उठवितो. वाही दिवसांनी अल्लाउदीन स्वत; झाऊोरबर चालून येतो. झालोरच्या बाळेकिल्ल्यातोल सामियांना तणावाच्या पाण्यात, वात्तल नोलेल्या१ ५ गाईचे रक्त मिसळून, ते पाणी' तो अपवित्त वारतो. ब अण रोतीने झालोरचा पाण्याचा पुरुपठा बंद वाझन झालोरळला बेडा घालतो. रजपूत णरणागती' स्वीकारीत नाहीत, १२ वर्षेपर्यंत घनघोर लढाई चाळते. १९ वर्षानंतर स्वत:च्या बहादुरीने ताही पण एका नीच तोकराच्या फितुरीमुळे अल्लाउद्दीन एका गुप्त मार्गाते विल्ल्यात' प्रवेश करतो, तेथेही घनघोर लढाई होते. पण त्यात' दुदेंबाने काळ दे हा मारला जातो.
अल्लाउद्दीनाची' मुलगी 'पिरोजा' हिचे वान्हूड देचा पुन 'वीरम दे' ह्याच्यावर प्रेम जडते. पण तो ति'च्यावर प्रंम करणे तर राहोच पण तिचे तोंडही पाहूण्यारा तयार नसतो. कवीने वर्णन' केळे आहे. त्याप्रमाणे त्याला मुरालमानांचा शतका तिरस्कार ताटतो वी लढाईत मरण पावल्यावर त्याच शिर काशन ते' जेंव्हा एका थाळीत घालून पि'रोजाच्या गुढे तेळे जाते तेन्हा तिचे तोंडडी पहावे लागू नये म्हणून ते शिरच विरुद्ध दिणेळा वळते. ! हे. पाहून पिरोजाचे हृदय 'गग्न होते व ती यगुनेत उडी टाःवून जीव देते,
कवीने पराभूत झालेल्या मुसलमानांची दाणादाण, रजभूत स्त्रिप्रांचा जोहार," 'कन्हानड दे', त्याचा भाऊ 'माल दे', पून 'पीरम दे' व इतर रजपूत ह्यांची बहादुरी च धैर्याची कृत्णे ह्यांचे तपशीलवार हुबेहुब वर्णन केळे आहे.
माधवने- एका हिंदूने आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी हिंदु धर्माचे दुष्मन असलेल्या मुसलमानांना आमंत्रण वेऊन आपल्या देणाचा नाश कळून त्याला उध्वस्त केल्याबद्दळ कवीने भोवनांनी हेलावून जाऊन त्याचा तीन्न शब्दात निषेध केला आहें. तसेच त्याने सोमनाथ शंवरालाही बोष दिला आहे, कारण भुसलगातांनी शिवलिंग* ० हरण करून मेळे त'री सोमनाथाने ते शांतेगणे सहुतत केळे. तो म्हणतो, “ हे सोमैया, पद्यताथ तुळा विचारतो. आहे-. तू. आपला श्रिणूळल तोठे ठेवला आहेस' ? 7९१
'हूरिलीला षोडश कला? (१४८५) - ह्यांचा कर्ता भीभ' कवि, ते बोगदेवाच्या' संस्कृत' ' हृरि-हीळा-विवेक ' ह्यापर आधारित' आहे. ह्यात भागयत्ाची' वाथा १६ अध्यायात विस्तारपूर्वक बाणिली आहें व अशा रीतीने भागवत' ह्या ग्रंथाचा सार- भागच ह्यात आणला आहे. भीमाने ' प्रबोध-अबाण ' पाथिता रुपाने लिहिला आहें. कृष्ण मिश्राच्या संस्कृतमध्ये लिहिळेल्य़ा ' प्रवोध-घंद्रोबय ' ह्या रूपकात्मक नाटकाचे ते ख्पांतरच आहे.
कसन संत्रीचे ' सीताह्रण ' (१४७०)- ह्यात' रामायणाची कथा थोडक्यात
सांगितळेली आहे. लक्मण व सीता यांच्यासह राम वनवासात जातो येथपासून तो 'वनवासातुन राम विजयी होऊन अयोध्येला परत येईपर्यंतचा कथाभाग त्यात
मध्ययुगीन गुजराती साहित्य-१५ वे शतक : ३१
वणिलेला आहें. ललित' काव्यरचनेचे विशेष काव्यगुण ह्यात आणण्याचा कवीने फारसा प्रयत्न केलेला नाही. कर्माची गति कणी गहून आहें हे वाचकांच्या मनावर बिंबविण्याचा विशेष प्रयत्ल कवीने ह्यात केलेळा दिसतो. ह्यात २-३ प्रसंग सोड- ल्यास कवित्वाची चमक फारशी' दिसून येत नाही. ते प्रसंग असे-- रावणाने सीतेचे' हरण केल्यावर रामाने केलेला शोक, तसेंच रावणाची' पत्नी मंदोदरी' रावणाला रामाशी' वेर करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्व करते' व म्हणते, “ तुम्हाला २० डोळयांती' दिसले नाही ते मी' एक स्त्री फक्त दोत डोळ्यांनी पाहू शकते,” २२ हा प्रसंग बहारीने वाणिळा आहें. तसेच राम-रावणाच्या युद्धाचे वर्णनही फार सुंदर रीतीने केले आहे.
त्या वेळच्या रिवाजाप्रमाणे हा लेखकही आपल्या श्रोत्यांना समोर ठेऊनच आपल्या विषयाचे प्रतिपादन करतो. आपल्या श्रोत्यांच्या-वाचकांच्या कल्पना- शक््तिला पेलता येतील आणि त्यांना आवडतील असे' प्रसंग तो रामायणातुत' निवडतो, पण स्वतःच्या पंदरच्या काही गोष्टी अथवा दुसः्याकडून उचललेल्या गोष्टीही तो त्यात मिसळतो.
१५ व्या शतकात श्रीकृष्णाप्रमाणे श्रीरामाची गौरव गाथा गाण्यातच कवि रमत असत, हे ह्या उदाहरणावरून स्पष्ट दिसुन येते. ललित साहित्याची रचना करणे हा त्यांचा तेथे मुख्य उदेश नसतो.
तळरिपा
१. आ पासा व्यास वांचे संस्कृत, आ पासा माहासं प्राकृत, कथाप्रसंग एकु नव पडे, 'चाल्यो जाउं सूधे शरडे. २. कुपया परिशिष्ट 'फ' पहा. १. राय ! घणूं स कहोए कथी ? प्राण समुं काई वाहालुं नथी. नहितरि ततक्षण मूओ तात, ते सवि वीशारि मि वात'. तेह वेदता दारुण सही', मुझ सभ को निष्ठुर नहि. १०१५०० ००८५-* .-०*-*-.: सुझ' वीशारिओ उपकार
३२ : गुजराती साहित्याचा इतिहास
जननी जनक गयां परलोक, ते गि बीशारिओसवि णोक
देह राखया कर्य उपाय; कोए दुष्ट मुझ शरुवु, राथ ? ४. कुपया परिशिष्ट 'ग” पहा. ५. बाई, कोई बतातो. मने राग लाला,
हुं तो शोधी बळी संघळा बाळा
में तो केडेथी उतार्यो कण काम पड्युं,
मारी नजर चूकी ने रूडुं रतन रडु.
ओहो ऊठो अनुचर, पाणी' पौजो पंछी.
जुओ ऊठो अनृत्तर, जुओ चारे देण.
राजा राताताता थाय, करो सरज्युमां शोध, भोलण प्रभु रघुनाथ भरणा कौणल्यानी गोद.
६. मीठडा मावजीरे, मारे मंदिर आवो मथुरा रिद्धि पाम्या घणी, वाध्युं छे अतितेज रे, सही' जाणजो सारा सरखुं को तहि आणे हे जरे. माता नहि थाउं तमारी, धाव कहीने जाणो रे. ते दौधो तेम कोय दे नाहि प्रीत करीने छेह रे. भालण प्रभु रघुनाथ ! संभारो एक घडी तो नेह्रे ॥
७. अनेक स्त्री-पुरुषांच्या जोड्यांनी केलेले नृत्य. हे नृत्य लालित्यपूर्ण व तालबद्ध असुन त्यात गोल-गोल फिरावयाचे असते. आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला यमुना नदीच्या तीरावर गोकुळात श्रीक्रप्णाते गोपींसमवेत केलेल्या ' रास ! नृत्याची आठवण अथवा स्मरण म्हणून हे नृत्य ('रास') केळे जाते.
८. काही विद्वानांचे असे मत आहे की त्यांचे लग्न अधी झालेले होते,
९, 'सोमन्त -स्त्री पहिल्याने गरोदर असताना तिच्या सातव्या महित्यात हा सामाजिकर-धार्मिक समारंभ केला जातो.
१०. मथुरेला गोपी दही दूध विकायला घेऊन जात असता त्यांच्याकडून घेतलेला कर म्हणजे ' दान,
११. जळकमळदळ छांडा बाळा, स्वामी आमरो जागणे.
१२९. जागने जादवा कृष्ण गोवाळिया, तुज बिता धेनुमां कोण जाण?
१३. तीरखने गगनमां कोण घूमी रह्यो ते ज हुं ते ज हुं शब्द बोले!
१४.
१५. १६.
१७. शट. १९,
२०.
“२९१, रर.
गुजराती साहित्याचा इतिहास-- १५ चे शतक । ३३
जागीने जोऊं तो जगत दीसे नहि,
ऊंघमां अटपटा .भोग भासे.
वैष्णवजन तो तेने रे कहिए जे पौड पराई जाणे रे.
सच्चिदानंद आनंदक्रीडा करे,
सोनानां पारणाभांहि शूले.
भूतळ भक्ति पदारथ मोट, ब्रह्मलोकमां नाही रे
हिंदूंच्या मते गाय ही भाता व देवांचे निवासस्थान आहे.
रजपूत योद्धे * मरू किंवा शत्रूला भारू ' असा दुढ निश्चय करून जेव्हा
अंतिम गृद्धासाठी बाहेर पडत तेव्हा रजपूत स्त्रिया जळत्या चितेत उडी टाकून आत्मघात करून घेत असत. तोच 'जोहार'.
शिवलिंग-विशवाच्या आदि पुरुष तत्त्वाचे आणि भगवान शिवाच्या जनने- द्रियाचे प्रतीक.
पद्यताभ पुछई सोमैया ! केथऊं करं निणूल ? लोचन बेहूइ हुं देखू, तुझ फूटां वीस !
गुत्सा,इ. २७७ -]
प्रकरण चवथे
सोळावे शतक
[१]
मीराबाई [ १४९९-१५४७]
मीराबाईचा जन्म राजस्थातात झाला, गुजरातेत न्नाही, तरी' पण तिला गुजराती' कवयित्रीच मानण्यात येते. 'ह्याचे कारण असे कौ मीराबाईने ज्या भाषेत कविता केल्या, तिला' डॉ. टेसी' टोरी जुनी' पश्चिमी राजस्थानी भाषा म्हणतो आणि ती राजस्थोन व गुजरात ह्या दोन्ही प्रांताची भाषा होती. मीराबाई तरसिह मेहता इतकी'च लोकप्रिय असल्यामुळे तिची पदे हिंदू लोकांच्या जिभेवर नाचत होती व पिढ्यान्पिढ्या 'चालत' येत. होती. दशकानुदशके असे चालल्यावर ती' भाषा प्रदेशानुसार बदलत' गेली. शब्दांच्या उच्चारात व शब्दांच्या रूपात फरक पंडत' गेला व काही काळानंतर मीराबाईच्या कवितांची भाषा गुजरातेत ' गुजराती ' व राजस्थानात ' राजस्थाची ' म्हणून गणली' जाऊ लागली', शिवाय आपल्या आयुष्यातील शेवटची १५ वर्षे भीराबाईने गुजरातेतच' द्ारबोमध्ये आपले वास्तव्य केले होते.
इतर अनेक भारतीय साधू-संतांप्रमाणे मीराबाईच्या जीवताशीही भनक 'चमत्कारांच्या दन्तकथा तिगडीत' झोल्या आहेत. तिच्याविषयी' जी' काही भाहिती उपलब्ध झाली' आहे ती' अशी आहे. राजस्थानातील 'मेडता” 'ह्या गावी' अदमासे' इ. १४९९ मध्ये तिचा जन्म झाला. बाल्यावस्थेपासूनच तिचे आजोबा राव दुदाजी ह्यांनी तिच्या हृदयात श्रीकृष्ण भक्तींची भावना उद्दीपित केली, श्रीक्षष्ण हे त्यांचे कुलदैवत होते. ती १८ वर्षांची झाली तेव्हा तिचा विबाह चितोडचा राणा कुंभाजी ह्याचा नातू भोजराज ह्याच्याशी झाला. विवाहानंतर थोड्याच वर्षात भोज राजाचे अवसान झाळे व मग' विधवा कलेली मीरा अधिक तीव्रतेने कृष्णभक्तीत' लोन झाली. ती' जसजशी संन्यासी व साधु-संताच्या निकट संपर्कात येऊ लागली तसतसे तिच्याबद्दल अनेक अपप्रवाद पसरू लागले. तिचा दीर वित्रमसिह॑ 'ह्याते
सोळावे शतक : १५
मीराबाईने साधु-संतांची संगत सोडून रजपुतांच्या परंपरेला शोभेल असे गृहुजीवन पाळावे म्हणून खूप प्रयत्न केले; पण तिची.नातलग मंडळी ति'ला कृष्णभक््तीपासूत जसजशी परावृत्त करू लागली' तसतसे तिचे कृष्णभकक्तीचे वेड अधिकच वाढत गेले. जव्हा ह्या सर्वांनी केलेला जाच सहन होईना तेव्हा तिने चितोडचा त्याग केला. ती मेवाड सोडून प्रथम मेडता येथ व तेथून वृत्दावनला गेली, आणि शेवटी द्वारकेत जाऊत राहिली. ह्ारका हे 'चार धामां'पेकी एक आहे. 'धाम' म्हणजे हिंदूनी 'मानलेली' सर्वात पवित्र स्थाने.) तेथे तिने आपल्या प्रितम कृष्णाची भक्ती काही' अडथळा न येता! अगदी तन्मय होऊत केली', व इ. १५४७ मध्ये तेथेंच तिने आपला देह ठेवला. न
कृष्णाबद्दल मीरेच्या हृदयात अढळ अन् अपार प्रेम होते. तिची कृष्णाबद्दलची तीद्न प्रेमाने भरलेली पदे पाहता तिला गुजरातची नुसती पहिली कवयिची न म्हणता सवंश्रेष्ठ कवयित्री म्हंटले पाहिजे. गुजरातमध्ये तरसिह मेहताप्रमाणेच तिचे नाव घराघरातून सर्वांच्या जिभेवर ताचत आहे. ती गुजरातप्रमाणच उत्तरप्रदेश व राजस्थानचीही फार लोकप्रिय कवयित्री आहे. ज्यातील शेवटची ओळ ' बाई मीरां के प्रभु गिरिधर नागर '* अशी आहे, अशी ऐकडो पदे आहेत; पण त्यापैकी २५० पदे खास तिचीच आहेंत. बाकीची पदे दुसऱ्या कोणीतरी रचून विनयानें किवा लोकप्रियता मिळविण्यासाठी भीराबाईच्या नावावर खपविली आहेत, मध्य, युगीन भारतात आपण कविता लिहुन त्या कोणा तरी लोकप्रिय लेखकाच्या नावा- वर खपविणे ही काही. तावित्याची गोष्ट नव्हती. नरसिंह मेहताच्या व' कबीराच्या नावावर अशी शेकडो पदे आहेत.
मी'राबाईची भक्तिपर पदे कृष्णाविषयीच्या तीत्र प्रेमासक्तीने ओथंबलेली आहेत. मीरेचा उपास्य देव श्रीकूष्ण हा भगवदूगीतेतील योगेएवर कृष्ण नसून गोकूळात' गोप-गोपींबरोबर क्रीडा करणारा गोपाळ आहे. तो आपल्या मुरलीने सर्वांना भोहेविणारा आहे. त्याच्या डोक्यावर मोरविसांचा मुकुट आहे. मीराबाईच्या दृष्टीने तो प्रत्यक्ष तिच्याजवळ आहें. तो तिच्या प्रेमाचे एकमेंच स्यात आहे. तो तिचा जीवता-जाभता हृदयेए्वर आहे. तिचे सर्वस्व आहे. तिचे सर्व जीवतत कृष्णभक््तीने व्यापून गेले आहे. तिचे त्याच्यावरचे प्रेम फक्त ह्या जत्मातीलच नाही; पण ते पूर्वीच्या अनेक जन्मापासून चालत आलेले आहें. तो तिचा चिरसलखा आहे. मीराबाईने ह्या प्रेमाच्या वेलीला आपल्या प्रेमाश्रूंचे पाणी घालून सतत वाढविले आहे. अनेकदा तिला असा भास होत असे की, आपल्याला श्रीकृष्ण प्रत्यक्ष भेटला आहें. अशा वेळी उद्भवणाऱ्या आतंदोर्मी तिला भारावून टाकतात व तो अत्यानंद पदाच्या किवा नृत्याच्या रूपाने प्रगट होतो; पण एकीकडे ती कृष्ण विरहाने वेडी झाळेली प्रेमिका आहे. विरहाने ती दुर्बळ झाली आहे व ती इतकी कृश झाली आहें की, तिच्या बोटातील अंगठी तिच्या हाताचे कंकण म्हणून बरोबर बसेल,
३६ ! गुजराती साहित्याचा इतिहास
इतकी तिची विरहृव्यथा तीन्न आहे. विरहिणीच्या तीव्र वेदनांचे घ' व्यथेचे वर्णगही तिच्या पंदांतून मूतिमंत झाळे आहे. कुष्णामध्ये विळीन होण्यासाठी ती तिती आतुर झाली आहे तेही तिच्या पदातून स्पष्ट होते तिची पदे फार उच्च कोटीची आहेत. तिच्या पदातील प्रेमभक््ती' व काव्य- गूणही इतकी प्रभावी आहेत. की, ऐकणाऱ्याच्या हृदयावर त्याचा खोल ठ्सा ैसटल्याशिवाय राहणार नाही व गुजरात त्या पदांना कायम जतन करून ठेवील, उदाहरणार्थ तिच्या काही पदांच्या पहिल्या ओळी पोहा- ५ हे प्रिया, मी तुझ्या मुखाच्या दर्शनाने मोहून गेले आहे.” ? हे राणा, मळा एक खेळणे खेळायळा मिळाले आहे. ते खेळणे म्हणजे 'माझा' राम.”४ “ राणाजी, आम्ही जाणून बुजून हे विषांचे प्याठे प्यायलो आहोत'.'”* ५ मंदिर अगदी जीर्ण झाले आहे आणि त्यातील 'हृंस'६ अजून अगदी' लहात आहे. "७ ५ प्रिमा, आज त'री भला दर्गान दे, ”€ ही सर्व .पदे चिर-स्सरगीय आहेत. तिच्या सवे पदांचा विषय मात्र एकाच “आहे. तो म्हणजे 'प्रेम' व त्या प्रेमाचे दोनच' पैलू भाहेत-- कृष्णाशी मीळन व त्याचा ॥विधोग'; पण' त्यातही विविध मनोवृत्ति व भावनांचा अविष्कार झालेला आपणास दिसून येतो. मी'राबाईची कृष्णाला भेटण्याविषयीची तळमळ, त्या तळमळींची तीव्रता, तिची अस्वस्थता, कृष्णप्रेमासाठी' सर्वस्वाचा त्याग करण्याचा तिचा लिएचय, श्रीकृष्णाला केलेले सवस्वाचे संपूर्ण समरण, आपल्या प्रियतमाच्या दर्णनाते किंवा त्याच्या प्रावलांचा नुसता आवाज ऐकून तिला 'झाळेला अत्पुत्माटं आनंद, ह्या सर्व भावला 'तिंच्या कवितात' प्रगट झाल्या आहेत. व त्या सर्व मध्यमुगीत गुजराती काव्यात अतुलनीय आहित'
नरसिह व भोराबाई (एक तुलनात्मक दृष्टिक्षेप)
गुजराती काव्याचे दोन अमंर कवि म्हणजे नरसिह मेहता व भौराबाई 'ह्या दोघात' बरेच साम्य आहे. दोघे प्रथम पहिल्या प्रतीचे भक्त व नंतर वावि आहेंत. दोंघांनाही आपल्या अढळ भक्तिमुळे आपल्या नातेवाईकांकडून अत्यंत त्रास व छळ सहन करावा लोगंला त्यांचे नातेवाईक' सांसारिक ऐहिक सुखात गढूंन गेलेले. होते व त्यांच्या दृष्टीने काहीही करून ऐहिकं सुखे प्राप्त करून घेण हें महत्वाचे होते.
सोळावे शतक : १७
नरसिह मेहता व गीराबाई ह्या दोघांना देवी चमत्कारांचा अनुभव आळा होता, असे ते म्हणतात. तसे'च दोघांनाही 'भावी पिढीने जो मान व मोठेपणा दिर्ला तो त्यांच्या समकालीनांकडून त्यांना मिळाला नाही.
दोघांचीही कविता अंतःप्रेरणेतून उस्फूर्त झालेली आहे. आपली' भक्तीची आसक्ती प्रगट करण्याचा त्यांचा मार्गे कविता हा एकच होता; पण त्यांच्या भक्ती इतकीच त्यांची' काव्येही उत्कट व खरीखुरी प्रामाणिक आहेंत. त्या दोघांनीही स्वतःशी कधीच प्रतारणा केली' नाही, व ज्यावर त्यांचा विश्वास नव्हता असे काहीही कधीही दुसऱ्यांता सांगितले नाही.
मीराबाईपेक्षा नरसिहाची काव्यसंपदा विपुल आहे. दोघांच्याही काव्यांता कृप्णभक्तीपासूनच स्फूर्ती मिळाळेळी आहें. पण मीराबाईच्या काव्यापेक्षा नरसिहाच्या काव्यात विषयांची व कथानकांची विविधता जास्त दिसते. तरी सुद्धा केव्हा-केव्हा मीराबाईची कविता नरसिंहाच्या कवितेपेक्षा श्रेष्ठ वाटते कारण मीराबाईचे हृदय हें एका गोपीचेच खरोखर निखालस असे' हृदय आहे.
मीराबाईच्या काव्यावरून असे दिसून येते की, तिचे कृष्णाशी असलेले नाते हें एका अगदी निकटच्या आप्ताशी' असावे' तसे' आहे; पण तर्रसिहू व श्रीकूष्ण ह्याचा अन्योन्य संबंध मात्र भवत' भगवात असाच राहिला आहे. मीराबाईच्या' काव्यात जे शब्दांचे लालित्य, भावनांची कोमळ्ता, अभिजात रुचि दिसून येते तितक्या प्रतीची नरसिहांच्या काव्यात विसून येत नाही, भीराबाईच्या काव्यात प्रेमाची आतेता स्त्रीसुलभ भावनेमुळे ज्या स्वाभाविकपणे व सहजतेने प्रगट झालेली आहे त्याचा नरसिहा'च्या काव्यात अभाव दिसून येतो.
[२]
सोळाव्या शंतकात' एक मीराबाई सोडली'; त'र दुसरे कोणतेही मोठे कवि किंबा कुठलीही श्रेष्ठ काव्यरचना आढळत' नाहीत; पण अशो, प्रेमातंद व शाभळ ह्या तीन मध्ययूगीन अमर कवींसाठी' पावेंभूमि तयार करणारे काही लहान मोठे कवि मात्र होऊन गेले. ह्यापेकी मांडण' बंधारो (इ, १४८०) ह्यांच्यात जगाकडे पाहण्याची' सूक्ष्म अवलोकन शकक्ती' होती' व सांसारिक रीतिभातींचा अनुभव होता. त्यांचे 'रामायण? हे काव्य व ' रुक्मांगद कथा ' हे भल्यानही' सामान्य गुणवत्तेची काव्यें आहेत'. त्याच्या ' प्रबोध-बत्रिशी ' ह्या काव्यात चौपाई छंदातील (प्रत्येक ६ ओळींचा) २०-२० 'छप्पे' असठेले असे ३२ भाग आहेत. हे एक उपदेशपर काव्य आहे. माणसांचे अज्ञान, धर्मातील दंभ वगैरे दुर्गृणांवर त्याने कठोरपणे प्रहार केळे आहेत. म्हूणी' व चटकदार व्याजोक्तींचा उपयोग त्याने ह्यासाठी केळा आहें ब लोकांना शहाणपणाचा ब सुविचाराचा मार्ग अनुसरण्यास सांगितले आहें
१३८ : गुजराती साहित्याचा इतिहास
उदाहरणार्थ “ मूर्ख माणसाला तुम्ही जवळ बोळावलेत; त'र तो दुर निघून जाईल तुम्ही त्याला थांबविलेत तर तो रागावेल. कुत्र्याची शेपटी सहा भहिते मातीत पुरून ठेवा तरी ती सरळ होणार नाही. मूर्खाला उपदेश करा तो आरडाओरडा करील. गंजलेले लोलंड (सुरी) कधीही तीक्ष्ण होणार नाही.”"
मांडण जरी साधारण प्रतीचा कवि होता तरी नवल हे आहें की, त्याने आपल्या मागून शंभर वर्षांनी झालेल्या अखो ह्या मध्ययुगातील प्रल्यात कवीला फोर प्रभावित केले आहे.
नाकर [इ. स. १५०० ते १५७५]
हा बडोद्याचा 'रहिवाशी होता व जातीने बाणी होता. त्याने पौराणिक भ्रसंगांवर अनेक आख्याने रचली आहेत. त्यापैकी ' शिव विवाहू ', ' ळवकुशाख्यान ', । विराट पर्व ', ' तलाख्यान ', ' ओखाहरण ' ही नमूद करण्यासारखी आहेत.
नाकरने रामायण व महाभारत ह्यातील कित्येक अध्यायांचेही गुजरातीत' रूपांतर केले आहे. भालण हा कवि मूळ संस्कृतात फार फेरफार करीत तसे, पण नाकरने मूळ संस्कृत कथात खूप फेरफार केले आहेत. आपल्या पदर'चे असे त्यात खूप घातले आहे. आपल्या काळातील समाजाचे प्रतिबिंब त्याने त्यात दाखविले आहें आणि अशा रीत्तीने आपल्या वाचकांना त्याने मुग्ध करून टाकले आहे. 'ह्या बाबतीत तो प्रेमानंदाचा पुर्वगामी असून भालण व प्रेमानंद यामधील एक दुवाच आहे.
नाकर ब्राह्मण' तसल्याते त्याला आपली आल्याने माणभट्टा"* प्रभाणे जाहीर रीतीने म्हणण्याचा अधिकार नव्हता; म्हणून ती आख्याने आपल्या श्राह्म'ण' मित्रांना देऊन तो त्यांच्याकडून लोकांपुढे म्हणवून घेत असे' व त्यावर ते ब्राह्मण मित आपली उपजीविका चालवीत असत.
केशव हदेरास
हा कवीसुद्धा ग्राह्मण नव्हता. त्याचा जन्म 'पाटण' येथे झाला. त्याने द. १५३६ मध्ये ! कृष्ण क्रीडा ' नावाचे काव्य रचले. त्याचे ४० अध्याय आहेत व त्यात ७००० मोळी आहेत. हें काव्य भागवताच्या दशमस्कंधावर आधारित आहे. ते प्रासादिक व सरळ सुलभ शेळीत' लिहिलेले आहे. त्याचा १३ वा अध्याय' सर्वच्या सर्वे शार्दूलविक्रीडित वृत्तात आहे. ह्या वृत्ताचा उपयोग संस्कृत महाकाव्यातून करण्यात येत असे. ह्या रचनेत मधून मधून ब्रजभाषेतील पदे घातली' आहेत. त्याचप्रमाणे संस्कृतमध्ये लिहिलेले १०० शलोक त्यात आहेत. त्यापैकी १५ कब्रीने' स्वतः रचलेले आहेंत.
सोळावे शतक : ३९
विष्णुदास [ इ. स. १५६४ ते १६३२]
ह्याचा जन्म ' खंबायत ' येथे झाला. त्याने अनेक आख्याने लिहिली, त्यातील लक्ष्मणाहरण', ' शुकदेवाख्यान ', ' चंद्रहासाख्यान ', ' सुधन्वाख्यान ! ही विशेष उल्लेखनीय आहेत. विष्णुदासाने महाभारताच्या व रामायणाच्या अनेक अध्यायांचे भाषांतरही केळे आहे. त्याने ' मोसाळुं ' व हुंडी ' ही आशयाने लिहिली. ह्या आख्यानांचा विशेष हा आहे की' आतापर्यंत गुजराती भाषेत एकाद्या देवाच्या किवा दैवी शक्ती असलेल्या व्यक्तीच्या चरित्रातील एकाद्या प्रसंगाचे काव्यात वर्णन केलेळे असे'; पण' ही दोन आख्याने एका सामान्य माणसाच्या-एका भक्ताच्या-नरसिह मेहताच्या जीवनातील प्रसंगावर रचलेली आहेत. प्रेमानंदाने ह्या दोन आख्यानातून व * लक्ष्मणाह्रण ' व ' सुदामा चरित्रातून ' बरीच उसनवारी केलेली आहे.
* माधवानल कमलकन्दला दोग्धक ' हे गणपतिरचित' फद्यावतं आहे. म्हणजे ह्यात दोन-दोन पंक्तींच्या अनुप्रासात्मक द्विफ्ययांच्या २५०० पंकक््ति आहेत. 'ह्याचे आठ.भाग' आहेंत. माधवानल हा नायक कमलकन्दला ही' नायिका ह्यांच्या प्रेमाची' कथा ह्यात वणिली' आहे. कमलकन्दला ही एक सुसंस्कृत गणिका आहे. ह्या दोघांचा वियोग होतो. ह्या प्रकारच्या इतर काव्यांपेक्षा ह्या काव्याचा विशेष हा आहे की' ह्यात नायकाच्या विरहदुःखाचे हूदयस्पर्णी वर्णन केले आहे. शृंगार हा ह्या काव्या- तीक मुख्य रस असल्याने काव्याच्या सुरुवातीला कवीने कामदेवाला वंदत-आवाहून केले आहे.
गणपती'च्या ह्या काव्यात', तसेच कुशललाभ वाचक ह्या कवीने लिहिलेल्या वरील विषयावरील ' माधवातल कामकुंडला रास ' ह्या काव्यात आपल्याला त्यानंत'र १०० वर्षांनी' झालेल्या शामल कवीची अगोदरच चाहूल लागते.
कुशल लाभाने ' मारू ढोला वृपाई ' (इ. १५६१) हे भाणखी एक प्रेम- काव्य लिहिले आहे. ह्या काव्याचा नायक ढोला अथवा साल्ह्कुमार ह्याचे 'बालपणी' मारवाडमधीळ मारुवनी' अथवा माझ? * हिच्याशी लग्न होतें; पण त्याळा ह्या लग्नाची आठवणही रहात ताही व तो मोठा झाल्यावर ' मालवा'ची राजकन्या भालवानी हिच्याशी' लग्त करतो,
ढोला आपल्याला बोलावील म्हणून मारू वाट पहात असते. तिला त्याच्या मालवानीशी झालेल्या लग्नाची बातमी समजते; पण ढोलाचा विरह सहन न होऊन ती त्याला ' कर्ल्यु ' पक्ष्यामापीत' व दुसऱ्या अनेक दूतांबरोबर संदेश पाठवते; पण माळवानीच्या कारस्थानामुळे ढोलाला एकही संदेश पोहोषत नाही. शेवटी' भ्रमण करीत' आलेल्या काही' भाटांकडून ढोलाला मारूचा संदेश मिळतो. मालवानीच्या विरोधाला व दुःखाला न जुभातता तो मारूकडे जातो. त्याच्या मार्गात अनेक
४० : गुजराती साहित्याचा इतिहास
विघ्ने येतात. तो पार करून तो मारूला घरी घेऊन येतो. मग मारू व भालवानी दोघी. सरख्या बहिणींप्रमाणे राहून त्याजा गुखी करतात.
हा काव्यात मारूच्या विरहृव्यभेचे ब मालवानीच्या ढोलावरच्या प्रमाढ प्रेमाचे फार सुंदर वर्णन केले आहे.
' रसमंजरी' ' (इ, १५७९) हें काव्य वच्छराजाने एका लोककथेच्या आधारे लिहिले आहें. प्रेमराज हा ह्या बाथेचा नायक. तो जेव्हा प्रवासास निघतो तेव्हा त्याची पत्नी प्रेमवती त्याला परत येताना ' स्त्री चरिच्ष ' ( स्त्रियांच्या प्रणयातील कारस्थानाच्या चतुर कथा) आणावयास सांगते.
प्रेमराज एका शह्रात' जातो. तेथे त्याला रसमंजरी' नावाची सुंदर युवती भेटते. ती धनाशेठ ताबाच्या एका मोठ्या व्यापाऱ्याची पुत्नवधू असते. रसमंजरी'चा नवरा प्रवासास गेलेला असतो. एका चतुर गणिकेच्या साहाय्याने' प्रेमराज स्त्री- वेषात' रसमंबरी'च्या महाळात' राहावयास जातो, रसमंजरीला काही. दिवसांनी' तो पुरुष असल्याचे कळते व ती त्याच्या प्रेमात पडते. ती' त्याला प्रेमशास्त्रातील
' स्त्रियांचे चातुये कसे' असते ते शिकविते. नंतर ती' आपल्या पतीचा बध करविते व' सासऱ्याला फसवून प्रेमराजाबरोबर निघून जाते.
आपणास शामळूचे काव्य वाचताना या कश्रेची' आठवण होते. खरे म्हणजे ही' एकच सळग कथा नंसुून अत्तेक कथांचा संग्रह आहे. आणि त्यामध्ये स्त्रीचे अंग- भूत व्यावहारिक चातुर्य चित्रित केलेले आहे.
तळटिपा'
१, राहिलेली इतर तीन स्थाने (धाभे) : उत्तरेकडे बद्रिनाथ, पुर्वेकडे जगभा.थ- पुरी' व' दक्षिणेकडे रामेश्वर ही आहेत.
२. बाई मीरा के प्रभु गिरधर नागर. ३. समुखडानी माया लागी रे. ४, राभरमकडुं जड्युं रे राणा, ५. झेंर तो पौधां छे जाणी जाणी, राणाजी !. ६, 'हुंस- येथ्रे त्याचा अर्थ 'आत्मा' असा आहे. ७. जुनं तो थयु रे देवळू जूनं तो थर्भू,
मारो हंसळो नानो रे देवळ जूनुं तो थय.
सोळावे शतक : ४१
८. प्यारे दरसन दीज्यो आज.
९. आणीतां आधेरु जाय, वारीतां वांकेरु थाय.
*: स्वान पुंछ नली खट मास, तुहि न छंडई वंक अभ्यास ” शीख देअन्ता साहमुं भडई, मुलि लोहिन पोगर चडइ.
९-&. घागरीवर ताल धरून आख्याने सांगणारा भटू. परिशिष्ट 'फ' पहा.
१०. त्यावेळी असा' रिवाज' होता की राजदरबारात निरनिराळ्या राण्यांचा उल्लेख त्यांच्या पित्यांच्या-कुटुंबाच्या नावाप्रमाणे करण्यात येत असे. (उदाहरणार्थ, 'जाडेजी राणी, 'हाडी राणी' वगैरे) अथवा राण्या ज्या प्रदेशातून किवा ग्रावाहून आलेल्या असत त्या प्रदेशाच्या नावावरून त्यांचा उल्लेख करण्यात येई. (उदाहरणाथ 'मारुबानी', 'रोहा-वाळां बा! वगेरे)
प्रकरण पाचवे
सतरावे शतक
[१]
ह. स. १५७३ ते १७५३ पर्यंत गुजरातवर मोगल सुभेदारांची सत्ता होती; पण दिल्लीची' मोगळ रात्ता जसजशी दुबळ होत' गेळी तसतशी गुजरातमध्ये राजकीय अस्थिरता, अंदाधुंदी माजत गेली. तशात अवषंणे, दुष्काळ, अन्नधान्याची' टंचाई व महागाई वगेरे गोष्टींमुळे गुजरातेत अशांतता पसरली आणि त्यामुळे अहमदाबादेत जाळपोळ, बंडखोरी, लुटाळूट ह्या दररोजच्या बाबी होऊन बसल्या. अकबराच्या कारकीर्दीत सोराष्ट्रात धोळजवळ भूचरमोरी येथे भीषण लढाई झाली. अकबराच्या निधनानंतर ब्रिटिशांनी पोर्तुगीजांचा पराभव केळा व सुरत, घोघा, अहमदाबाद व खंबायतमध्ये आपल्या कोठ्या स्थापन केल्या, इ. स. १६०९ मध्ये भलिकंबरने सुरत लुटली. नंतर औरंगजेबाच्या कारकीर्दीत जामतगर व चुनवल येथे बंडे झाली, शिवाजीने दोनवेळा हल्ले करून सुरत लुटली. औरंगजेब हयात असतानाच मराठ्यांचे वर्चस्व वाढत' चालले. त्यांची लोभी दृष्टी गुजरातवर पडली व त्यांचे हल्ले चालूच राहिले. इ.स. १७०५ मध्ये व नंतर इ.स. १७०७ साली पुन्हा मराठांनी सुरत शहर लुटले. त्या आधी इ. स. १७०२ मध्ये त्याती सुरतमध्ये करवसुली सुरू केलीच होती. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तर गुजरातेत संपुर्ण अंदाधुंदी व राजकौय अस्वस्थता माजली, हा काळ मराठ्यांना फार सोईचा व अनुकूल असा वाटला व त्यांनी गुज'रात- वर हल्ले करण्यास सुरुवात केली. शाहू छत्रपतींनी' इ. स, १७०२ साली बादणाहू महंमदशाहकडून गुजरातेतुन चौथाई वसुल करण्याची सनद मागून धेतली आणि इ. स. १७३२ मध्ये दमाजीराव गायकवाडांनी गुजरातेत गायकवाडी सत्ता स्थापित केली. पुण्यात पेशवाईची सत्ता जशी' दुबळी होत गेली तसे' गुजरात व सौराष्ट्र येथीळ मराठे सरदार स्वतंत्र झाळे व इ. स. १७५३ मध्ये त्यांनी आपले स्थान तेथे स्थिर केले.
पण ह्याच काळात गुजरातमध्ये ब्रिटिशांची सत्ताही वाढत 'चालली', ते' फक्त व्यापारधंद्याकडेच लक्ष देऊन स्वस्थ बसले नाहीत; तर आपल्या बळाच्या
सतरावे शत्तक : ४३
मोरावर एका ठिकाणच्या मराठी सत्तेला दुसर्या मराठी सत्तेशी लढाईत गुंतवीत' राहून त्यांनी गुजरातमध्ये बरीच ठाणी काबीज केली आणि इ. स. १८०५ मध्ये त्यांनी मराठ्यांकडून सुरतेत चौथाई वसुल करण्याचा हक्क मिळवला.
सौराष्ट्राच्या (त्यावेळी त्याला काठियावाड असे म्हणत) लोकांचे मराठ्यांच्या हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी इ. स. १८०७ मध्ये कर्नल वॉकर काठियावाडच्या राजेरजवाड्यांना भेटला व ब्रिटिशांनी त्यांना देण्यात येणार्या संरक्षणाच्या बदल्यात त्यांच्याशी खंडणी घेण्याचा करार करून घेतला. इ. स, १८१८ मध्ये पेशवाईचा अंत झाल्यावर गुजरातमध्ये ज्रिटिशांची सावेभौम सत्ता स्थापन झाली.
[२]
अश्लो [इ. स. १५९१ ते १६५६]
मध्ययुगीत गुजराती साहित्यात ' अखो ' या कवीला एक स्वतंत्र मानाचे स्थान आहे. वेदान्ती तत्त्वज्ञान व ईश्वरीय अनुभव 'ह्यातून त्याने फार सुंदर काव्य- रते पैदा केली आहेंत. त्याला काव्यापेक्षा ज्ञाताची जास्त अभिलाषा होती.
त्यांचे विषयी जी खरीखुरी माहिती मिळते त्यावरून त्याचा जन्म जेतलपुरला झाला असे दिसते. तेथूत तो अहमदाबादला गेला व तेथेच स्थोईक झाला. जातीने तो सोनार होता. सांसारिक संबंध व पैसा-अडका ह्या बाबतच्या विफलतेने व्यथित होऊन त्याने अहमदाबाद सोडले व आपणास आत्मज्ञान देईल अशा गुरुच्या शोधार्थ तो बाहेर पडला. तो गोकुळ, श्रीनाथजी व काशी ह्या प्रसिद्ध याघेच्या क्षेत्रात गेला; पण तेथून निराश होऊन परतला.
वयाच्या अदमासे ५० व्या वर्षापासून त्याने लिहिण्यास प्रारंभ केला व १५-१६ वर्षे त्याचे लेखत चालू राहिले. त्याची ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे आहे - ' पंचीकरण', 'गुरुशिष्य संवाद ', ' चित्तविचार संवाद ', ' ब्रह्मलीला ', (हिंदीत), 'कंवल्यगीता', ' अनुभव-बिदु”, ' अखेगीता ' आणि ' ७४६ छप्पे ' ह्याशिवाय त्याच्या नावावर 'परमपदप्राप्ति', ' पंचदशी ', 'अखाजीना कक्का' इ, ग्रंथ आहेत'; पण' त्यांचा खरा कर्ता कोण ह्याबद्दल विवाद आहे.
अखो याने. आपला पुवंगामी कवि ' मंडन ' 'ह्याच्यापासुन बऱयाच गोष्टी घेतल्या आहेत. तत्त्वज्ञानातून' काव्यनिर्मिती करणे, चौपाई छंदात' ६-६ पंक्तींचे' “छुप्पे' बनविणे, भर्थवाही वाक्संप्रदाय व म्हणी वापरून आपले म्हणणे स्पष्ट करणे, स्वार्थी व भोंदू गुरुंची बिगे बाहेर पाडणे, सामाजिक व धामिक ढोंगावर प्रहार करणे, ह्या गोष्टींचे अनुकरण तर त्याते केलेच आहे; पण त्याने मंडनच्या काही ओळी' तर जशाच्या तशा घेतल्या आहेत. व॒काही थोडे फार फरक करूत घेतल्या आहेत.
४४ : गुजराती साहित्याचा इतिहास
१) पंचीकरण-
हे अखो याच्या साहित्य निगितीतीळ पिठे काव्य. १०२ फएळोकात अस्वोने सांख्य तत्त्वज्ञानाच्या प्रणालिकेप्रमाणे विश्बाची उत्पत्ति, स्थिति ब लय ह्यांचे वर्णन केले आहे. ह्यात श्रेष्ठ काब्यगुण नाहीत; पण ह्घातील सुगम व सहज प्रतिपादनणेली' वाखाणण्याजोगी' आहे. ह्यात कबीने जटिळ तत्त्वजातग'र विपयरांचे सुंदर विवरण केळे आहे.
२) गुरु-शिष्य संवाद-
ह्या ग्रंथात 'अखो'ने शिप्यास असा उपदेश केला आहे की, त्याते. (शिण्माने') गुरुची जातपात, सामाजिक दर्जा ह्याविषयी निचा'र वारू नसे. हयात त्याने खऱ्या गुरूची लक्षणेही सांगितळी आहेंत आणि सरतेशेवटी शिष्याळा स्थतःच आपा गुरु होण्याचे ध्येय ठेवण्यास शिकविले आहे.
३) चित्र-विचार संवाद-
ह्यात अखोने ठासून सांगितळे आहे की, प्रत्येकाच्या हृदयात वरात असलेला प्रभु गोविद हाच खरा एकभेव गुरु आहे. ह्यात त्याने जीव व शिव हृथांच्या परस्पर संबंधाचे विवेचनही' केले आहें. काव्यगुणांच्या दृष्टीने हे काव्य' बरच्या दोन्ही काव्यांपेक्षा अधिक सरस आहे. ४) अतुभव बिंबु-
ही लहानशी पण सुंदर कविता आहे. हयात ४० एलोव आहेत. हयात' अखोने मायेच्या स्वरूपाचे' वर्णन केळे आहे आणि जीव व ब्रह्मा ह्यांच्यातील अहेततत्त्वाबर भर दिला आहे. जीव, जगत् व म्रह्मा (अन्तिग सत्य) हयांच्या एपामेकांशी असलेल्या
, संबंधाचे स्वतःच्या अनुभवावरून वर्णन वेळे आहे. हो. सर्ब काविता एखाद्या
निर्क्षराच्या पाण्याप्रमाणे निमंल ब प्रसादपूर्ण आहे ५) अखे गीता-
ही 'अखो' याची शेप्ठतम रचना' आहे. खोळ व गंभीर चिंतन करून आपल्या जीवनातील अनुभवांचे सारसवंस्व अखोने ह्यात बणिळे आहे. सरळ, प्रासादिक व स्पष्ट भाषेत कदीने ह्या ग्रंथात चित्तपक्ति, मायाशव्ति व प्रकृतिशक्ति हृयांचे खरे स्वरूप आणि ज्ञात, भवति व वराग्य ह्यांचा भहिमा व वैभव वणिळे आहे. तसेच जीव, ईश्वर व कैवल्य (ब्रह्म) ह्यांच्या अद्वेताचे वर्णन केळे आहे. मोयेळा काचेचे घर संबोधून अखो म्हणतो की, 'ही तीन वस्तुतः एकच आहेत; पण मायेमुळे ती तत्त्वे निरनिराळी भासतात. (इंग्लिश कवि शेलीने 'आयुष्य हे विविधरंगी काचेचा घुमट [ तञा8 ] आहे ' असे म्हटले आहे त्याचीच येथे आठवण होते).
एका दृष्टीने पाहता 'अखो' याने आपल्या पुर्वीच्या काव्यातून जे जे काही सांगितले आहें त्याचेच पुनरावरतन 'अखेंगीता' यात सुंदर व मुद्देसुद रीतीने केळे
सतरावे शतक : डप
'आहे. आपल्या ह्या आध्यात्मिक यात्रेच्या शेवटी सिद्धीच्या प्राप्तीचे आनंदित झालेला 'अखो'चा आत्मा उद्गारतो, ' अहाहा ! आजपर्यंत माझ्या इंद्रियांना अगम्य असे जे काही होते त्या 'काही'चा म्हणजे सत्याचा साक्षात्कार झाल्याने मला केवढा आनंद झाला आहे.”)
* छुप्पे ' प्रमाणेच ' मुक्तके ' (स्फुट एलोक) लिहिणेही 'अखो'ची विशेषता 'आहे. तो आयुष्यभर 'छप्पे' रचत होता. 'अखो'ने ७४६ छप्पे लिहिले व॒ विषयाप्रमाणे त्याचे निरनिराळे ४५ भाग (अंगे) केले. एकेक छप्पा ६-६ ओळींचा असून चौपाई छंदात लिहिळेला आहे. ह्या सुटसुटीत, चटकदार व झोंबणाऱर््या छप्प्यामाफेत अखोने ईशएवराचे प्रेषित व लाडके भक्त अभ् साधु म्हणून मिरवणाऱ्या लोकांचा ढोंगीपणा, दंभ व द्वेषबुद्धी ह्यावर आणि तत्कालीन समाजाच्या खोटेपंणावर कठोर प्रहार "केले आहेत. त्याच्या सुक्ष्म दृष्टीला प्रत्येक गोष्ट स्पष्ट दिसते. त्याची शब्दांची' योजना अचूक व अर्थ स्पष्ट करणारी आहे आणि अशा प्रभावी शब्दांद्वारे "त्याते त्या वेळच्या समाजातील व धर्मातील दूषणे उघड करून दाखविली आहेत. 'भाषा हे 'अखो'च्या हातातील सहज वापरता येणारे असे प्रभावी शस्त्र होते. “अखो'ला जे काही सांगावयाचे असते ते तो स्पष्टपणे व निःसंदिग्धपणे सांगतो. 1तो त्यावेळी भाषेचीही पर्वा करत' नाही. तो रोजच्या व्यवहारातील शब्द, म्हणी, वावप्रचार व दृष्टान्त यांचा उपयोग करून आपले म्हणणे स्पष्टपणे मांडतो. -ह्याचमुळे अथोची गुजराती भाषेतील हेकडो वचने सर्वतोमुखी झाली' आहेत.
नरहरी” हा 'अखो'चा समकालीन (इ. स. १६२१ साली हयात होता) त्याने भभवद्गीतेचे पहिल्यानेच गुजरातीत' भाषांतर केले आहे. * ' विश्वनाथ जानी ', याते दुसर्या इतर रचनाबरोबरच 'मोसाळचरित्र' हें काव्य लिहिले व त्यावरूनच बहुत करून प्रेमानत्वास आपले अमर काव्य 'करुंवरबाईन मामेर' हें लिहिण्याची स्फात क्षाली असावी. ह्या काव्यात नरसिंह मेहताची मुलगी कुंवरबाईच्या 'सीमन्त' समारंभाची कथा वणिली आहे. 'ह्याशिवाय विश्वनाथाने 'प्रेम पच्चिशी'ही लिहिली. ही कविता भागवतातील एका प्रसंगावरून केळी आहे. ह्यात कृष्णाच्या वियोगाते' अत्यंत व्यथित झालेल्या गोपीकडे उद्धव श्रीकृष्णाचा संदेश घेऊन येतो तो प्रसंग वर्णिला आहे. हें काव्य अत्यंत हृदयस्पर्शी आहे. नररासिह् मेहताच्या ' हारमाळेत. ! आढळणारी काही पंदे विशवनाथाची आहेत असा अभ्यासकांचा समज आहे.
शिवानंद [इ. स. १६०० ते १६४४]
ह्याने केलेल्या भक््तिपूर्ण आरत्याबद्दल हा प्रसिद्ध आहे. ह्या आरत्या देवाच्या भूतिपुढे नीरांजन ओवाळून घंटा, शंख इतर वाद्यांच्या नादाबरोबर समूहाने म्हणावयाच्या असतात. शिवानंदाने देवाच्या दिनचर्येतीळ एकूणएक प्रसंगावर
४६ ! गुजराती साहित्याचा इतिहास
आरत्या रचल्या आहेत. उदाहरणार्थे-देवाचे स्तान, वस्त्रे, भोजत, 'भोगणूंगार वगरे. हरि व हर-विष्णु ब शिव ह्यात सांप्रदायिव 'भवत' भेद करीत असत त्याचा निषेध करून हे दोघे मूलतः एकच आहेत असे' त्याने प्रतिपादिले आहें.
तो म्हणतो, ' हरि ब हर ' हे. एकच आहेत. त्यांना एकमेकापासून शिन्न मानू नका. तुम्ही भोळ्या भूधराचे स्मरण केल्यास भवसागर तरून जाळ.
शिवानन्दाने श्रीकृष्ण, शिव व शक्तिमातेच्या आरत्या रचल्या आहेत. त्या आरत्या आजही गायल्या जातात'. शिवानंवाच्या काही कविता हिदी किंवा ब्रजभापेत लिहिलेल्या आहेत.
महाकवि प्रेमानंद [इ. स. १६३६ ते १७३४]
प्रेमानंदाने आपल्या विविध आख्यानांनी आख्यान हा काव्यप्रकार उच्च- कोटीस पोहोचविला. प्रेमानंबाच्या आख्यांनात तरुण व वृद्ध, निरनिराळ्या संस्कृतीचे स्त्री-पुरुष ह्यांची व्यक्तिचित्रे आहेत आणि त्याने आपल्या अनुपम निवेदनशैलीने त्यांच्या जीवनातील निरनिराळ्या प्रसंगांचे व परिस्थितीचे सुंदर वणेत केले आहे. हे प्रसंग विविधतेने भरलेले आहेत. ते. विनोदी तसेच करुण रसांचे आहेत; पण केव्हा केव्हा ओबड-धोबडही आहेत. मध्ययुगीन वत्रींमध्ये वास्तवलक्षी म्हणजेच वस्तुनिष्ठ कवि म्हणून त्याचे स्थात सरवेश्रेष्ठ आहे.
प्रेमातंदाचे जीवन व निर्मिती ह्याबद्दल अनेक दन्तकथा प्रचलित आहेत. त्याच्या नावावर असलेली अनेक आख्याने त्याचीच आहेत. किंवा काय ह्याविषयी वाद आहे. ह्या ठिकाणी हा गोष्टींचा विस्तारपूर्वक विचार करणे शक्य नाही; म्हणून येथे निविवाद अशा गोष्टींबद्दल लिहिणेच योग्य आहे.
ह्याप्रमाणे पाहता प्रेमानंदाचा काळ निश्चितपणे इ. १६३६ ते १७३४ हा होता. त्याच्या लेखनकळेची सुरुवात अदमासे १६७६ मध्ये झाली व त्याचे लेखत १८ व्या गरतकाच्या पूर्वार्धात चालू होते. त्याच्या लहानपणीच त्याचे. आई-बाप वारले व तो अनाथ झाला. त्याच्या वडिलांचे नाव कृष्णराम भट्ट व त्याच्या गुरुचे नाव रामचरण असे' होते. प्रेमानंद बडोद्याचा रहिवाशी होता व' त्याने कीर्तन- काराचा पेशा पत्करला होता. बडोदा व त्याच्या आसपास त्या सुमारास भयंकर दुष्काळ पडल्याने तो काही काळ उदरनिर्वाहासाठी सुरतेस जाऊन राहिला. त्यानंतर काही काळ तो नंदुरबारच्या राजाच्या आश्रयाखाली नंदुरबारला राहिला. तो कथाकार म्हणून फार लोकप्रिय झाला व त्याने अमाप पैसाही मिळवला,
प्रेमानंदाच्या आयुष्याच्या पहिल्या पाच भागात गुजरातेत एकंदरीत स्थिरता व शांतता होती; पण मराठ्यांचे हल्ले, दुष्काळ, अन्नधान्याची टंचाई आणि अश्न- धान्य व रोजच्या जीवनोपयोगी वस्तूंच्या अफाट किमती ह्यामुळे १६६४ पासून
सतराचष शतक :» ०७
हौ परिस्थिती पार बदलली आणि प्रेमानंदाच्या आयुष्याचा बराचसा भाग अंदा- धुंदी व अव्यवस्था ह्यांच्या वातावरणातच गेला.
' “' 'पण लोकांच्या देववादी वृत्तीमुळे जसा काळ येईल तसे त्याला शांतपण तोंड देणे हें त्यांना सहज करता येत होते व त्यामुळे राजकीय अस्थिरतेचा फारसा परिणाम' लेखकांच्यावरही झाला नाही. प्रेमानंदही स्थितप्रज्ञतेने आपले लेखनकार्य करींत होता.
प्रेमानंदाच्या साहित्यकुतींची संख्या फारच मोठी आहे. त्याने रामायण, महाभारत व भागवत यातल्या कथानकांवरून आपली आख्याने लिहिली आहेत. 'तसेचं . त्यातें : नरसी मेहताच्या जीवनातील चमत्कारपुणं प्रसंगांवरही आख्याने रचली आहेत. त्याच्या नावावर असलेल्या वादपु्णे कुती वगळता त्याने आपल्या ४५ वर्षांच्या लेखनकालात ४० आख्याने तरी निश्चितच लिहिली आहेत'.
प्रेमानंदाची बरीच आल्याते धामिक ग्रंथच म्हणून मातली जातात. ती विशिष्ट धार्मिक व सामाजिक उत्सव-समारंभात वाचली जात. असत' उदाहरणाथे, त्याचे ' ओखाहरण' चंत्र व वेशाख ह्या महित्यात, ' दशमस्कध चातुर्मासात, 'मामेरु॑ ' ' सीमन्त'प्रसंगी (ओटीभरण प्रसंगी) 'तरसी मेहताना बापनुं श्रा'' श्राद्धाच्या वेळी, दर शनिवारी ' सुदामा चरित्र ', ' हुंडी ' दर रविवारी' व '7देवींचरित्र' नवरात्रातः अशी त्याची काव्ये गुजरातच्या बऱ्याच घरात श्रद्धापूर्वक व निष्ठापूवंक वाचली व म्हटली जात असत. त्याची विशिष्ट आख्याने विशिष्ट प्रसंगी गायली जाण्याची प्रथा प्रेमानंदाच्या मृत्यूनंतरही १०० वर्षे चालू होती.
जगातील अनेक श्रेष्ठ साहित्यिकांप्रमाणे .प्रेमानंदाने आपल्या पूर्वगामी लेखकांच्या ग्रंथातून तिःशंकपणे उसनवारी केलेली आढळते. ह्यामध्ये मुख्यत्वे' ' नाकर ', ' विष्णुदास ' व ' विश्वत्ताथ जाती ' हे होते.
*ह्या' लेखकांनी रचलेल्या अथवा वर्णन केलेल्या प्रसंगांचाच त्याने उपयोग गोला आहे एवढेच नाही त'र त्याते त्यांच्या काव्यातील काही पंक्ति जश्याच्या तशाच तरी उचलल्या आहेत. अथवा त्यात थोडा फार फरक करून लिहिल्या *ओंहेत. '
१). नलाण्यात-
प्रेमानंदाच्या सर्व॑ आख्यानात ' नलाख्यान हे सर्वात श्रेष्ठ व सुंदर आख्यान ओहे..ही नलसजा व त्याची राणी दयमन्ती ह्यांची कथा आहे. अधर्मी कलीच्या कारवायानी' नलदमयंतीला राज्याचा त्याग करून वनात जावे' लागते. वनातून भटकत असताना त्यांची ताटातूठ होते. नंतर त्या दोघांवर निरनिराळ्या भयंकर 'औपत्ति कोसळतात व 'सरतै शेवटी त्यांच्या सत्त्वाची कसोटी झाल्यावर कली त्यांना 'सौडूनं जातो. मग त्या दोघांचे सुखद पूनमिळत होऊन त्यांना राज्य प्राप्ति होते व
४८ : गुजराती साहित्याचा इतिहास
ते पुन्हा सुखी होतात, हा नळाख्यानांचा कथाभाग आहे. प्रेमानंदाने महाभारतातील नलोपाख्यावरून हे कथातक घेऊन त्यात नवनवीन प्रसंग कलिके आहेत. आणि आपल्या अनुपम निरूषणशेळीने व' तर्णनशेळीने ते अतिशय रंजक व' सुंदर बनविले आहेत. प्रेमानन्दाने मूळ कथानकात केलेले सर्वे बदल जरी उत्कृष्ट आहेंत असे म्हणता येणार भसळे तरीही 'नलाख्यात' हे एक शेष्ठ काव्य आहे ह्यात काही शंका नाही. प्रेमानंदाने ह्या आख्यानादील काही विनोदी व काही करूण प्रसंग फारच .सुंदर रीतीने वणिले आहेत. दममन्तीच्या, पहिल्या स्वयंवराच्या वेळी इंद्र, आअग्ति, वरुण व ग्रम हे चार देव दमयन्तीशी लग्त करण्याच्या इच्छेने नलराजाचे रूप धारण करतात; पण शेवटी त्यांची कशी फटफजिती' होते हा प्रसंग आणि नलराजाचा शोध घेण्यासाठी दमयन्तीचे दुसरे स्वयंवर होते. त्यावेळी दमयन्तीच्या प्राप्तिच्या इच्छेने क्रतुप्णे राजा येत. असता स्वतःच्या अतिशय मोठेपणाच्या 'कल्प्लेने कसा वागतो, त्याचा घमेंडखोरपणा व बडबड कशी हास्यास्पद होते हा प्रसंग ह्या दोन्ही प्रसंगाचे वर्णन करताना विनोद साधण्याची प्रेमानंदाची शैली 'फारच बहारीची बठली आहें. तसेच नलराजाने त्याग केल्यावर एका घोर अरण्मात रात्रीच्या वेळी एकटी पडळेली' दमय्रन्ती करण विलाप करताता जेव्हा म्हणते, “ हें “हरी, तू सत्याचा बाली आहेस; फण सला सात्र कोणाचाच आधार नाहो." तेव्हाचा प्रसंग आणि तिच्या भावशीच्या राजमहालात असताना तिच्यावर आलेला हार चोरल्याचा आरोप हे दोन प्रसंग तर करुणरसाने ओथंबलेले आहेत. नंदुरबारला असताता कबीच्या आश्रयदात्या राजाच्या पत्नीचे निधन झाले. “त्याचे सांत्वन करण्यासाठी कवीने हे आख्यान रचले असे म्हणतात. २) दशमस्कंध- 1 . . प्रेमानत्दाने दणमस्कंध आपल्या आयुष्याच्या शेवट-ऐेवटच्या काही' वर्षात लिहिला. ५१२ अध्यायानंतर प्रेमानंदाच्या मृत्यूमुळे तो अपुरा राहिला. तो त्याच्या ,' सुंदर मेवाडो ' नावाच्या एका णिष्याते पुर्ण केला. भागवताच्या दशमस्कन्धाचे, विशेषत: त्यातील श्रीकृष्णाच्या बाललीलांचे, व त्याने केलेल्या अनेक खोड्यांचे वणेन हा अनेक मध्ययुगीन गुजराती कवीच्या , आख्यानांचा व पदांचा विषय झालेला आहे. प्रेमानंदाने भागवताच्या दशमस्कंधाचे केवळ भाषांतर केलेळे नाही. .त्यात १ फेरफार करून, काही भाग स्वतःचा घालून व काही वगळूत त्याने त्याचे उत्कृष्ट : रू्पान्तरच केळे आहे. ह्यात अत्यंत हळुवारपणे केलेले माता-पित्यांच्या *'वात्सल्याचे आणि घरगुती कोमल कौटुंबिक भावाचे वर्णन फार रोचक आहे. हें सवं प्रेमानंदाचे स्वत:चे आहें. तसेच त्याने देवकी ब थशोदा ह्या दोषींच्या द्वारे
सतरावे शतक : ४९
केलेले कोमळ भातृभावाचे वणन अतुलतीय आहें. मातूप्रमातील निरनिराळ्या छटा-स्वामित्व, भीती, अविश्वास, ईर्ष्या ह्यांचे त्यातले दर्शन फारच मनोहारी आहे. ३) सुदामा चरित्र-
आपल्या गरीब मित्राचे, सुदामाचे, सोन्याच्या राजप्रासादांमध्ये ऐश्वर्यात राहणाऱ्या श्रीकृष्णाने कसे सत्कारपुदेक स्वागत केले, त्याला आपला स्वत:चा पाहुणा म्हणून कसे अगत्याने वागविळे व॒ सुदामाला स्वतः होऊन काही मागूतन्त घेण्याची लाचारी करू न देता, कोणाला काही कळू न देता, स्वतः कशी मदत केली, 'ह्या सवें प्रसंगांचे फार सुंदर वर्णन यात केलेले आहे. ह्यात प्रेमातंदाने श्रीकृष्णाच्या खट्याळपणाचे वर्णन फारच सुंदर केळे आहे. तसेंच कृष्णाने दिलेले वस्त्रालंकार काढूत ठेवून सुदामा प'रत' जाताना पुन्हा आफ्ले जुने फाटके कपडे घालतो व हे सवे श्रीकृष्ण मनातल्या मनात' हसत स्वस्थपणाने पाहात. असतो, ह्यांचे फारच विनोदपुणे वर्णन केलेले आहे.
नरसिह मेहताच्या 'सुदामा-चरित्रात त्यातील ठोकळ प्रसंगच वणिलेले आहेत; पण त्या प्रसंगावर रचलेले प्रेमानंदाचे आख्यात मात्र पूर्ण स्वरूपात आपल्याला पहावयास मिळते. ह्यात प्रेमानंदाच्या निरूपण कलेला, व्यवतिचित्रणाला, विनोदाला व निरनिराळ्या भावनाविष्काराला पूर्ण वाव मिळाला आहे.
४) कुंवरबाईनुं मामेर-
ही' सुद्धा एक श्रेष्ठ साहित्यक्रती आहे. ह्यात नरसिंहू मेहता आपल्या मुलीच्या 'सीमन्त'प्रसंगी तिला ' मामेरु ' अथवा ' मोसाळुं ** देतो त्याचे वर्णन आहे. ह्यात ज्या प्रसंगाचे हुबेहूब चित्र आपल्या डोळ्यापुढे प्रेमानंदाने उभे केले आहे ते' असे आहे - नरसिहाची बेलगाडी', त्याचे मित्र, त्यांना उतरण्यासाठी म्हणून कुंवरबाईच्या सासरच्या माणसांनी दिलेला तबेला, आत्मातंदांत तल्लीन झालेल्या आपल्या पित्याची' थट्टा केळेळी' पाहून कुंवरबाईच्या मनाला झालेले दुःख, तसेंच आपली आई असती तर तिने योग्य रीतीने हा प्रसंग कसा निभावून नेला असता, याची खात्री प॑ण आता नाही म्हणून तिळा वाटलेली हळहळ, इत्यादी गोष्टी. त्याचप्रमाणे मेहताची शांतवृत्ती ब देवावरचा दुढ विश्वास, कुंवरबाईची असहाय ब दयाजनक मन:स्थिती आणि कुंवरबाईच्या सासरच्या मंडळींची घमेंड, उद्धटपणा, फाजील अभिमान व तिष्ठ्र उपहास ह्यांचे बारकाईने वर्णन केले आहें. तसेंच योग्य वेळ येताच श्रीकृष्ण नरसिंह मेहताचा गुमास्ता म्हणून येतो व॑बरोबर देणग्या म्हणून देण्याच्या किमती वस्तूंच्या गाड्याच गाड्या कशा भरून आणतो व कुंवरबाईची' कपटी सासू व आजेसासू ह्यांनी तिच्या पित्याच्या स्थितीची चेष्टा करूत मागितलेल्या सर्वे वस्तू अगदी' यादीप्रमाणे कशा पुरवितो व कुंवरबाईच्या सासरच्या गु.सा.इ....४
५० : गुजराती साहित्याचा इतिहास
भाणसांची कणी फजिती' करतो, त्याचे वर्णनही फार परिणागकारक रीतीने केळे आहे. 'मामे॑' हे काव्य प्रेमानंदाने विनोद व करुणा हे दोन भाव एवधामेकात गुंफून फार सुंदर रंगविले आहें.
प्रेमानंदाने आपल्या आख्यानांची कथानके रामायण, महाभारत, भागवत व इत'र पुराणांमधून घेतली असली तरी ती' त्यांची' केवळ भाषांतरे विवा रूपांतरे नाहीत.
मध्ययुगात ब्राह्मणांच्या तोंडून पुराणातील गोष्टी ऐवाणे हे एकच करमणुवीचे व सुसंस्कृत होण्याचे साधन होते. प्रेमानंदाने पुराणातुन आपल्या आख्यानांची कथानके मुख्यत्वे घेतली असली' तरी' सर्जक बुद्धी, सूक्ष्म अवलोकन शक्ती, मनुष्य स्वभावाचा अभ्यास व गोष्ट रसमय करून सांगण्याची वाला, ह्या आपल्या साहित्यगुणांमुळे त्याने त्या कथानकातील पात्रांना जिवंत वेळे व त्यांच्या हारे त्याने त्या वेळच्या गुजरातच्या लोकांच्या जीवनावर प्रकाणश' टाकळा. त्य़ाने वणिलेल्या कृष्ण, वसुदेव, देवकी, नंद, यशोदा, नळ, दमयंती १' इत'र अनेक व्यक्ती ह्या पुराणकालीन न वाटता त्या वेळच्या गुज'रातमधीलच अधिक वाटतात. प्रेमानंदाला त्या वेळच्या गुजरातचे पूर्ण ज्ञात आहे. त्या वेळचे निरनिराळया जातीचे व धंद्याचे पुरुष व स्त्रिया ह्यांची त्याला खडान् खंडा भाहिती आहे व त्याने आपल्या आख्यानातून त्यांची रीतभात, रिवाज, त्यांच्या मनातला सांस्कृतिक दृष्टि- कोण, त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी, इत्यादींचे सविस्तर वर्णन वेले आहें. आणि म्हणूनच 'नानालाल” ह्या श्रेष्ठ कवीने' प्रेमानंदाविषयी म्हटले आहे, “ प्राचीन व अर्वाचीन सर्व गुजराती कवींत प्रेमानंद .हा खऱ्याखुऱ्या अर्थाने गुजराती कवि आहे. ”
' गुजरातीपणा * हा प्रेमानंदाचा मोठा गुण, तसा गोठा दोषही आहें. कारण त्याने पुराणातील उदात्त व महान व्यकतींवर चढविलेल्या गुजराती साजामुळे त्या व्यवतींचे बोलणे, चालणे, वागणे हे कित्येकदा प्रेमातंदाच्या घेळच्या अगदी' सामान्य प्रतीच्या लोकांसारखे वाटते.
सव मध्ययुगीन लेखकांप्रमाणे प्रेमानंदाचा मुख्य हेतू भापल्या श्रोत्यांच्या भावनांना स्पर्शे करून त्यांचे मन जिंकणे हाच आहे. वाथानिरूपण करीत अस्ता त्यातुन रसनिर्ष्पात्त कशी होईल इकडे त्याचे फार लक्ष असे, आपल्या गसप्रवाही निरूपणशैळीत एकही महत्त्वाचा बारीकसारीकसा मुद्दा किवा त्यामागील भावना त्याच्या नजरेतून सुटत नाही व तो शेवटपर्यंत शोत्यांचे कुतूहल जागृत ठेवतो. कधी' कधी' सुंदर शब्दचित्रे रंगवून तो श्रोत्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देतो, तर केव्हा केव्हा एखादे अरण्य, सभा अथवा मेंजवानीचे ठराविक पद्भतीने बारीक- सारीक तपशीलासह वर्णंत करून आपल्या सामान्य बुद्धीच्या ब अप्रबुद्ध अशा
सतरावे शतक: ५१
श्रोत्यांची बालसुलभ जिज्ञासा तृप्त करतो. कधी कधी तो एखाद्या उमद्या पुरुषाच्य] किंवा सुंदर स्त्रीच्या वेशिष्ट्यांची' वर्णने करतो. आपल्या अशा वर्णनांनी तो श्रोत्यांना कधीही कंटाळा आणीत' ताही कारण त्यात योग्य शब्दयोजना, लयबद्धता, अनुप्रास, यमके इत्यादींचा भरपूर उपयोग करून तो ती रसपूर्ण बनवतो. व्यंग्य, उपहास, कटाक्ष, वक्रोक्ति व विनोद ह्यांचा उपयोग करून तो आपल्या श्रोत्यांना कधी हसवतो तर कधी' एखाद्या प्रसंगाचे करुणरसाने भरलेले हुदयस्पर्णी वर्णन करून श्रोत्यांना रडायला लावतो. एखाद्या भावनेचे क्रमाक्रमाने वर्णन करून तिचा उत्तम परिपोष करणे ह्या बाबतीत प्रेमातंदाचा हात कोणीही धरू शकणार नाही.
प्रेमानंदाला मनुष्यस्वभावाची पुर्ण पारख असल्याने तो कोणत्याही एकाच रसाचे विस्ताराने वर्णन करीत नाही. उदाहरणार्थ, वीररसाचे वर्णन करताना तो त्याबरोबरच त्यात शुंगार, हास्य व करुण रसाचेही' सिश्रण करून श्रोत्यांची' मने त्यात गुंतवून ठेवतो.
प्रेमानंद एखाद्या रसाचे' जसे अत्युत्कृष्ट बर्णेन करू शकतो; तसेच एका रसाच्या बणेनातुन दुसर्या रसात कसा कुशलतेने प्रवेश करावा हें तो चांगळे जाणतो. तो हे काम इतकया सहजपणे व निर्वेधपणे करतो की दुसऱ्या रसाचे वर्णन जेव्हा उन्चकोटीला पोहोचते तेव्हा कुठे हा बदल श्रोत्यांच्या ध्यानात येतो. अत्नेक संवादी रसांचा कौशल्याने वापर करून प्रेमानंद आपल्या आख्यानातील मुख्य रस परिपूर्णतेस नेतो व अशा रीतीने एखाद्या जादृगाराप्रमाणे तो आपल्या वाचकांना एकत्वातून विविधतेकडे व विविधतेतुन एकत्वाकडे नेतो म्हणूनच प्रेमानंद हा गुजराती साहित्यातील सर्वश्रेष्ठ वास्तवल्क्षी कवि होय,
५) प्रेसातंदाची त्ताटके-
बडोद्यात प्रकाशित झालेल्या प्राचीन काव्यमाला' ह्या पुस्तकात ' सत्यभामा- रोषर्दाशका आख्यान', ' पांचालीप्रसज्ञाख्यान ' व 'तपत्याख्यात' ह्या नावाची तीन नाटके इ. स. १८९२, १८९३ व १८९४ साली! प्रसिद्ध झाली. ही नाटके प्रेमानंदाची असावीत असे मानले जात होते; पण सुरुषातीपासुनच त्याबद्दळ वाद सुरू झाला, दोन्ही बाजूंच्या साहित्यिकांनी व विद्वानांनी ह्या वादविवादात भाग घेतला. इ. स. १९०९ पर्यंत हे वादंग चाळू होते. शेवटी स्व. प्रा. तरसिंहराव दिवेटिया ह्यांनी “घेमानंदाची' नाटके ह्या विषयावर एक उत्कृष्ट प्रबंध लिहून ती नाटके प्रेमानंदाच्या हातच्या कृती असणे शक्यच नाही असे निविवाद सिद्ध केले.
पण, मग हो नाटके कोणी लिहिली' असा प्रशत उपस्थित झाला, बराच काळ- पर्यंत हा विवाद चालल्यानंतर ही नाटके छोटालाल नरभेराम भट्ट व ताथाशंकर शास्त्री ह्यांनी लिहिली असावी असे' मानले जाऊ लागले. तसेच स्व. प्रा. केणवलाल
५२ ! गुजराती साहित्याचा इतिहास
ध्रुव ह्यांना हे माहीत असून त्यांनीच ती प्रकाशित करण्यात मदत केली असावी असेही मानले गेले.
ह्या नाटकात साहित्यिक गुण जवळजवळ शून्य आहेत. म्हणून ती आता
कोणी वाचीतही' नाहीत किवा त्यावर चर्चाही करीत नाहीत. त्यामुळे ह्याबद्दलच्या वादाचा आता काही प्रश्नच शिल्लक राहिला नाही.
तळटिपा
अभिनवो आनन्द आज अगोचर गोचर हव ए. असे. म्हणतात की, पंडित धनराज' ह्यांनी सर्वात प्रथम १६०४ मध्यें भगवद्गीतेचे गुजरातीत भाषांतर केले; पण त्यांनी गीतेच्या प्रत्येक अध्या- याचा फक्त सारांश दिला आहे. ए बे एक स्वरूप अन्तर नव धरणो, प्रभु अन्तर... भोळा भूधरने भजतां भवसागर तरणो,
जयदेव जयदेव । अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंतचे' गुजराती साहित्य राजकारणापासून अगदी अलिप्त आहें हें ध्यानात ठेवण्यासारखे आहे. श्राद्ध-मनुष्याच्या मृत्यूनंतर एका विशिष्ट दिवशी वरावयाचा धार्मिक विधी व त्यानंतर दरेक वर्षी भादृपदाच्या कृष्णपक्षात त्या मनुष्याच्या मृत्यु- तिथीला करावयाचा धार्मिव विधी. आपिवन महिन्यातील शुक्लपक्षाचे पहिळे नऊ दिवस. स्वयंवर - पुर्वी अशी चाळ होती की, राजकन्येच्या स्वयंवराळा सर्वे राजांना आमंत्रण देऊन एकत्र बोलावले जाई व त्यातून राजकन्या तिच्या पसंती- प्रमाणे एकाला पती म्हणून निवडीत असे. काही वेळा राजकन्येचा पिता काही अटी पण घालीत असे अथवा परीक्षा घेत असे व त्यावरून वराची पसंती' होत असे. हे हरि सत्यतणा संघाती, हरि हुं तो क््यांये नथी ज सभाती. मामेड- मुलीच्या 'सीमंत'भ्रसंगी (मोटी भरणे करताना) मुलीचे आई-बाप
मुलीला, जावयाला व ति'च्या सासरच्या इतर माणसांना भेटी देतात, तो समारंभ.
प्रकरण सहावे
अठरावे शतक
[१]
शामळ भट्ट [ इ. स. १६९० ते १७६९ ]
हा अहमदाबादमधी'ू वेंगणपूरचा रहिवासी. त्यांच्या वडिलांचे नाव वीरेशवर, शामळ कथा सांगण्यात इतका कुशल होता की', सिंहुजच्या जमीनदार पॉोटलाने त्याला आपल्या आश्रयास ठेवून घेतले. शामळने रचलेली आख्याने ' शिवपुराण ', ' अंगदविष्टि', 'शुकदेवाख्यान', 'विशवेएवराख्यान', ' रावण-मंदोदरी' संवाद' वगैरे होत ही सर्व पौराणिक प्रसंगावर रचलेली आहेत. प्रेमानंदाची आख्याते' रचून झाल्यानंतर थोड्याच वर्षांनी ही लोकापुढे येऊ लागल्याने ती स्वाभाविकच तुलनेने फिकी' पडली व जनमनावर त्यांची पकड बसली' नाही.
शामळ हा 'प्योवत' लिहिण्यात फार प्रसिद्ध होता. त्यापेकी विशेष गाजली ती' म्हणजे 'पद्मावती' ', 'रूपावती", 'नन्दबत्रिशी', 'पंचदंडनी बार्ता', ' विनेचटती' वार्ता', 'बारस कस्तुरी', 'सूदबहोत'री,' 'सिहासन बत्रिशी”, 'सुंदर कामदार' आणि “मदनमोहना.' त्याशिवाय शामळने ' उद्यमकर्म संवाद , “रणछोडजीना एलोको” (अथवा बोडाणा आख्यान), 'अभराम कुलीना एलोको' (अथवा रुस्तम बहादुरना पवाडो), 'शामळ रत्नमाला', ' राखीदास चरित्र ' वगरे काव्ये रचली आहेत.
१) पद्मावतो (१७१८)
हे शामळचे पहिले * पद्यावत'. ह्याची कथा अशी' आहे. चंपावतीचा राजपुत्र पुष्पसेन ह्याला त्याच्या पित्याने हृद्वपार केलेले असते. नशिबाने आलेल्या अनेक संकटप'रंपरांतुन जात-जात तो शऐेवटी' धारा नगरीची राजकन्या पद्मावती हिच्याशी विवाह करतो. ह्या कामात त्याला गणिकेचे चांगळे साहाय्य मिळते. शेवटी तो घरी परत येतो व सर्वांना आनंद होतो.
५४ : गुजराती साहित्याचा इतिहास
२) शिहासन बत्निशी-
ह्यामध्ये दंतवाथांतून प्रशिद्ध झालेल्या विक्रम राजाची कथा आहे. हा राजा बहुमुखी प्रज्ञावान महान पंडित, नाता कलावंतांचा व कवींचा आश्रयदाता होता शिवाय तो अतिशय शहाणा व न्यायी राजा होता. त्याला भूतप्रेतादि अतिमानव व्यवती वश होत्या. अशा विक्रम राजाच्या सिंहासनावर भोजराजा आरूढ होणार तोच सिंहासताच्या पायाखाली असलेल्या बत्तीस बाहुल्या जिवंत होऊन भोज- राजाला एकामागून एक विक्रम राजाच्या पराक्रमाच्या गोप्टी सांगू लागतात. तीच ही ' सिंहासन बर्तिशी. ३) भदनभोहना-
शामळच्या उत्तम ' प्द्यावर्ता'पैकी हे एक पद्यावर्त आहे. ह्यात राजकन्या मोहना व राजाच्या मुख्य मंत्र्याचा मुळगा मदन ह्याची प्रेमधाहाणी वणिळी आहे.
शामळने प्रेमानंदाप्रमाणेच आपल्या पुर्वेगामी' कबींकडून खूप' उसनवारी केली' आहें. त्याच्या बहुत्तेक सर्व पद्यावर्ताच्या कथांचे बीज त्याने काही जुन्या पद्यावर्तातुन किवा ' बुहतू-कथा-मंजरी' अथ'॥ ' कथा-सरित्-सागर ' ह्या संस्कृत ग्रंथातून व एखाद्या लोककथेतून घेतले आहे. आशल्यानकाराच्या मानाने पद्यावर्तकाराला जास्त मोकळीक असते. त्याला मूळ कथेला पूर्णपणे धरून रहावे. लागत नाही. मूळ कथे- तील पात्रांची नावे' बदलणे, नवे काल्पनिक प्रसंग त्यात आणणे, प्रसंगांचा अनुक्रम
बदलणे वगैरे गोष्टी तो करू शकतो. म्हणून शामळच्या कथांतील बीजे आपणास पूर्वीच्या अनेक कथांत असलेली आढळून ग्रेतात.
णामळच्या कथांचा विस्तार फार भोठा आहे. त्याच्या कथांत विविध प्रकारची पात्रे व घटना आहेत. त्याने पुर्वीच्या साहित्य-ग्रंथांतुन अऱ्याच वाभा उसन्या घेतल्या असल्या तरी आपल्या वल्पनाशक्तीनेह्दी अगेक प्रसंग निभिले आहेत.
जशी ऐकलेल्या व वाचलेल्या गोष्टीवरून तशीच त्यात स्वतःच्या कल्पलेंची भर घालूनही त्याते आपल्या आख्यानांची कथानके रचली' आहेत. तसेच भापली'
कथानके फुलविण्यासाठी' तो त्यात कोडी, कूटप्रएन, सूत्रे व बोधवचने ह्यांचा मोकळ्या हाताने उपयोग करतो.
शामळच्या गोष्टी कूटप्रश्न व कोड्यांनी भरपुर आहेत. त्यातीक विनोदाने तो वाचकांचे कुतूहल वाढवतो व त्यांना प्रसन्न करतो. कधी कधी त्याची' एखादी नायिका आपल्या कूटप्रश्नाचे उत्तर शोधून देणाऱ्या पुरुषाशीच लग्न करते आणि केव्हा केव्हा काही कूटप्रश्न व त्यांची उत्तरे ह्यामुळेच पात्रांना एकमेकांची ओळख पटते.
शामळ हा आपल्या काव्यणवतीपेक्षा कथाचातुर्याने श्रोत्यांवर प्रभाव पडतो. त्याची विशिष्ट प्रकारच्या स्त्री-पुरुषांची वर्णने, तसेच अरण्ये, शहरे व' राजदरबा'रांची'
अठरावे शतक : ५५
वर्णने एकाच साच्याची व परंपरेला अनुसरूनच असतात. केव्हा केव्हा लांबळचक वर्णते करून तो म्हणतो, ' आता त्यांचे अधिक वर्णन करणे शक्य नाही',* व असे म्हणून तो त्यांचा संक्षेप करतो; पण अशा प्रसंगी प्रेमानंद मात्र मानवी मनाच्या
भावभावनांचे सविस्तर वर्णन करण्याची एकही संधी जाऊ देत नाही.
दिवसभर काबाडकष्ट करून थकल्याभागलेल्या खेडेगावातील अशिक्षित स्त्री-पुरुषांना सायंकाळी मनोरंजक व बोधप्रद कथा सांगून रिझविणे हे शामळचे मुख्य कार्य होते. म्हणून त्याच्या कथांत आपणाला चमत्कृतिपुर्ण वाक्ये, विनोद, चुटके, व्यावहारिक शहाणपणाच्या गोष्टी, मानवी स्वभावातील गोष्टींचे सूक्ष्म वर्णन वगैरे आढळते. आपल्या गोष्टींचा केव्हा केव्हा अकल्पित' शेवट करून किंवा त्यात एकदम बदल करून वर सांगितलेल्या श्रोत्यांचे मतोरंजन तो पूर्णपणे करू शकत असे.
शामळच्या कथातील स्त्रिया, पुरुषांपेक्षा अधिक हुशार व' तेजस्वी' आहेंत. * हुंसावती' ', 'पह्मावती', ' प्रेमावती ', ' रस-मंजरी' ', कर्पूर 'मंजरी”, 'भद्र भामिनी”, * विद्याविलासिती' ', ' कामवती' ', ' तरंगवती ' वगरे ही त्याच्या कथांचीही नावे' असून त्यातील नायिकांच्या नावावरूनच ती' घेतली' आहेत. ह्या' नायिका धीट, चतुर, बुद्धिमती, प्रसंगावधानी व साहसी आहेत आणि ह्याच गुणांच्या जोरावर त्या' अनेक आपत्तींना तोंड देऊन त्यातुन सुखरूपपणे पार पडतात. बरेच प्रसंगी त्या पुझुषांहून जराही कमी प्रतीच्या नसतातच. उलट केव्हा केव्हा पुरुषांपेक्षा त्या काकणभर श्रेष्ठच ठरतात. पुरुषांची मने जिंकून घेऊन त्यांना त्या खूप सुख देतात. शामळच्या स्त्रीपाचांत' अनेक प्रकारच्या स्त्रिया आहेत. काही' जन्मभर अविवाहित राहतात? व शेवटपर्यंत हिमतीने आपल्या निशचयाला चिकटून राहतात. काही प्रथमदर्शनीच पुरुषाच्या प्रेमात पडून आपल्या पसंतीच्या पुरुषाशी लग्न करणाऱ्या आहेत.* काही. आपल्या कोड्याचे उत्तर शोधणाऱ्या पुरुषाशीच लग्त करणाऱ्या तर काही लग्त झालेल्या स्त्रिया पुरुषवेष घेऊन त'रुण स्त्रियांचे मन आपल्या हुशारीने व बहादुरीने जिंकून त्यांच्याशी लग्त करणाऱ्या व भग त्या स्त्रिया आपल्या पत्तींना देणाऱ्या आहेत. काही' स्मशातात जाऊन क्रियाकांड करणाऱ्याही आहेंत.* काही चंचळ मनाच्या, मोहात पडून आपल्या पतीला सोडून पळून जाणाऱ्या आहेत व' काही' इतक्या पतिपरायण आहेत की पतीच्या मृत्यूची बातमी ऐकताच ती खरी की खोटी ह्याचा जराही विचार न करता धक्का बसुन प्राण सोडणार्या आहेंत. काही आपल्या पतींना खऱ्या आणीबाणीच्या वेळी मदत करून त्यांचे प्राण वाचवितात, तर काही अशाही आहेत की ज्या पतीवर चिडून त्याचा सूड घेतात व' त्याला ठार मारतात. काहींची फॅतिभक्ती' पराकोटीला पोहोचलेली आहे तर काहींची पोतिब्रत्याची भावना अगदीच वरवरची आहे. अशा प्रकारे शामळच्या कथांतूत आपल्याला स्त्री-स्वभावाच्या अनेक पेलूंचे दर्शन घडते.
५६! गुजराती साहित्याचा इतिहास
संख्या ब गुणवत्ता ह्या दोन्ही दृष्टींनी पाहत! णापळ छा एक महान वथा- कार होता व' शामळच्या नंतर त्याच्यासारखी पययाबते पुढे कोणीही रचली नाहीत. त्यामुळे मध्ययुगातीळ श्रेष्ठ पद्यावर्तकार म्हणून ण॥ामळचाच निर्देश करता येतो.
र|
अठरावे शतक म्हणजे गुजरातच्या इतिहासातील अंदाधुंदीचा व अस्वस्थतेचा काळ होता. मोगलांची' सत्ता संपुष्टात येत चालली' होती. औरंगजबाची धर्मांधता व भराठ्यांचे हल्ले ह्यामुळे अव्यवस्था ब दुर्देणेचा काळ सुरू झाला होता. गुजरातची संपत्ती नष्ट झाली होती. ऐतीचा नाण झाला होता, व्यापार-धंदे बुडाले होते व संस्कृती खंडित झाली होती.
अशी' परिस्थिती असल्याने १८ व्या शतकाच्या शेवटच्या भागात दयारामाचा' उदय होईपर्यंत साहित्य शोचनीय अवस्थेस पोहोचळे होते आणि त्या वेळचे कोणीही कवी उच्च कोटीचे नव्हते, दयारामाच्या घेळी वषहीशी शांतता प्रस्थापित लाली होती'.
नरसिंह मेहता व मीराबाई यांच्या बेळेप्रमाणेच ह्या काळीही ज्ञान, भक्ती व वैराग्य विषयक पदांचे प्रमाण सर्वात अधिक होते; पण आता विषयांचा अग्रकम मात्र बदलला. नरसिह मेहता व मीराबाई यांच्या काळात भक््तिप'र पदांची संख्या ज्ञान व वेराग्य विषयक पदांपेक्षा अधिक होती व ती भक्ती मुख्यत: प्रेमलक्षणा भक्ती होती; पण १८ व्या शतकातील काव्यात ज्ञात व वैराग्यपर पदांची संख्या भकक््तिविषयक पदापेक्षा कितीतरी अधिक आहे आणि ती भकती मुख्यत: शिव, कृष्ण व देवी (शकती) ह्यांची आहे.
ह्या काळचे बरेचसे कवी समाजाच्या खाळच्या थरातील ब खंडेगाबातील होते, त्यामुळे त्यांच्या काब्याची भाषा सुसंस्कुत' नव्हती, पण त्यांचे ते बोल हुंदयाच्या अंत- भागातून सहजपणे बाहेर पडलेले असल्यामुळे जनमानसावर त्यांचा फार प्रभाध पडला.
हा काळ आण्यानांसारख्या विस्तृत वर्णंनात्मवा वाव्यांचा नसून लहान' लहान पदांचा आहे. ह्या काळात ज्ञान, भक्ती व वैराग्यविषयक पदे त'र परंपरे- प्रमाणे झालीच; पण त्याचबरोबर गरबा, गरबी,* काफी', 'चाबखा, आरत्या व राजियांचा सुकाळ झ्लाला,
ह्या वेळी' स्वामीनारायण पंथाच्या कवींचा स्वतंत्र वर्गच निर्माण क्षाळा होता.
वल्लभ मेवाडो [इ. स, १७०० त ह्यात ]
हा कवी ह्या काळचा सर्वात श्रेष्ठ गरबे रचणारा कवी होता. 'ह्याच्या पुर्वी रुचे गेलेळे गरबे मिळत नाहीत. याचे कारण हे असावे' की वल्लभ मेवाडाचे'
अठरावे शतक : ५७
गरबे इतके लोकप्रिय झाले की त्यामुळे पूर्वीचे काही थोडेफार गरबे असले तरी ते लोकांच्या स्मरणातही' राहिले नाहीत.
वल्लभने गुजरातच्या मुख्य तीन देवतांच्या ( अम्बा, बहुचरा व काली ह्यांच्या ) महानतेचा आपल्या काव्यातून उदो-उदो केला. तो अहमदाबादचा रहिवासी होता; पण त्याने आपल्या आयुष्याचा बराचसा भाग चुनवल ह्या बहुचरा मातेच्या पीठातच घालवला. तो देवीचा इतका एकनिष्ठ भक्त होता की आजसुद्धा बहुचरा मातेच्या दर्शनाला जाणारे यात्रेकरू एकमेकांना ' वल्लभ धोलानी'” जय ' म्हणून अभिवादन करतात.
वल्लभ आपल्या ' आतंदतो गरबो ' ह्या गरब्यात बहुचरा देवीच्या शक्तीचे' व वेभवाचे अप्रतिम वर्णन करतो. ' महाकालीनो गरबो ' ह्यात तो देवी महाकालीचा कोप झाल्याने पावागढच्या राजाच्या घराण्याचा कसा ताण झाला त्याची कथा सांगतो. 'अंबाजीना शणगारनो गरबो' ह्यात तो अंबामातेच्या अंगोपांगाच्या सौंदर्याचे व त्या सौंदर्यात भर घालणाऱ्या कित्येक अलंकाराचे बारीक-सारीक तपशीलासह वर्णन करतो.
वल्लभने ' कळिकालनो गरबो ' (कलियुगाचा गरबा) हा तैतिक अध:- पाताच्या काळाचाही गरबा लिहिला आहे तसेच “* कजोडानो गरबो ' म्हणजे अयोग्य वधू-वरांच्या जोडीचाही गरबा लिहिला आहें.
बल्लभने एका काव्यात १७३१ साळच्या दुष्काळाचे व अन्नटंचाईचे वर्णन केले आहे. तो म्हणतो, ' अन्नधान्य फार महाग झाळे आहे. अधर्माचा इतका प्रसार झाला आहे की तो सुधारण्याच्या पलीकडे गेला आहे. कोणी कोणाचा त्याय करावा ? कारण प्रत्येक जण दुसऱ्यापेक्षा जास्तच अन्याय करीत' आहें. प्रत्यक्ष आपल्या पोटच्या पोरांना आपले पोट भरण्यासाठी आईबाप' सोडून जात' आहेत किवा त्यांना विकण्याची त्यांच्यावर पाळी आली आहे.”५
* कजोडानी' गरबो ' मध्ये पुढील वर्णन आहे-
एका तरुण मुलीचे लग्त एका अतिशय वृद्ध माणसाशी होते. ती आपल्या हृंदयातळे दुःख गोरमा*जवळ जाऊन तिला सांगते, * हे गौरीमाते, तू माझ्या नशिबी एक वृद्ध पती लिहिलास. हे माते, मी आता भर ताढदण्यात आले आहे व' ब तो वार्धक््याने किळसवाणा झाला आहे. भी' फक्त' १६ वर्षांची आहे आणि तो ८० वर्षांचा आहे. थंडीच्या भर रात्री कोणालाही नाना प्रकारचे सुखोपभोग भोगावेसे वाटतीळ पण त्या मूर्ख म्हाताऱ्याची' त॑र जशी' काही' वाचाच बसली' माहे. हें माते, जन्मताच माझा गळा का कोणी' दाबूत टाकला नाही ? मला विष देऊन मारून का टाकले नाही. ? १९०
५८ : गुजराती साहित्याचा इतिहास
वल्लभच्या गरब्यांची' लोकप्रियता इतकी वाढली की' दुसऱ्या लेखकांनी लिहिलेले काही' गरबे सोडले तर फक्त वल्लभचेच गरबे आजपर्यंत टिकून राहिले आहेंत.
प्रीतम अथवा प्रीतमदास [ १७२० ते १७९८]
प्रीतम अथवा प्रीतमदास ह्या रामानंदी साधूने भगवद्गीतेचे गुजरातीत भाषांतर केले आहे. त्याशिवाय त्याने "एकादश स्कंध', 'धरमगीता', 'सरसगीता', 'ज्ञानगीता' व * अध्यात्म रामायण! व इतर अन्तेक ग्रंथ रचले आहेत.
नरशिह मेहता जसा आपल्या 'प्रभातियां'नी, अखो जसा आपल्या 'छप्प्यां'नी' तसा प्रीतम आपल्या 'पदां'नी' प्रसिद्ध झाला आहे. प्रीतमने ज्ञान, भक्ती, वैराग्य व शुंगारविषयक पदे लिहून सोप्या भाषेत नैतिक व धार्मिक उपदेश' केला आहे. त्याने आपल्या काही' पदांत सामाजिक दुष्ट रीतिरिवाजांवर प्रकाश' टाकला आहे; पण त्याने जरी' त्यावर टीका केली तरी त्यात 'अखो? व 'भोजो' यांच्याप्रमाणे त्वेष व संताप दिसून येत' नाही', त्याच्या काही पदांची सुसवात' अशी होते-'* हरीचा मार्ग हा शूराचा मार्ग आहे. ते कायर माणसाचे काम नाही.”१० “हे वेणु, तू व्रज- नारींची वेरीण झाली आहेस.”*१ “हे जिव्हे, तुला हरिगुण गाण्याचा एवढा आळस का? ”१२ ह्या सुरवातीच्या पंक्ती अतिशय लोकप्रिय काल्या आहेत.
प्रीतमच्या रचनांमध्ये अनेक प्रकार आढळून येतात. त्याने कक्का, महिना, तिथि, वार, ढोळ, गरबी, आरती, थाळ, प्रार्थंता, चेतवणी वगैरे प्रकार लिहिले आहित; पण त्याच्या काव्याचे मुख्य विषय ज्ञान, वैराग्य व भक्ती हे तीन आहेत. त्यांपेकी 'सरसगीता' हे काव्य उल्लेखनीय आहे. श्रीकृष्ण गोकुळ सोडून मथुरेला जातो. तेथून तो उद्धवाला नंद,१» यशोदा १४ व गोपी यांचे सांत्वन करण्यासाठी' गोकुळात पाठवतो. उद्धव मोठ्या-मोठ्या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी सांगून त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा गोपी' त्याला आपल्या कृष्णाविषयी'च्या आठवणी सांगतात. त्या कृष्णाच्या बालक्रीडांचे वर्णन करतात' आणि आपले कृष्णविरहाचे दुःख व व्यथा किती खोळ आहेत ते सांगतात. ह्या प्रेममय भक्तीच्या दर्शनाने उद्धव अगदी भारावून जातो व संतुष्ट होऊन तो मथुरेला परत जातो.
सारांश, प्रीतम हा ज्ञान, भक्ती व वैराग्य यांचे वर्णन करणारा कवी आहे. है विषय वणिताना त्याने मधुर, सहज व साध्या शब्दांचा उपयोग केला आहे. त्यामुळे मध्ययुगातील बःयाच कवींपेक्षा तो अधिक लोकप्रिय झाला आहे.
रत्नो [ सुमारे सन १७४० ]
हा अंदाजे १७४० मध्ये होऊत गेला. 'बारमासी” प्रकारच्या काव्यातील महिना' ही त्याची प्रसिद्ध रचना' आहे. कृष्णाच्या विरहाने व्यथित झालेल्या
अठरावे शतक : ५९
राधेच्या हृदयातील भावभावनांपे-वेदनांचे सविस्तर वर्णन ह्या काव्यात केले आहे. वर्षाच्या प्रत्येक महिन्यातील निसर्गाचे निरनिराळे सौंदर्य व बाह्य प्रकृतीच्या विविध छटा पाहून तिच्या मत्तांची कस-कशी स्थिती होत जाते हें त्यामध्ये वणिले आहें. निसगेसौंदर्याचे वर्णन, प्रत्येक त्ररतुबरोबर बदलत जाणारी त्याची ख्पे ब त्यांचा विरहाने .झुरणाऱ्या स्त्रियांच्या हृदयावर होणारा परिणाम ह्यांचे वर्णन ह्यामुळे हें काव्य गुजराती साहित्यातील उत्कृष्ट ' बारमासी ' म्हणून प्रसिद्ध आहें.
धीरो [ १७५३ ते १८२५ ]
धीरो निरक्षर होता. त्याला संस्कृत येत नव्हते; पण संन्यासी व साधुसंतांच्या सहवासाने त्याला योगणास्त्राची** व ज्ञानाची बरीच जाणीव होती.
असे सांगतात की, तो भापल्या कवितांच्या नकला करून लहात लहात बांबूच्या नळ्यात' ठेवून त्या महीनदीच्या पाण्यात सोडून देत. असे. अशा रीतीने त्याच्या कविता लोकांपर्यंत पोहोचल्या व त्याला प्रसिद्धी मिळाली.
धीरो याते 'रणयज्ञ', 'अश्वमेध' व द्रौपदी वस्त्रह्रण' ही आख्याने लिहिली'; पण तो आपल्या 'काफी' या काव्य प्रकाराबद्दल प्रसिद्ध आहे. 'काफी' हें अशा प्रकारचे पद असते की त्यात पहिली' ओळ (टंक-धुपद) पुढील २ ओळींच्या ५ कडव्यातीळ एक ओळ सोडून नंतरच्या ओळीशी' यमक साधते. धीराची बहुतेक पदे अशा 'काफी” च आहेत, त्या सर्वांमध्ये 'स्वरूपनी' काफी' ही उल्लेखनीय आहे. ह्यात गुरु कसा असावा यासंबंधीचे आणि माया, मन, तृष्णा (लोभ), लक्ष्मी, यौवत्त व काया ह्यांच्या स्वरूपोविषयीचे विचार विषद केलेले आहेत. 'ह्या 'काफी' मध्ये धी'रो अतिशय यशस्वी झोला आहे, 'धी'रो'च्या काही 'काफी'च्या आरंभीच्या ओळी' अणा आहेत'.
“राम'ज्यांचे रक्षण करतोतो..... 77१६,
“ तु गर्वाने इकडेतिकडे का फिरतोस ? तू मार्गे चुकला आहिस व ह्या संसाराच्या विहिरीत (गंगेत) पडला आहेंस.”१७
*। जन्ममृत्यूच्या शृंखला तुटून पडल्या आहेत व ब्रह्मभवनाचे दरवाजे उघडले आहेत.”?१८
'ह्या 'काफी” रचना फार लोकप्रिय आहेत'.
आपल्या 'काफी' मध्ये रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देऊन जग्रातील वैभव व त्याविषयीचे आकषण कसे व्यर्थ आहे, तसेच सुखोपभोग कसे' क्षणभंगुर
आहेत व ईश्वरावर खरी वृढ श्रद्धा ठेवल्याते मतुष्याला कशी खरी मनःशांती' प्राप्त होते. ते' विशद करून सांगितळे आहे.
६० ! गुजराती साहित्याचा इतिहास
'काफी” व्यतिरिक्त, धीरोने 'अवळबाणी” म्हणजे गूढा्थति भरळेली' नेहमीपेक्षा वेगळया शब्दातील धोर्मिक-तात्त्विक वचने लिहिली आहेत. अक्या कवितात' केलेली विधाने वरून वरूत अगदी विचित्र वाटतात; पण त्याखाली एक गूढार्थ लपलेला असतो आणि त्यावरून कवीच्या आध्यात्मिक गूढ अनुभवांची ब भावतांची प्रचीती येते
पुढील ओळी 'ह्या 'धीरो' याच्या 'अवळवाणी'ची' विशिष्ट उदाहरणे आहेत-
“ अंबारीने हत्तीला गिळले, खोगिराने' घोड्याला गिळून टाकळे, कपड्यावर कुफ्ण वाळत घातले, फेसाने समुद्राला गिळून टाकले, सशाने आपल्या हुशयारीने' सिहाला' लढाईत' हरवून टाकले."१*
तदुपरांत ' धीरो ' याने ' ज्ञातकक्को ' म्हणजे ज्ञानाची ' क-का ' वगैरे बाराखडी वा मूळाक्षरे ही उपदेशकर कविता आहे. व त्यात' प्रत्येक ओळीच्या पहिल्या शब्दाचे पहिले अक्षर गुजराती भाषेतीळ मूळाक्षरांच्या अनुक्रमाने आले आहे. त्याशिवाय त्याने गरबी, धोळ वगैरे काव्यप्रकारही लिहिले आहेत.
नरभेराम [ १७६८-१८५२]
नरभेराम आपल्या 'बोडाणानी मूछना पदो' (बोडाणाच्या मिशांची पदे) ह्या काव्याबद्दल प्रसिद्ध आहे. ह्या काव्याला हे. ताव देण्याच्या मागे मिशा ह्या' मर्दुमकी'चे चिन्ह आहेत असे भातण्याची प्रथाही आहे. ज्याने काही शौर्याची कामे' केली' आहेत असा मनुष्य अभिमानाने आपल्या मिश्याना पीळ भरतो. बोडाणा हा डाकोरचा रहिवासी. तो द्वारकेच्या रणछोडजीचा (कृष्णाचा) नग्न भक्त होता. द्वारकेहून आपल्या आराध्य दैवताची मूर्ती डाकोरला आणण्याचे अशक्यप्राय असे' काम त्याने अनेक आपत्तींना तोंड देऊन करून दाखविले.
कवीच्या दृष्टीने हे मोठे शूरप'णाचे काम होते व म्हणून आपल्या मिशांना पीळ देऊन ताठ ठेवण्याचा त्याला अधिकार होता असे तो भानत' होता. त्याच्या पंदामध्ये बोडाणाने हे अवघड कार्य यशस्वीपणे कसे' पार पाडले ह्याचे वीररसयुक्त' वर्णन केले आहे.
नरभेराम आपणास विनयाने ' तरभो ? असे' म्हणतो. त्याच्या ' नाणुं आपे' नरभो रे ' (नरभो तुम्हाला पैसे देतो) ह्या पदाबद्दलही तो प्रसिद्ध आहे. हे पद द्वारकेचे मुख्य देवत जो रणछोडजी त्याला संबोधून केलेळे आहे. पवित्र गोमतीमध्ये स्तान करण्यासाठी' व मंदिरात प्रवेश करण्यासाठी जी ठराविक रक्कम भरावी' लागते ती भरल्याशिवाय त्याच्या हातावर ( भक््तिपंथाची ) मुद्रा उठविण्यात येणार नाही असे' त्याला सांगण्यात' येते, तेव्हा त्याने हें पद देवाला उद्देशून लिहिले
आहें.
अठरावे शतक ! ६१
अखिल धनवैभवाची देवी, जी' लक्ष्मी तिचा जो स्वामी आहे. अशा देवाला तो दोष देतो की, * तुला माझ्यासारख्या निधन माणसाकडून उकळलेल्या पैशावर अवलंबून रह्वावे' लागते? व हे पैसे कशासाठी जबरदस्तीने घेतले जातात? तर त्यांना नुसंता स्पर्श करून नंतर बंदोबस्तात कडीकुलपात घालून ठेवण्याच्या आनंदासाठीच ना!” पुढे तो देवाला त्याच्या असा कर वसूल करणाऱ्या (भक्त वा पंडे) लोकां- बद्दलही ठपका देतो. तो म्हणतो, ' हें असा कर वसूल करणारे आलेल्या लोकांकडे फक्त वरवर पाहतात. कर भरू शकणारा श्रीमंत कोण आहे व कर भरून शकणारा गरीब कोण आहें, हे पारखण्याची दृष्टीच त्यांना नाही.” जो देवाचा सच्चा निःस्वार्थी भक्त आहे तोच अशा प्रकारे देवाला उद्देशून बोलू शकेल.
कवि म्हणतो, 'हें कृष्णा, तरभो तुला पेसे' देतो, तू ते खुशाल खर्चे कर. ते तुझ्या मुठीत घट्ट धरून ठेव, अरे बाबा, तुझ्या मंदिराच्या कळसावर पांढरा शुभ्र ध्वज फडकत आहे. मला जर पहिल्यापासून माहीत असते कौ' तू कपटी आहेस तर इतकी योजने दूर मी तुक््याकडे कशाला आलो असतो ? मी असे ऐकले होते की, साधूना मुद्राछाप फुकट मिळतो त्यामुळेच माझे मन उतावीळपणे तुला पोहण्या- साठी' धोवले. म्हणून ह्या तुझ्या पहारेकः्याना कृपा करून दूर कर व मला तुझे दर्धीन घडू दे. कोणी मनुष्य संन्याशाचा वेष घेऊन आला की तू दुसर्या कशाकडेदी' पहात नाहीस व त्याच्या हातावर मुद्रा उठवतोस, पण माझ्या डोक्यावरची प'गडी पाहून मरा मिळण्यासाठी तू मळा पैसे भरायला भाग पाडतोस ! तु अशीच लोकांची' परीक्षा करतोस. हे काळ्या (कृष्णा) मी थोडक्यात जे बोलतो त्याचा कृपा करून तीट अथ समजून घे. तू जाणून बुजून लोकांकडून आपला पफ'राभव करवून घेतोस. खरे तर तुला कोणीही हरवू शकणार ताही. म्हणून हे हरि, तू आपला हट्टु सोडून दे. छोटालालच्या*" कृपेने नरभो म्हणतो की, 'ह्या तिळात' आता जराही तेल नाही. तू माझ्याकडून घेऊन धेऊन काय घेणार ? ज्या माळेने मी 'हरि हरि असा जप करतो ती माझी जपमाळ हवी तर काढून घे.”१*
बापुसाहेब ग्रायकवाड [ १७७९ ते १८४३ ]
हें महाराष्ट्रीय व बडोद्यात राहणारे, त्यांनी गुजराती भाषेत ज्ञान व वेराग्य- पर पदे लिहिली आहेत. ते. धीरोचे शिष्य होते ब त्या वेळच्या परंपरेप्रमाणे अत्यंत वितनम्रभावाने व निरभिमान वृत्तीने ते गुरूची सेवा करीत असत. इतकी सेवा की ते गुख्चा हुक्का सुद्धा तयार करून ठेवीत असत. त्यांनी काही' ज्ञानविषयक पदेही लिहिली आहेत.
१८३४ मध्य त्यांनी ' महिना ' हे काव्य रचले, प'ण त्या वेळच्या इतर कवीं- प्रमाणे त्यात विरहुव्यथेचे वर्णन करण्याऐवजी त्यानी प्रत्येक महिन्यात ब्रह्मानुभूतीते
६२ ! गुजराती साहित्याचा इतिहास
आपल्याला जो अनुपम आतंद लाभतो त्याचे वर्णन केळे आहे. त्यांची ब्रह्मज्ञानपर काही पदे आहेत, पण त्यात थमके, अतुप्नास ह्यांची इतकी गुंतागुंतीची' योजना केळेली' आहे की त्याचे तंतोतंत भाषांतर करणे शक्य नाही. मूळ गुजराती' उतान्यावरूनच वाचकांना त्याची कल्पना करता येईल व त्यावड्ननत बापुसाहेबांनी साधे शब्द वाप- रून त्यात' कशी गेयता आणली आहे तेही समजेल. * प्रथम सद्गुरुनो सत्संग साचो, बीजो जे करो ते जाणो काचो हरिनाम भूल्या एज पड्यो खांचो माठ तमे सद्गुरुने निशदिन जाचो.” “ एवुं समज्ये आवे' पार मळे सार, एक तार. मटे खार, आधार नेतिपार, विएवाधार. ”
नामरहित' लेजो मानी, मानी के तेज ज्ञानी 7११
बापुसाहेंबांनी आपल्या काही 'काफी'त वेदांत तत्त्वाचे सहज समजेल असे' सुंदर विवेचन केले आहे. एका काफीत ते म्हणतात-
“मातीचा घडा पाण्याने भरलेला होता व सूर्याने त्यात प्रवेश केला होता. माझा घडा फुटून गेला व ज्याने माझ घडा फोडून ठाकला त्याच्याशी मी' किती भांडलो.”
मी म्हणालो, “ माझा सूर्य त्या घड्यात होता आणि मूर्खा तू तो फोडलास'. माझा घडा फुटून गेला त्याचे मळा काही' फारसे वाटत त्ाही; पण माजा सूयं नाहीसा क्षाला त्याचे काय? त्याला आता मी' कोठे शोधू ? मी त्याला कसा शोधू 4 1725158
पण बापुसाहेब आपल्या 'राम 'राजियो' 'ह्या काव्यासाठी' अधिक प्रख्यात आहेत. ' राजियो ' हे. मृत्यूनंतरचे पोकगीत* ४; पण बावूसाहेबांनी आपल्या 'रामराजियो' मध्ये मातवाचे षड्रिपु काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर*" ह्याविषयी सविस्तर वर्णन केले आहे. गुजरातेत बऱ्याच ठिकाणी मृत्यूनंतर सामान्य *राजिया'ऐवजी बाप॒साहेंबांचे 'रामराजियो' गाण्यात येत असे.
भोजो [ १७८५ ते १८५० ]
भोजो आपल्या “चाबखा' नामक (चाबकाचे फटके) काव्यांबद्दळ प्रसिद्ध आहें. हें एक प्रकारचे गीत आहें. ह्यात दुष्ट प्रवृत्तीवर किवा दुष्ट प्रवृत्तीच्या माणसावर द्वेषभावना न ठेवता, कवीने तडाखे हाणले आहेंत. त्याप्रमाणेच साधू
अठरावे शतक : ६३९
अगर ईएव'राचे भक्त म्हणून मिरवणारे भोंदू लोक आणि समाजाचे धूरीण म्हणून म्हणवून घेणारे लोक 'ह्यांच्या ढोंगीपणावर व मानभावीपणावर कवीने कठोर प्रहार केले आहेत. तसेच त्या काळच्या समाजाच्या अपप्रवृत्तींवरही चाबकाचे फटके' मारले आहेत.
त्याच्या काही 'चाबखां'ची सुरुवात अश्ली होते :“ हे प्राण्या, ईवराची भक्ती कर म्हणजेच ईइवरावर प्रेम कर, हा संसार हे एक स्वप्न आहे "* व ह्या जगातल्या 'बाबा' (बुवा अथवा साधू) लोकांकडे पहा. त्यांनी लोकांना फसविण्या- साठी ब लुबाडण्यासाठी हा साधुवेष धारण केला आहे.”२७ 'भोजो' याने 'सेलैया आख्यान? तावाचे एक दीघ काव्यही लिहिले आहे. त्यात पुढील कथा आहे. शेठ सगाळशा, त्याची पत्नी व त्यांचा एकुलता एक मुलगा चेलेयो ह्यांची अघोरी साधूच्या २€ वेषात येऊत देवाने इतकी भयंकर सत्त्वपरीक्षा केली त्याचे वर्णन आहे की ही सत्त्वपरीक्षा ऐकूनच आपले रक्त गोठून जाईल. ह्या तिघांची देवावर तितान्त श्रद्धा असते व त्याच्या बळावर ते ह्या कसोटीतुन आनंदाने पार उतरतात आणि शेवटी देवाची त्यांच्यावर कृपा होते. हे 'सेलैया आख्यात' व ' काचबा- काचबानुं भजन' (कासव-कासवीचे भजन) ही काव्ये गुजरातेत कितीतरी दशके अतिकय लोकप्रिय होती.
चेळेयाची कथा मध्परयुगीन गुजराती साहित्यातील कितीतरी कवितांचा विषय बत्तली आहे. त्यांपैकी रतनदासाने लिहिळेली कविता उल्ल्ेखतीय आहे. त्याची सुरुवात अशी : देठ सगाळशा साधूंची सेवा करतो व त्या वाण्याचे लक्ष आपली' प्रतिज्ञा तंतोतंत पाळली गेली की नाही हे पाहण्याकडे .'२*
भोजोने' काही 'होरी'ही लिहिल्या आहेत. ह्या पदात वसंत व्हतृतील सौंदर्याचे व त्यामुळे भताला होणार्या आनंदाचे वर्णन आहे. होरीचा आरंभ असा आहे, 'हे ताथ अविनाशी' कृपा करून माझी वितंती ऐक. मी तुझी जन्मोजन्मीची दासी आहे.'*” ही 'होरी” फार प्रसिद्ध आहे.
रणछोडजी दिवाण [ १७८५-१८४१ ]
ह्यांची बुद्धी अनेक कार्यक्षेत्रात चालत होती. तो कवी, इतिहासकार, भृत्सद्दी, राज्यकारभारी' व लढवेय्या होता. तो जुनागढचा दिवाण होता. त्याने स्वत: अनेक लढायात' भाग घेतला होता. त्याची मुत्सही व' कारभारी म्हणून सवे काठेवाड भर कीर्ती पसरली होती. ब्रिटिशांनी सुद्धा त्याच्या धैर्याची व मृत्सद्दीपणाची वाखाणणी केळेली आहे.
त्यांना संस्कृत, हिंदी व फारसी' भाषा येत' होत्या. त्यांनी 'शिंव माहात्म्य" हे व्रजभाषेत आणि ' तारीखे सोरठ * (याचे इंग्लिश' भाषेत भाषांतर झाले आहे)
६४ : गुजराती साहित्याचा इतिहास
व ' रुकतू-ए-गुनगुन् ' (निरनिराळ्या पत्रांचा संग्रह) हें दोन ग्रंथ फारसी' भाषेत लिहिळे आहेत'.
रणछोडजी हें शिव व शक्तीचे उपासक होते. त्यांनी ' शिवगीता ' लिहिली आहें व ' दुर्गासप्तशती 'चा गुजरातीत स्वैर अनुवाद केला आहें; पण ते आपल्या गरव्यांबद्दलच फार प्रसिद्ध आहेत. मध्यकालीन कवींमध्ये वल्लभ मेवाडो व 'रणछोडजी दिवाण हे असे दोन कवी आहेत कौ ज्यांच्या गरव्यांनी गुजराती' स्त्रियांच्या मनावर आपला अधिकार गाजवला आहे.
गिरधर [ १७८७-१८५२ ]
ह्याने 'तुलसी विवाह', 'राजसूय यज्ञ', अश्वमेध, 'गोकुळलीला', 'कृष्णलीला', *राधाकृष्णना महिमा ' इत्यादी' ग्रंथ लिहिले आहेत'; पण तो आपल्या ' रामायण! ह्या ग्रंथाबद्दळ प्रसिद्ध आहे. त्याचे ' रामायण ! हे कशाचे भाषांतरही नाही किवा रूपान्त'रही ताही. ती एक स्वतंत्र निमिती आहे. मात्र त्यासाठी त्याने' 'हनुमान नाटक' ' अग्निपुराण ', ' पद्मपुराण ' व ' तुलसीदास रामायण ' ह्यांतील घटनांचा आधार घेतला आहे. हे ' रामायण ' फार सोप्या भाषेत लिहिलेले आहे. व वर्षानुवर्षे गुजरातेत घरोघर भक्तिभावाने त्याचे पठण केले जात असे.)
ह्या काळातील दुसरे उल्लेख करण्यासारखे कवी म्हणजे रघुनाथदास व रावो भगत हे होत, रघुनाथदास हा आपल्या “ओघवजी! संदेशो कहेजो एयामते”?* (ओधवजी ! कृपा करून हा तिरोप कृष्णाला सांगा) ह्या सुंदर गरबीमुळे प्रसिद्ध आहे व रावो भगत पूढील अभर काव्य पंकतीबद्दल प्रसिद्ध आहें. “ बेडो बाई बुडतो तारो रे, अंबे आई, पार उतारो”39 (हें माते, ह्या बुडणाऱ्या नौकेला वाचव. हें अंबे आई, माक्षे नौका भवसागरातून पार नेऊन सोड.)
तळटिपा
१. कृपया परिशिष्ट 'ह' पहा. कवह्देंतां नावे' पार,
३. हिंदु म्हणजे भारतीय परंपरेप्रमाणे पुरष जन्मभर अविवाहित राहू शकतो; पण स्त्री' कधीही अविवाहित' राहू शकत' नाही.
४. भारतीय परंपरेप्रमाणे मुलामुलींची लग्ने आई-बापांनीच जुळवावया'ची असा नियम आहे.
१७, ११. १र. १३. १४. १५.
अठरावे शतक : ६५
स्मशान- हिंदूना अभगिसिंस्कार करण्याची जागा. अशी' समजूत होती' की स्मज्षानात भुते, चेटकिणी' व इतर अमंगळ पिशाच्च समंध वगेरे राहतात. अशा जागी संध्याकाळनंत'र पुरुषसुद्धा जाण्याची हिम्मत' करण्यास कचरतात. कृप्या अँपेंडिक्स परिशिष्ट 'आय' पहा.
“घोळा' हाही निःसीम भक्त होता व तो वल्लभचा भाऊ होता.
. अक्ष अति मोंघा हुवा, हो बहुचरी ! अधमं व्याप्यो असाध्य,
को कोनी करणी' जुवे, हो बहुचरी ! एक थकी एक अगाध, उदर थकी' उपजावियां, हो बहुचरी ! उभय तणो जे अंद, ते तन पेट तजावियां, हो बहुचरी' ! विक्रम कीधो वंश,
. गौरी माता आपली भक्ती करणार्या तरुण कुमारिकांता योग्य पती प्राप्त
करूत देऊन त्यांच्यावर कृपा करते, भशी मान्यता होती.
» “गोरमा ! घरडो के भरथार के मुजने आपियो रे, लोल,
गोरमा ! धिक््क कीधो अवतार, के शु कहुं तुजने रे, लोला, 0 “१ १
गोरमा ! मारू थय जोबन करे पियु बरवो थयो रे, लोल.
गोरमा ! सोळ मुने प्रत्यक्ष के एने हेंसी थयां रे, लोल, ५) २ ४1
गोरमा ! शियाळानी' रात के स्वाद होये घणा रे, लोल.
गोरमा ! मूरख घरडी जात के जेवो गुंगणो रे लोळ. 9 9 0
गोरमा ! जणतां त दीधी फांसी के विख दई भारती रे, लोल.”
वरील दोन्ही गरब्यातील ह्या उताऱ्यांतील काही भागांचे भाषांतर स्व. कृ.मो
झंबेरींच्या ॥॥116छाणा88 1१. ऐपं्या्ा1 .शःशॉा'5 ह्या पुस्तकातून
साभार उद्धृत करून घेतले आहेत'
हरिनो भारग छे शूरानो कायरनुं नहि काम जोने
हो वांसळडी ! वेरण थई लागी' रे ब्रजनी तारने.
जीभलडी' ! तने हरिगुण गातां आवडुं आळस क्यांथीरे !
श्रीकृष्णाचा पालक पिता.
श्रीकृष्णाची पालक माता.
'योग'- चित्तवृत्तींवर संयम ठेवून असीम आनंदाची प्राप्ती करून देणारे
शास्त्र.
गु.सा.इ....५
६६ ! गुजराती साहित्याचा इतिहास
१६. 'जेने राम राखे रे. १७. फूल्यो फं फरे रे ? भूलो भवकूपमां पड्यो. १८. भांगी गई भवबेडीओ, उघड्यां ब्रह्मभोवननां ताळां रे. १९. अंबाडी'ए गजराज गळियो, घोडाने गळी गयुं जीण, वस्त्र उपर बाड सुकाणी, समुद्र ने गळी' गय फौण, शशलो तो शाणो थईने रे शार्दुलने नाखे पेटमां. २०. 'छोटालाल' हे नरभेराम यांचे गुरू. २१. नाण्ं आपे नरभो रे, वावबरजो छोगाळा ! गांठ मारजो ताणी रे, धोळी धजावाळा' ! कप'टी केशव जाणत तो शाने आवत पचास जोजन ? सांभळ'घुं श्रवणे, साधुने छापे छे माटे मळवा धश्युं मन, दरशन द्योने रे, दूर करी पाळा. भेख देखीने नजर नथी' करता, छाप आपो छो हरि ! पाघडी' भाळी छाप' खावी छबीला | फ'रीक्षा तो एवी करी, समस्या लेजो समजी रे, जे कही' कानड काळा ! हारो छो जनथी', नथी' हरवाता, माटे हरि ! हृठ मेल, कहे नरभो छोटालाल प्रतापे, नथी ए तल्मां तेल, छेवान मुज पासे रे, हरि हरि जपमाळा' २२. प्रथम सद्गुरुनो सत्संग साचो, बीजो जे करो ते जाणो काचो, हरिनाम भूल्या ए ज पड्यो खांचो, माठे तमे' सद्गुरुने निणदिन जाचो. एवुं समज्ये आवे' पार, मळे सार, एक तार, मट खार आधार, नेति पार, विश्वाधार, नामरहित लेजो मानी, मानी के तेज ज्ञानी. २६३. घडे भर्य् पाणी रे, सुरज माहे आवी' पड्यो, धटाकाश' भास्यं रे, भाग्यो तेनी' साथे लड्यो. घडारमां मारो सूरज हतो ते' भागी नाख्यो अल्या भूर ! घडो गयो तेनी चिंता नथी भाई (पण) नाशी गयो मारो सुर, एने क््यांही देलं रे, जुक्तिए शेमां जड्यो... घडे भर्य.
२४.
२५, २६. २७, र्ट, २९. २३०,
३१.
३२. ३३.
अठरावे शतक : ६७
गुंज'रातेत' कोणाही हिंदूच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचे शव स्मज्यानात नेऊ लागतात तेंव्हा घरातील व कुटुंबातील स्त्रिया वर्तुळाकार उभ्या राहून तालावर छाती कुटून-पिटून मृत व्यक्तीच्या मोठेपणाबद्दल व॒वैभवाबद्दळ वणन करणारी गाणी म्हणतात. ह्या गाण्यांना “राजिया” असे म्हणतात. काम, क्तोध, लोभ, मोह, मद, मत्सर.
प्राणिय्रा ! भजी लेने किरतार, आतो सपन छे संसार.
जोई ल्यो जगतना बावा, धर्यो भेख धूतीने खावा.
एक प्रकारचे हिंद्रु संत्यासी. त्यांचे जीवन अघोरी, अमातृष प्रकारचे असते. शेठ सगाळशा साधुने सेवे, वाणियो पाळे बनत.
नाथ ! मोरी अरज सुनो अविनाशी !
हुं तो जनम जनम तोरी दासी.
गिरधरची देवावरची भक्ती प्रखर व अढळ होती. जेव्हा तो उत्तर हिंदुस्थानातील तीर्थक्षेत्रांची यात्रा करीत होता तेव्हा त्याला राजस्थानातील श्रीनाथजीला जाण्याची इच्छा झाली; पण ज्या एका रंगीलालजी महाराजां- बरोबर (देवाच्या सेवेकऱ्याबरोबर) गिरधर त्या यात्रेला निघाला होता त्यांनीच त्याला तेथे जाण्याची मनाई केली. म्हणून मग श्रीनाथजीचे' अखंड स्मरण करीत' व त्याच्या तावाचा जप करीत यात्रेतच गिरधरने' देह ठेवला. ओधवजी ! संदेशो कहेंजो श्यामने
बेडो बाई बुडतो तारो रे,
अंबे आई, पार उतारो रे.
प्रकरण सातवे
अठरावे शतक ते एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध
[१]
स्वामिनारायण-संप्रदाय ब त्याचे साहित्य
मध्यकालीन साहित्यात स्वामिनारायण-संप्रदायाचे साहित्य आपल्या निराळे. पणाने उठून दिसते.
रामानंद हा ह्या संप्रदायाचा संस्थापक; पण त्याचा शिष्य़ सहजानंदस्वामी ह्यानेच ह्या संप्रदायास प्रतिष्ठा मिळवून दिली' व सर्वेसांमान्य लोकात' ह्याचा प्रचार केला.
सहजानंदस्वामी [१७८१ ते १८३०]
ह्वा उत्तर प्रदेशात' अयोध्येजवळ छपैया येथे जन्मला, तो १८०१ मध्ये गुज'रातेत' भाला, त्यावेळी धर्माबांबतची फ्रिस्थिती अगदी असमाधाभका'रक होती, धर्माचे धूरोणत्व व सत्ता ब्राह्मणांचे हाती होती. व' ब्राह्मणांनी' धर्माचा जघळ जवळ मक्ता'च घेतला होता. भव्तिसंप्रदायाने जरी' जाती, पंथ, स्त्री-पुरष व समाजातील व्यक्तीचे स्थान' ह्यात भेवभाव न ठेवता सर्वांना आपल्या संप्रदायाची द्वारे खुली' करून दिली होती, तरी त्यांचे' धार्मिक विधी, क्रियाकांड व समारंभ ह्यासाठी ' जो पैसा खर्चे करावा लागे तो सर्वांना परवडण्यासारखा नव्हता. मागासलेल्या वर्गातील छोकांकडे कोणाचेच लक्ष नव्हते आणि त्यांची गरिबी, अज्ञात व योग्य सांस्कृतिक वातावरणाचा अभाव ह्यामुळे ह्या वर्गातील बरेच लोक अंधश्रद्धेने ग्रासले होते आणि त्यामुळे ते चुकीच्या व वाईट मार्गाचे अवलंबन करीत होते. विशेषतः खेड्यापाड्यातील लोक ह्याला बळी पडत होते.
सहजानंदाचे' हृदय हे सवे पाहून अतिशय द्ववले. म्हणून खेडीपाडी' हीच त्याने
अठरावे शतक ते एकोणिसाव्या शतकाचा पुर्वार्ध : ६९
आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडली व आपल्या संप्रदायाच्या तत्त्वांचा त्याचे. तेथेच प्रचार केला. हिंदु धर्माच्या निरनिराळ्या शाखा व पंथ ह्ातुत जे काही चांगले होते' ते घेऊन त्यांचे एक रसायनच त्याने बनविले आणि त्यामाफंत' लोकांना पवित्र, शुद्ध, उपयोगी व निष्ठामय जीवन कसे' जगावे ते दाखवून दिले. त्यांच्या' संप्रदायाचे मुख्य दैवत श्रीकृष्ण हेच होते; 'पण इतर वैष्णवांच्या मंदिरातील पुजेच्या रीतीपेक्षा हया संप्रदायाची रीत' अतिशय सोपी व साधी होती आणि त्यांची' शिस्तही फार कडक होती.
ह्या संप्रदायाला ' उद्भव-संप्रदाय ' किवा ' स्वामितारायण-संप्रदाय ' म्हणून ओळखले जाऊ लागले. वडताल, गढडा व अहमदाबाद ही ह्या संप्रदायाची मुख्य' केने आहेत. ह्या पंथाच्या अनुयायांना ' सत्संगी ' ( चांगल्या व खऱ्या गोष्टींचे' सोबती ) असे' संबोधण्यात येऊ लागले. वैष्णवसंप्रदाय किवा पुष्टिमार्ग यांच्या अनुयायांना वैष्णव असे म्हणत. त्यापेक्षा निराळे नाव ह्यांनी धारण केले.
हृया संप्रदायाच्या साधूंना काही अतिदाय कडक निर्बंधांचे कसोशीने पाळन' करावे' लागते. सहजानंदस्वामी अथवा स्वामिनारायण ह्यांनी विचार, वाणी व' वततन ह्याविषयी हे निर्बंध घालून दिले आहेत. साधूंनी पोळण्याचे नियम व 'सत्संगी' लोकांनी (सामान्य अनुयायांनी) पाळण्याचे नियम ' शिक्षापत्री' ' ह्या ग्रंथात' ग्रथित केले आहेत.
हा संप्रदायाच्या साधूंच्या विचारातील व आचारातीळ पवित्रपणा व' साधेपणा, तसेच मागासलेल्या वर्गातील लोकांबद्दलचा त्यांचा आपळेपणा, ह्यामुळे कामकरी वर्ग आणि समाजातील खालच्या थरातील लोक ह्यांच्यावर ह्या संप्रदायाचा खोल परिणाम काला व॑ त्यांच्या मनावर ह्या संप्रदायाची पकड बसली'. ह्या संप्रदायाचे पालन कोणीही' करू शकतो. त्यात' जात-पात कोणतेद्दी' भेदभाव ताहीत' ह्या संप्रदायाचे साधू व सामान्य लोक साधे, शुद्ध, प्रामाणिक व कष्ट करणारे असतात'. ते दुर्व्येसने, भादक पदार्थांचे सेवन व विषयसुखोप्भोग (ह्यापासून दूर असतात आणि ह्या सर्वांमुळे लोकांच्या मतात त्यांच्याविषयी विष्ववास उत्पन्न झाला व' त्यामुळे लोकांचे नैतिक जीवन फारच सुधारले.
'ह्या' संप्रदायाने लोकांना आपली जमीन, धत्तदौळत, स्त्रिया व आपले जीवच हाच आपला फार पवित्रे व' महत्त्वाचा ठेवा आहे, असे. मानून राहण्यास सांगितळे आहे. वेश्यागमन, मांसाहार व सुरापान ह्यांचा निषंध केला आहे. साधूंना स्त्री- संपर्कापासून अलिप्त राहण्याचा कडक निबंध घातरा, तरीपॅण त्यांनी स्त्रियांना पुरुषांपेक्षा कोणत्याही दृष्टीने कमी' मॉनळे नाही. उलट 'ह्या संप्रदायाने स्त्रियांत्ता पवित्त मातले आहे व त्यांचा' आदर करण्पास सांगितले आहें. त्याने विधवा विवाह्वालाही' मान्यता दिलेली आहे.
७० ; गुजरातो साहित्याचा इतिहास
ह्या संप्रदायातील अनेक साधू जरी गरीब, अशिक्षित व संतुष्ट वृत्तीच्या खालच्या वर्गातून आलेले आढळतात, तरी त्यांच्या साहित्यातून त्यांनी केलेली लोकांची सेवा अप्रतिम आहे. हे साहित्यिक देवाचे -अतत्य भक्त आहेत, त्यांनी आपल्या साहित्यातून ज्ञान, वैराग्य व' त्यायाची खरी शिकवण, संयमित व शांत वृत्तीने दिली' आहे, जाणि हेच ह्या संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे. विशेष गोष्ट अशी' की' प्रपंचातील माळमिळकत, प्रतिष्ठा व सुखोपभोग ह्यांचे वेयरथ्य॑ उपदेशूनदेखील त्यांनी इतर कवींप्रमाणे वैराग्याला फाजील महत्त्व दिलेळे नाही, मानवी जीवनाची महत्ता समजून श॑रीरधारणेस आवश्यक अशा गोष्टींना तुच्छ न हेलखता व्यावहारिक व' पारमाथिक विकास साधणे अत्यंत जरुरीचे आहे, असे त्यांनी प्रतिपादिले, इतर कवी! पूर्वीच्या परंपरेप्रमाणे शरीराला तुच्छ मातून त्याला कच्च्या मडक्याची उपमा देत; 'पण स्वामिनाराय'ण-संप्रदायाच्या साधूंनी शरीर तुच्छ असले तरी भाध्यात्मिक प्रगतीसुद्धा त्यामुळेच शक्य आहे, असे प्रतिपादित केले,
ह्या संप्रदायातील साधुकवींमध्ये पाच कवींची नावे. ठळकपणे नोंदण्याजोगी' आहेत, ते कवी पुढीलप्रमाणे आहेत -
मुक्तानंद [ १७६१ ते १८३० ]
मुक्तानंद हा सहजानंदाचा वडील गुरुबंधू होता. असे' म्हणतात की त्याने ज्ञान, वैराग्य व शृंगार ह्या विषयांवर जवळ जवळ ९००० पदे लिहिली आहेत. त्याशिवाय त्याचे /ओधवगीता', 'सती गीता', 'शिक्षापत्री', 'धर्मामृत, 'प्रेमलीला' य 'रांमलीळा? हें ग्रंथही आहेत. त्याने' मुकुंद अथवा भुकुंददास ह्या नावाने 'मुकुंद- बावनी” नावाचा ग्रंथही लिहिला, 'मुकुदबावनी” म्हणजे मुकुंदाते लिहिलेली ५२ पदे. मुकुंद अथवा मुकुंददास हे मुक्तानंदाचे दीक्षा घेऊन सांप्रदायिक साधू* होण्या- पुर्वीचे ताव. तो मुख्यत्त्वे आपल्या ज्ञातविषयक कवितांबद्दल प्रसिद्ध आहे.
म्रह्मानंद [१७७२ ते १८४९]
ब्रह्मातंदाने चारणी? छंदांचा पद्धतशीर अभ्यास केलेला होता व' त्याला गुजराती, चारणी व हिंदी ह्या तीत भाषा येत' होत्या.
त्याने गुजराती' कविता ' ब्रह्मातंद ' ह्या तावाने' लिहिल्या, चारणी कविता (“चारणी” ही' चारण लोकांची बोलीभाषा, चारण हें दरबारी' लौकिक कवी' त्यांच्या छंदातीळ कविता) 'लाडू' ह्या तावाते व हिंदी कविता 'श्रीरंग' ह्या नावाने' लिहिल्या, त्याने जवळ जवळ ८००० पदे लिहिली असे म्हणतात. त्याच्या एका पदाची पहिली ओळ ' एक दिन शशि अति उजास '* अशी असुन ते पद 'चर्चरी'* छंदात' लिहिलेळे आहें व भावदानजी नावाच्या सत्संगीने गायिलेले आहे. इ. स. १८२६ ते १८३१४ दरमन्यातच्या काळात ह्या पदाने हजारो लोकांना आर्काषेत केले होते.
अठरावे शतक ते एकोणिसाव्या शतकाचा पुर्वार्ध : ७१
त्यांची काही पंदे-उदाहू्रणाथं ज्याची सुरुवातीची ओळ अशी आहे-- आ ततरंग पंतंगसरिखो जाता वार न लागे जी ।/» यासारखी पदे गुजराती कवितेच्या चाहत्यांना वर्षानुवर्षे फार आवडती झाली होती. ज्ञान व वैराग्यविषयक पदांशिवाय त्याने 'दानलीला', 'क्ृष्णकीतंन' ह्यांविषयीची पदे व शृंगारविषयक पदेही लिहिली भाहेत; पण भ्रह्मानंदांचे विशेष कौशल्य मात्र त्याच्या बोधपर कवितांत' दिसून येते.
प्रेमानंदस्वामी [ १७७९ ते १८४५ ]
सहजानंदस्वामी याला प्रेमानंद सखी' अथवा प्रेमसखी'“* असेही संबोधत भसत. भक्ती, ज्ञान व शुंगारविषयक पदांव्यतिरिक्त या प्रेमसखीने सहजानंद- स्वामींचा* वियोग झाल्यावर त्याविषयी अतिशय हृदयस्पर्शी पदे लिहिली आहेत. त्याचा भावाज फारच गोड होता व त्याला संगीताचे सखोल ज्ञान होते. त्याचे पुढील पद ऐकून त्याच्या श्रोत्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते पद “ वंदु सहजानंद रसरूप अनुपम सारने जो ।”?)" असे आहें. ह्या पदातुन विरहृव्यथेने व्याकुळ झ्लालेल्या हृदयातील भावना सुंदर रीतीने प्रगट झाल्या आहेत. प्रेमसखीने 'तुलसी-विवाह' व 'थाळ' ही काव्ये रचिली आहेत. 'थाळ'मध्ये गुजरातेतील विवाहादि मोठ्या समारंभाच्या वेळी ताठात (याळीत) वाढलेल्या उत्कृष्ट भोजनातील विविध रुचकर मिष्टान्नांचे वणन केलेले आहे.
तिष्कुलानंद [ १७६६ ते १८४८ ] याने ३००० पदे रचली आहेत. त्यांचे मृख्य विषय त्याग व वेराग्य आहेत. त्याची' पुढील पदे-“जननी' जीवो रे गोपीचंदनी (जेणे) पुत्रने प्रेयो वेराग्यजी 1709 तसेच " त्याग न टके रे वैराग्य विना ”"* आणि ह्यासारखी काही इतर पदे रस्त्यावरून फिरणारे साधू-संन्यासी व भाट-चारण भिक्षा मागताना गरात असत. ह्या पदांब्यतिरिक्त वनिष्कुलानंदांनी 'भक्त' चिंतामणि” 'धीरजाण्यान' ही काव्ये रचली आहेत; पण त्याचे खास वैशिष्ट्य वैराग्यपर कवनातच आहे.
देवानंद
देवानंदाने भक्ती व वैराग्यपर बरीच पदे लिहिली आहेत. साधू-संन्यासी व रस्त्यावरूत भटकणारे भिक्षेकरी भिक्षा मागताना त्याची पदे म्हणत असत'. त्याचे ५ ईू्दवरावर दुढ प्रेम (भक्ती) करा, येथूत जाताना सवे मालमत्ता येथेच टाकून द्यायची' आहे. मृत्यूच्या वेळी आपण एकटेच आहोत. आपणाला त्यावेळी कोणी मित्र, आप्तबांधव असत नाहीत.” ह्या अर्थाचे पद? एके काळी सर्वतोमुखी झाले होते. देवानंदाने ' गरबी? व' 'चाबखा' ही सुद्धा लिहिली नाहेत. तो दलपतरामाचा गुरू होता व अशा रीतीने तो जुन्या व नव्या काळाला जोडणारा दुवाच ठरतो.
७२ : गुजराती साहित्याचा इतिहास
[२]
ह्या युगातील स्वामिनारायण-संप्रदायान्यतिरिक्त इतर कवि
रणछोड [ १८०४ मध्ये हयात ]
हा “रामायण', 'राधाविवाह' व 'रणछोडजीनो गरबो' ह्या 'रचनांबहदळ ख्यातनाम आहे. ' रणछोडजीनो गरबो' ह्या गरब्यात रणछोडजी' (श्रीकृष्ण) हा आपला नम्र प्रेमळ भक्त बोडाणा ह्यांच्यासाठी द्वारका सोडून डाकोरला येतो त्याचे वर्णन आहे. हा गरबा आजसुद्धा गाण्याची' प्रथा आहे. रणछोडची विशेष ख्याती मात्र 'अन्नदेव-स्तोत्र' ह्यामुळे आहे. ह्यात अन्नस्वरूपी देवाचा महिमा गायला आहे. नरसिंह, प्रेमानंद व शामळ ह्यांनीही आपल्या काव्यात 'मूठभर तांदुळा"ची' अंमाप' स्तुती केली आहे. कारण त्या शिवाय ह्या जगात' कोणतीच गोष्ट-- देवा'ची भक्तीसुद्धा-शक्य होणार ताही; पण मध्ययुगीन साहित्यात रणछोड हा असा एकच कवी' आहे कौ ज्याने प्रत्यक्ष अन्नाला संबोधूतच, कविता केली आहे. अन्न हे प्रत्यक्ष देवच आहे व बाकीचे सर्वे पदार्थ त्याच्या अंकित आहेत, असे तो त्यात म्हणतो. (परंतु) हे काही एखादे विनोदी किंवा केवळ गमतीचे काव्य नाही, एवढे मात्र वाचकांनी लक्षात ठेवले पाहिजे.
ह्या काब्याचा भावार्थ असा आहे -
५ हे अन्नदेवा, माझा पहिला प्रणाम तुला, सकाळच्या प्रहरी लहान मुळे झोपेतुन जागी झाली की ती रडून ओरडून त्यांच्या आईपाशी पहिल्याने काहीतरी खायला मागतात. कोणालाही वेळेवर खायला मिळाले की त्याला कसे प्रसन्न व स्वस्थ वाटते; पण अन्न मिळायला थोडासा जरी विलंब झाला तरी माणूस कमजोर ब दुबळा बनून जातो; मग तो दुसः्याशी' बोलताना चिडतो, संतापतो, अभ्यासात त्यांचे मन लागत नाही, त्याला भोवळ येऊ लागते व भरगळून गेल्यासारखे होते. एकादशी *४ १५-१५ दिवसांती एकदाच येते व लोक ती. पाळतातही; पण त्या रात्री! त्यांना स्वप्नेसुद्धा अघयाचीच पडतात' व ते' उत्सुकतेने सकाळ होण्याची' वाट पहात राहतात. जो स्वत:ला सर्वात बलवान मानतो अथवा जो खरोखरच सर्वा- पेक्षा बलवान असतो, त्यालासुद्धा जर तुझी प्राप्ती वेळेवर काली नाही तर तोसुद्धा अगदी मरगळून जातो. त्याचा शक्तिपात होतो. तेहतीस कोटी' देव?" सुद्धा हे अभ्षदेवा, तुझीच पूजा करतात,”
'रणछोड म्हणतो- “ हे अन्नदेवा, खरोखर प्राणिमात्राची प्रत्येक कृती किवा हालचाल तुझ्यावरच अवलंबून आहे.”१६
अठरावे शतक ते एकोणिसाच्या शतकाचा पुर्वार्ध : ७३
[३]
दयाराम [१७७६ ते १८५२]
मध्यकालीन गुजराती साहित्यातील प्रमुख कवींपैकी शेवटचा हा मोठा कवी, त्यावेळच्या दुसऱया कोणत्याही कदीच्या जीवनापेक्षा दयारामच्या जीवनाविषयी बरीच अधिक माहिती उपल्ब्ध आहे. तरी त्याच्या नावाशी काही दन्तकथा तिगडीत' झालेल्या आहेतच.
दयारामाचा जन्म नमंदेच्या काठच्या चांदोद ह्या गावी १७७६ मध्ये झाला. त्याचे वडील प्रभुराम त्याच्या वयाच्या १० व्या वर्षी निवतंळे व' त्यानंतर दोत वर्षांनी त्याची' आई महालक्ष्मी (राजकोर ) ही कालवश' झाली.
तो १३ वर्षांचा असताना योगायोगाने त्याची डाकोरच्या इच्छारामभट्ट्जी ह्याच्याशी भेट झाली', ह्या भेटीचा त्याच्या कोमल मनावर इतका प्रभाव,पडला आणि त्याच वेळी त्याने निश्चय केला की आपण ह्या संसाराच्या फंदात कधीही पडावयाचे नाही व आपला देवाधिदेव जो श्रीकृष्ण त्याची भक्ती करण्यातच आपले आयुष्य व्यतीत करावयाचे.
काही' दिवसांनी त्याच्या कानावर ओले की आपले मामा आपले लग्त जमविण्याच्या खटपटीत आहेत, तेव्हा तो घरातून पळून गेला. पूर्ण १२ वर्षे तो सबंध भारतभर फिरला व त्याने प्रत्येक मुख्य तीथंधामाची यात्रा केली.
ही' सव यात्रेची ठिकाणे त्याने पुन्हा दोत वेळा पाहिली. त्याने आपल्या आयुष्याची २५ वर्षे प्रवास करण्यात घालविली, त्यामुळे त्याला बरीच ठिकाणे, क्षेत्रे पहायला मिळाली; तसेच जीवनाचे विविध पैलू त्याने पाहिले व भारताच्या अत्तेक भाषांशी त्याचा परिचय फ्षाला, दयारामाने गुजराती, हिंदी व मराठी' भाषेत कविता लिहिल्या भाहेत.
जेव्हा तो प्रवास करीत' नसे तेव्हा तो चांदोद गावी अथवा जवळच्या डभोई ह्या लहान शहरात रहात असे' व तेथेच ९ फेब्रुवारी १८५२ मध्ये त्याचे निधन झाले. तो शेवटची' १७ वर्षे डभोईत' रहात होता.
दयारामा'च्या मृत्यूच्या वेळी ब्रिटिश हें हिंदुस्तातात आलेलेच होते. इंग्रजी शिक्षणाच्या शाळा सुरू क्षाल्या होत्या. 'मुंबई समाचार', 'ज्ञानप्रसारक' ही गुजराती वृत्तपत्रे व अँग्लोइंडियन वृत्तपत्र 'चाबूक' ही प्रसिद्ध होऊ लागली होती. 'दि गुजरात व्हर्नाक्युळर सोसायटी' आणि 'बुद्धिवर्धंक सभा” ह्यांनी आपले कायें सुरू केळे होते आणि सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक बाबतीत गुजरातमध्ये नवी स्पंदने उत्पत्न झाली होती.
पण दमारामाची मतोवृत्ती बाळपणापासून निराळ्याच साच्यात घडलेली
७४ ; गुजराती साहित्याचा इतिहास
असल्यामुळे ह्या सर्व घडामोडींचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्याच्या मृत्यूबरोबरच गुजराती साहित्याचा मध्यकालही संपुष्टात आला.
प्रेमानंद व शामळ यांप्रमाणेच दयारामाची साहित्यनि्मिती विपुल व बहुरंगी आहें. दयारामाने पदे?७, आख्याते?<, महिता**, चरित्रकाव्ये*", संवाद*१, गरबे व गरबी लिहिली आहेत. त्याव्यतिरिक्त' त्याने “रसिकवल्लभ', 'संप्रदायसार', *रसिकरंजन” इ. पुष्टिमार्गी तत्त्वे विशद करणारी काव्ये आणि 'प्रबोध-बावनी', 'अशनोत्तर-मालिका' व “'भक्तवेल' ही बोध व भक््तिप'र काव्येही लिहिली आहेत, त्याने हिंदीत 'सतूसेया' हें काव्य लिहिले आहे. त्याते काही गद्यरचनाही' केलेली आहे. १) रसिकवल्लभ-
पृष्टिमार्गातील तत्त्वांचे सविस्तर व विशद वणंन करणारी ही दीघे कविता म्हणजे दयारामाच्या तत्त्वज्ञानाची चावीच असून त्याच्या सवं काव्यकृतीत ह्याच तत्त्वज्ञाताचा ल्लोत वाहात आहे.
२) मौरा-चरित्र-
ह्या लहानक्या सुंदर कवितेत' मीराबाईच्या जीवनातील चमत्कार व अद्भुत प्रसंग वणिळे आहेत. गुजरातीत मीराबाईच्या चरित्रावर कविता लिहिणारा दयाराम हा पहिला कवी आहे.
दयारामची' विशेष ख्याती त्याने रचलेल्या 'गरबीं'बहदळ आहे.
३) गरधी-
ज्याप्रमाणे तरसी मेहताची 'प्रभातिया', अखोचे 'छप्पे', वल्लभचे' 'गरबे', प्रीतमची' 'पदे', धोरोची 'काफी', बापुसाहेबांचे 'राजिया', भोजोचे' 'चाबखा' त्याप्रमाणे दयारामाच्या 'गरबी” खास उल्लेखनीय आहेत.
'गरबी” लिहिणारा दयाराम हा पहिला कवी' नाही. नरसी' मेहता, ,भाळण, प्रेमानंदस्वामी व दुसऱ्या काही कवींनी पुर्वी 'गरबी' रचल्या होत्या; पण दयारामातनेच 'गरबी'ला पूर्ण स्वरूप देऊन तिला उच्चकोटीळा पोहोचविले, त्याच्या बःयाच उत्कृष्ट रचना भावपुर्णे काव्यांचे' वा गीतांचे नमुनेच आहेत'
दयारामाच्या 'गरबी'मध्ये नवविधा भक्तीचे*२,. व अष्टनायिकांचे** सुंदर चित्रण झालेले दिसून येते. एवढेच नव्हे तर मानवमात्राच्या अंतःकरणाचे सत्य- चित्र रेखाटण्यात दयारामाची सिद्धहस्तता दिसून येते. ,दयारामाच्या गरबीमध्ये राधा, कृष्ण, ब्रजांगता गोपी, बांसरी व वृंदावन ह्यांचे भरपूर उल्लेख आहेत. त्याच्या गरबीतीळ मुख्य वस्तू म्हणजे राधाकृष्णाचे प्रेम, ह्या प्रेमातील शुंगार कधी' 'संयोग-शृंगार' आहे तर कधी ' विप्रलंभ' म्हणजे ' वियोग-णृंगार आहे, 'राधेच्या- हृदयातील भावविष्वव दयारामाने जितके स्पष्टपणे व कुशलतेने रंगविले
अठरावे शतक ते एकोणिसाव्या शतकाचा पुर्वार्ध : ७५
आहे तितके कृष्णाचे भावविषव उत्कटपणे रंगविलेले नाही. राधेच्या हृदयातील उत्कट प्रेमाच्या निरनिराळधा छटांचे-आतंता, ईर्ष्या, कोप, अभिमान, क्षमा, पश्चात्ताप, धिक्कार वगेरेचे-जितके सुंदर वर्णन करता येईल तितके त्याने केले आहे.
खेळकर विनोद व मधुरता हे दयानंदाच्या काव्याचे मुख्य विशेष होत. 'होचनमननो झगडो' (डोळे व मन ह्यांचे भांडण) यामध्ये गोपींची विरहव्यथा, गोपींचे मत्त व डोळे हांच्या भांडणाच्या रूपाने, फार सुंदर रीतीने व्यक्त' केळेली आहें. ज्या क्षणी गोंपीने श्रीकृष्णाला पाहिले त्याच क्षणी तिचे मन त्याच्या आधीन ' झाले. मत्तात सारखा कृष्णाचाच ध्यास आहें; पण तो प्रत्यक्ष कोठेच दिसत नाही' ! म्हणून गोपींचे डोळे मनाशी भांडण उकरून काढतात व म्हणतात, “ तू आमचा विष्वासघात केला आहेस. कारण खरोखर डोळ्यांमाफतच मनाची श्रीकृष्णाशी* ४ ओळख झाली व आता मत मात्र डोळयांनी आपल्यावर काय उपकार केले आहेत याची जराही पर्वा न करता कृष्णावर आपला एकट्याचा अधिकार चालवीत' भाहे.”” मन ह्या आरोपाला उत्तर देते, “मी नि:संगाय' नेहमी कृष्णाबरोबरच आहे; पण जोपर्यंत मी तुमची त्याच्याशी भेट घडवून आणणार नाही तोपर्यंत मला जराही स्वस्थता-शांती लाभणार नाही'.”२*
कृष्णाने राधेला 'शशिवदनी? असे संबोधिले तेव्हा राधने आपला तीव्र रोष व्यक्त' केला आहे, त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. राधा म्हणते, “हें सखि, मी आता त्या नंदकुमाराशी कधीही बोळणार नाही. त्याते मला 'शशिवदनी” म्हटके त्याच क्षणी माक्ा संताप' अनिवार झाला, चंद्रबिबावर तर कलंक (डाग) असतो व' दर सहा महिन्यानी (चंद्रग्रहणात) राहू त्याला गिळून टाकतो. चंद्र प्रतिपक्षी वाढत' जातो व क्षीण होत जातो आणि नेहमी पुणे तेजाने तळपत नाही, 'शशिवदनी' म्हणून त्याने मळा चंद्राच्याच पंक्तीला बसविके भाहे.”*१
भापल्या 'रंगव्यत्यय' (रंगाची' अदलाबदल) ह्या काव्यात' राधा थट्टेने कृष्णाला आपल्यापासून दूर राहण्यास व आपल्याला स्पर्श त करण्यास बजावते. कारण ती म्हणते, “तुला जर भी माझ्या शरीराला स्प करू दिला तर भाझा रंग काळा होईल.”१७ त्याबरोबर कृष्ण ताबडतोब तिला एक सुंदर उपाय सुचवतो. तो म्हणतो, “असं होय ! तर मला पुन्हा एकदा भालिंगन दे म्हणजे पुन्हा रंगाची अदलाबदल होईल. माझा काळा वरण मला पुन्हा प्राप्त होईल व तु पुन्हा गोरी होशील,?१८
ही. दयारामाच्या खेळकर विनोदाची काही उदाहरणे आहेंत. त्यावरून आपल्याला संस्कृत सुभाषितांची* ५ आठवण होते. तसेच ब्रजभाषेचा कवी सूरदास आणि गुजरातच्या भक्तिपरंपरेतील नरसिंह मेहता व मीराबाई यांचीही आठवण
७६ : गुजराती साहित्याचा इतिहास
होते; पण दयारामाच्या ह्या काव्यातील त्याप्रमाणेच एत'र काव्यातील भादमधृर शब्दयोजता मात्र खास त्याची स्वतःचीच आहे.
दगारामाच्या 'गरबी'च्या सुरुवातीच्या ओळी नेहमीप्रमाणे फोर आकषक आहेत. अनेक गरबींचा आरंभ पुढे दिलेल्या भावार्थाच्या ओळींनी होतो. “ माझ्या लाडक्या बिहारी, तू जरा थांबलास तर मी तुला काहीतरी सांगणार आहे,”?" “ माझ्या प्रियतमाने माझ्यात काय पाहिले ते. मी' कसे सांगू ?*१ मी' आजपासून काळ्या रंगाच्या कोणत्याही वस्तूजवळ जाणार नाही'.2२ प्रेमाचा अंश घेऊन जो जन्माला येतो त्याच्याच हृदयात प्रेमाचे वास्तव्य असते.”33 ह्या गुजराती साहित्यातील अत्युत्तम पंक्ती आहेत.
ह्या काळातील इतर कवींच्या उल्लेखनीय ग्रंथांमध्ये पुढील पुस्तकांची नोंद केली पाहिजे,
१) विमल प्रबंध (१५१२)-
लावण्यसमय कवि-रचित हे'विमलणशाचे ९ अध्यायात लिहिलेले चरित्र आहे. विमल्शा हा पहिला' भीमदेव ह्या राजाचा मंत्री' होता व' तो कलांचा' महात' भोक्ता व आश्रयदाता होता. माउंट आबूच्या पहाडावरील त्याने बांधून घेतलेली मंदिरे हे. शिल्पशास्त्राचे उत्कृष्ट नमूने आहेत', ह्या प्रबंध ग्रंथाचे ऐतिहासिक महत्त्व फार नाही व॑ त्यात उच्च साहित्यिक्र गुणही नाहीत; पण ह्या ग्रंथावरून त्या काळातील सामाजिक व्यवस्थेची, जातिभेद, उद्योगधंदे, स्त्रिया व पुरुष ह्यांच्या श'रीराव'रोल मंगळ व अमंगल चिन्हे, णुभ व अणभ एकुत्त, ज्योतिषशास्त्र, लढायांची रीत' व शस्त्रोस्त्रे वगैरेंची बहुमोळ माहिती मापल्याला मिळते.
२) रूपचंवकुंवर रास (१५८१) -
नयसुंदर-लिखित ह्या रासात' उज्जयिनीच्या एक व्यापाष्याचा मुलगा रूपचंद ' व उज्जयिनीत राहण्यासाठी आलेल्या गुणसेताची' भुलगी' ' सोहाग ह्यांच्या प्रेमाची कथा वणिली' आहे. सोहागने'' अविवाहित' 'राहूण्याचा निश्चय केलेला होता; पण ती' १७ वर्षांची झाल्यावर आपल्या रूप व बुद्धिमत्तेळा योग्य असा जोडीदार मिळावा अशी ' तिला तळमळ लागली. हे गुण तिला रूपचंदात' दिसले, कारण तिचा एक कूटप्रशत त्याने सोडविला, तेव्हा तिला तोच सुयोग्य वर आहे असे' स्वभाविकपणे वाटते; पण तो कूटभ़शन ' अथवा कोडे इतके' अवघड होते की राजा विक्रमसुद्धा ते सोडवू शकका नाही', सगळे प्रयत्न करून विक्रम राजीही' थकल्यावर तो आपल्याच मुलीचे (राजकन्येचे)' लग्न रूपचंदाशी' लावून देतो व' अशारीतीने रूपचंदाने सोहागचे कोडे कसे सोडवले ते आड मार्गाने जाणून घेण्याची त्याची इच्छा असते. आपल्या. सौंदर्याने व पतिभक्तीने संतुष्ट झालेल्या रूपचंदाकडून
अठरावे शतक ते एकोणिसाव्या शतकाचा पुर्वार्ध : ७७
राजकन्या ते' रहस्य काढून घेण्यात यशस्वी' होते, ती ते रहस्य आपल्या पित्याला सांगते. राजा विक्रम रूप'चंदाच्या बुद्धिमत्तेवर इतका खूष होतो की' तोही त्याच्या बदल्यात रूपचंदाचे सोहागशीही' थाटामाटाने लग्न लावून देतो. भात्र ह्या “रास'चा कवी स्वत: जेत असल्याने त्याले आपल्या कथेच्या शेवटी विक्रमाने जैनधभमे स्वीकारला ध' तायक रूपचंदानेही' संसाराचा त्याग करून जेन धर्माची दीक्षा घेतली, असे' लिहिले आहे.
ह्या कथेत अभिजात संस्कृत कवींच्या पद्धतीची आलंकारिक भाषेतील वर्णने आहेत. स्व. कनेय्यालाळ मुनशी म्हणतात, “ ह्या कराव्यात त्या (ठिकाणी कवीच्या प्रदेशात) बोलल्या जाणार्या भाषेतील व' परदेशी भाषेतील शब्दांचा फार भरणा आहे. तसेच भालणपेक्षाही' ह्या काव्याची भाषा जास्त आलंकारिक आहे. काही ठिकाणी मात्र त्यात संगीतमयता व भव्यता भरलेली आहे.
३) नलवमयंती रास (१६०९)-
कवी नयसुंदंर-रवक््ित हा रास 'नलोयन' ह्या काव्यावर आधारित आहे. *नलायन' हे वरणेनात्मक काव्य संस्कृतमध्ये आहे. माणिक्यचंद्राने ते सन १२२० मध्ये लिहिले, नयसुंदरला संस्कृत, प्राकृत, हिन्दी व उर्दू भाषा अवगत असल्यामुळे तो मूळ संस्कृत काव्यातील सौंदर्य व कोमलता आपल्या काव्यात बर्याच मोठ्या प्रमाणात' आणण्यात यशस्वी झाला आहे. ी ४.
तळटिपा
च्य
१. ' त्यावेळच्या ' रीतिरिवाजाप्रमाणे आणि काही हिंदूंच्या जुत्या ध्मंग्रंथाना अनुसरून साधारणपणे विधवाना पुनविवाह करत येत नसे.
२. असा' रिवाज होता की हिंदु साधू व संन्यासी संसारत्याग केल्यावर नवे' नाव' धारण करीत असत'. कदाचित भूतकाळाशी कोणत्याही तर्हेंचा संबंध न ठेवण्याची' ही' खूण असावी.
३. चारणी- आपल्या काव्यांत चारण कवी उपयोगात आणीत असलेले छंद, ' जाहीर ठिकाणी गाण्यास हे छंद फार योग्य असत. '
४, त्याते. संसाराचा त्याग केला त्यापुर्वी त्यांचे नाव लाडू बारोद असे' होते. ५. 'एक दिवस चंद्र अति' उज्ज्वंळ दिसत' होता. व
ज्ट
१५.
: गुजराती साहित्याचा इतिहास
ह्या पदाचे बरेचसे सौंदर्य मनाची पकड घेणाऱ्या तादमाधुर्यावर आणि आणि छंदाच्या गती व लयीवर अवलंबून असते. ते सौंदर्य दुसऱ्या इतर कोणत्याही भाषेत आणणे अशक्य असते.
'हा शरीराचा रंगढंग पतंग-फुलपाखरासारखा आहे. तो नाहीसा व्हायला वेळ लागत नाही.
असा रूढ रिवाज होता की, वेण्णव भक्त स्वत:ला स्त्री' समजत असत व फक्त एका श्रीकृष्णालाच पुरुष मानीत असत. असे सांगतात की, मीराबाई ब्रजला गेली' होती व तेथे तिने एक प्रख्यात वेष्णव आचार्य जीवगोस्वामी ह्यांची भेट घेण्याची' इच्छा प्रदर्शित केली, मी'राबाईला' असे सांगण्यात आले की', गोस्वामी स्त्रियांची भेट घेत नाहीत. तेव्हा मीरानाईने कवितेच्या दोन पंक्ती रचूत त्यांच्याकडे पाठविल्या. त्यांचा भावाथं असा होता- “आतापर्यंत मी खात्रीपूर्वक असे मातीत होते की, 'ब्रजा'त श्रीकृष्ण हा एकटाच पुरुष आहे. तुम्ही वृंदावनात राहात असूनसुद्धा स्वतःला अजून पुरुष भानता ! ठीक, तुमच्या विवेकबुद्धींची धन्य आहे.”
“आज लगी' हु एम जाणतीती, जे ब्रजमां कृष्ण पुरुष छे एक.
वुंदावन वसी हजी' पुरुष रह्या छो तेमां धन्य तमारो विवेक.”
असे' म्हणतात की', गोस्वामीना मी'राबाईच्या म्हणण्याचा अथ समजला व त्यांनी मीराबाईला भेटण्यास बोलावले,
स्वामिनारायण-संप्रदायाचे अनुयायी सहजानंदस्वामीना परमदेव - साक्षात् श्रीकृष्णच-असे मानतात. प्रेमसखी-गोपीचा श्रीकृष्ण म्हणजे सहजानंदस्वामी' होते.
“जो सहजानंद रसरूप' अन् अनुपम तत्त्वस्वरूप आहे, त्याला वंदन असो.”
“जिने पूत्र गोपीचंद याला वैराग्याची प्रेरणा दिली' त्या (गोपीचंदाच्या) जननीला उदंड' आगुष्य लाभो.”
“त्याग वैराग्याविना टिकतच' नाही.”
कर प्रभुसंगाथे दृढ प्रीतडी रे,
भरी' जावुं मेळी धनमाल,
अंतकाळे सगं नहि कोईनं रे.
चांद्रमासाच्या प्रत्येक पंधरवड्यातील (पक्षातील) अकरावा दिवस. त्या दिवशी उपवास व प्रार्थता करावयाची असते.
१ कोटी म्हणजे १०० लक्ष, तेहतीस कोटी' देव आहेत. भशी हिंदूंची मान्यता आहें; पण 'कोटी' म्हणज 'वर्ग' 'प्रकार' असाही' अर्थ आहे.
१
१६.
१७.
१ट. १९. २०. २१. २२. २३,
२४,
२५.
२६.
अठरावे शतक ते एकोणिसाव्या शतकाचा पुर्वार्ध : ७९
तमने आराधूं अन्नदेव! परथम करुं तमारी सेव,
सवार पहोरे सूतां उठे, बकोर करतां बाळ;
माता पासे खावा मांगे परथम प्रातःकाळ. तमते...
पहोर दहाडामां आवी' मळे तो काया करे कल्लोल;
माणस थाय छे मरवा जेवुं घडी थाय जो सोळ. तमने... वात' करता वढी पडे छे, भणतां जाय छे भूली;
आंखडीए अंधारां आवे, काया थई जाय लूली, तमने'... पंदर दिने एकादशी आवे', ब्रततणो महिमाय
रात' पडेने सप'नुं लागे, वाहाणुं क्यारे वाय ? तमने ... बळियामां जे बळियो कहावे', जे छे सहुथी बळियो;
ते जो पामे त्रीजे पहोरे, धूळ थईने ढळियो-तमने.., तेत्रीश॑ कोटि देव मळीने सह को तभने पूजे;
कहे रणछोड, अन्नदेव मळे तो सर्दे वातो सूझे. तमते... ('बृहत् काव्यदोहून,' ग्रंथ २, पृ.७६९)
* बाळलीला”, “रूपलीला”, 'दानलीला',, 'प्रेमरसगीता, ' 'प्रेमपरीक्षा”, “वीहाविलास' वगैरे.
'अजामिलाख्यान', 'वृत्रासुर-आख्यान' वगैरे.
*रसियाजीना महिना!, 'बार मासनी' गरबी', 'वहालाजींना महिना', वगैरे. 'मीरा 'चरित्र', 'नरसिंह मेहतानी हुंडी' वगरे.
'हतृमान गरुड संवाद', 'मन-मति संवाद' वगैरे.
श्रवण, कीतेंन, स्मरण, पादसेवन, अर्चना, वंदना, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. *स्वाधीचभतृंका', 'वासकसज्जा', 'विरहोत्कंठिता' *विप्रलब्धा,/ “'खंडिता', 'कलहांतरिता,' 'अभिसारिका', 'प्रोषितभतृंका', या संस्कृत' साहित्यशास्त्रातील अष्टनायिका, भलं कराव्यूं में तने' सुंदरवर संजोग; हुंने तजी तुं नित्ये मळे, हुं रहु हःखविजोग-
ब्रजमां वालाजी' कने हुं वसुं छं, नेण !
पण तुजने वणमेळवे हुं ना भोगवूं चेन.
हाचा सखी' हुं नहि बोलं रे, कदापि नंदकुंवरनी' संगे,
मने' शशीवदनी कही' छे रे, त्यारनी' दाझ लागी छे अंगे. चंद्रबिम्बमां लांछन छे, वळी' राहू गळे खटमासे रे,
पक्षे वधे ने पक्षे घटे, कळा नित्मना पुरण प्रकाशे. चंद्रवदनी कही तो ठर्या हुं ने चंद्र एक राशे रे.
! गुजराती साहित्याचा इतिहास
कहानकुंवर काळा छो, अडतां हुं काळी थई जाउं.
फरी' मळतां रंग अदलाबदली, मूज भोरो, तुज तोरो.
सुभाषिते-महत्त्वाची व अनेकवेळा शलेषपूर्णे अशा पद्यात सांगितठेल्या उक्ती, उभा रहो तो कहुं वातडी, बिहारीलाल!
हुं शं जाणुं जे वहाले मुजमां श॑ दी ?
एयाम रंग समीपे न जावुं मारे आजथकी.
जे कोई प्रेमजंश अवतरे प्रेमरस तेना उरमां ठर.
प्रकरण आठवे
एकोणिसावे शतक : समान्तर वाड्मयीन प्रवाह
एकोणिसावे शतक हे गुजराती साहित्यात एक महत्त्वाचा टप्पा आहे. ब्रिटिशांचे भारतात आगमन झाले तो प्रसंग, ते १९४७ साली' भारतातून निघून गेले 'ह्या प्रसंगा इतकाच महृत्त्वाचा, नव्या युगाचा आरंभ करणारा आहे. अनेक शतकां- पासून भारतात सारख्या राजकीय घडामोडी' होत' होत्या. निरनिराळ्या देशांतून आलेल्या अनेक धर्मांच्या व संस्कृतींच्या लोकांती अनेकदा आपापली सत्ताकेंद्रे येथे स्थापून आपले वर्चेस्व गाजवले; पण ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्यांच्याशी' झालेल्या संपर्काने आपल्या संस्कृतीवर व जीवनाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टि- बिंदूवर जो परिणाम झाला तसा इतर कोणत्याही देशाच्या किंवा धर्माच्या लोकांमुळे झाला नाही, हे आपल्याला भारताचा इतिहास पाहिला असता दिसून येईल.
ब्रिटिश लोक भारताच्या भूमीवर १८ व्या शतकात उतरे; पण त्यांची सत्ता येथे १९ व्या शतकात पूर्णपणे प्रस्थापित झाली.
भारतातील ब्रिटिशांच्या सत्तेचे आणखी तीत प्रतिस्पर्धी होते. फ़ेंच, हैदर व टिपू सुलतान आणि मराठे. पण वाँदीवॉश'च्या लढाईत १७६० मध्ये फ़ेंचांचा पराक्षव झाला. १७८१ मध्ये हैदरचा पराभव झाला. १७९९ मध्ये टिपू सुलतान मृत्यू पावला. अशा रीतीने १८ व्या शतकाच्या शेवटी ब्रिटिशांचे दोन बलवान प्रतिस्पर्धी नाहीसे झाले व शेवटी' उरलेळा एकच प्रतिस्पर्धी म्हणजे मराठे यांचाही ब्रिटिशांनी १८१८ 'मध्ये पराभव केला आणि १९ व्या शतकाच्या प्रथमार्धाच्या मध्यापर्यंत ब्रिटिशांची एकछत्री सत्ता भारतावर प्रस्थापित क्षाली. १८२६ पसून गुजरातमध्ये 'सुरत, अहमदाबाद, भरुच, खेडा, धोळक! व' नडियाद येथे नियमित शाळा सुरू झाल्या व त्या शाळांतून मुंबईत शिक्षण घेतलेळे शिक्षक नेमण्यात आले,
गु.सा.इ.... ६
८२ : गुंजराती साहित्याचा इतिहास
१८४० मध्ये ' नेटिव्ह बोर्ड ऑफ एज्युकेशन'ची स्थापना क्षाली व॒ दरेक जिल्ह्याच्या शिक्षणावर त्याची देखरेख सुरू झाली. १८५५ पासून शाळांतुन इंग्रजी माध्यमाची सुरुवात झाली. १८५२ मध्ये मध्ययुगीन गुजराती साहित्याचा शेवटचा महान् प्रतिनिधी दयाराम हा मृत्यू पावला. १८५७ मध्ये दोन भहत्त्वाच्या अशा घटना घडल्या की', त्यांनी भारतातीळ सर्वेच गोष्टींचे स्वरूप पार बदलून टाकले. एक म्हणजे मुंबई, कलकत्ता व मद्रास येथे युनिव्हसिटी स्थापन काल्या व त्यामुळे ह्या युनिव्हसिटींच्या कॉललेजांतूत शिक्षण घेणाऱ्या तरुण वर्गाच्या सांस्कृतिक, मानसिक व वैचारिक प्रवृत्तींवर हळूहळू फार परिणाम होऊन त्यात फार मोठ परिवर्तन होऊ लागले. दुसरी घटना. म्हणजे ' १८५७ चे शिपायांचे बंड '. ह्या घटनेमुळे तर देशाची राजकीय स्थिती संपुर्णपणे बदलून गेली.
अशा रीतीने १९ वा शतकाच्या मध्यापर्यंत भारतात ब्रिटिश राजवट भक्कम प्रायावर संपुर्णपणे स्थिर झाली. इंग्लिश भाषेचा प्रसार वाढला व इंग्रजीच्या प्रभावामुळे येथील लोकांना सर्वे जगाकडे पाहण्याचे एक द्वारच खुले झाले. इंग्लिश भाषा, इंग्लिश साहित्य व इंग्लिश राजवट ह्यांमुळे परंपरागत विचार, सामाजिक चालीरीती व' दैनंदिन व्यवहार ह्यांकडे' बुद्धिवादाच्या आधारे पाहण्याची व इष्टातिष्ट पारखण्याकडे भारतीयांचा कळ झुकत चालला. कन्याविक्रय, वरविक्रय, वर व वधू ह्यांच्यातील बौद्धिक व शारीरिक तफावत, बालविवाह, बालविधवांची' दुःस्थिती अशा काही वाईट चाली'रीती लोकांना असह्य वाटू लागल्या, कारण त्यामुळे आपल्या समाजाची शक्ती व उत्साह ह्यांचा अधःपात झाला होता. ब्रिटिशांच्या माफत आपला पाश्चिमात्य संस्कृतीशी प्रथमच उत्तम परिचय झाला व आपली पारलौकिक सुखाकडेच लागलेली दुष्टी थोडीतरी ऐहिक सुखाकडे वळू लागली'. परिणामतः आपल्यातील काही आदशंवादी तरुण व निष्पक्षपाती' विचारवन्तांच्या विचारांचा केन्द्बिन्दू साहजिकच सामाजिक सुधारणा हा बनला.
तो काळ असा होता की, जेव्हा (जगात) चहूकडे अस्वस्थता होती. नव्या नव्या कार्यप्रवृत्तींकडे लोक वळू लागले होते. काहींना काही करून दाखविण्याच्या वेडाने लोक झपाटल्यासारखे झाळे होते व काहीत'री करून राष्ट्राची प्रगती साधणे हें त्यांचे ध्येय झाले होते.
ह्या प्रवृत्तीचे दृश्य रूप म्हणज १७७८ मध्ये सरस्तमजी केरसपजी' ह्यांनी मुंबईला. सुरू केलेला पहिला छापखाता होय. आणि ' मुंबई समाचार ' हें साप्ताहिक वृत्तपत्र १ जुलै १८२२ ला प्रसिद्ध झाले. हे मुंबईतील पहिले व भारतातील दुसऱ्या नंबरचे वृत्तपत्र होय. ते दैनिक वृत्तपत्राच्या रूपाने १८४० पर्यंत प्रसिद्ध होत होते.
१८३१ मध्ये ' चाबूक ' हे वृत्तपत्र सुरू झाळे. त्याचे संपादक नौरोजी दोराबजी चंदारू उफ नौरोजी हरकारू हे होते.
एकोणिसावे शतक : समान्तर वाडत्मयोन प्रवाह : ८३
3. ७७ हू.
१८४९ मध्ये अहमदाबाद येथे 'गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटीने 'वतंमान' हें साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले. ते दर बुधवारी प्रसिद्ध होत असल्यामुळे त्याचे' लोकप्रिय नाव 'बुधवारीयुं' असे पडले. गुजरातमधून प्रसिद्ध झालेले हे पहिलेच साप्ताहिक वृत्तपत्र होय.
१८४३ साली' मुंबईत दुसरे एक नियतकालिक सुरू झाले. त्याचे नाव 'ज्ञानप्रसारक' होते आणि १८५१ मध्ये दादाभाई नौरोजींती मुंबईला ' रास्त' गोफ्तार ' नावाचे म्हणजे सत्य बोलणारे नियतकालिक सुरू केले.
ही वृत्तपत्रे व नियतकालिके तर प्रसिद्ध होऊ लागलीच; पण त्याचवेळी गुजरातच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातही नवजीवनाचा संचार होऊ लागलेला दिसून येतो. सुरतेला १८४४ मध्ये दुर्गाराम महेताजींची 'मानवधर्मे-सभा' स्थापन क्षाली. अहमदाबादला १८४८ मध्ये ' गुजरात व्हर्नाक्युलर सोसायदी'ची स्थापना झाली व मुंबईला १८५१ मध्ये ' बुद्धिवधक-सभा ' सुरू झाली'.
'बराळियो राक्षस' (वाफेचा राक्षस - रेल्वे इंजिन) गर्जना करीत देशाच्या निरनिराळ्या भागात धावू लागला व पूर्वी अंतरहित वाटणारे देशाच्या एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंतचे अंतर आता जवळ जवळ नाहीसे'च झाले.
रेल्वे हे प्रवास करण्याचे व व्यापाराचे साधन बनले, तार नि टपालाच्या सोयीमुळे व वृत्तपत्रांमुळे एवादा चमत्कार वाटावा अशा प्रकारे दूरदूरच्या देशांतील बातम्या अतिशय थोड्या वेळात लोकांना मिळू लागल्या. राजकीय अशांतता व अस्वस्थता दूर झ्षाली' आणि देशात एकदम असे जे परिवतेन झाले त्याने लोकांना अचंबाच वाटू लागला. 'गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटीतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या बुद्धिप्रकाश' ह्या नियतकालिकावर आगगाडीचे चित्र छापलेले असे व त्याखाली' लिहिलेले असे की, 'सुधारणेसाठी सज्ज व्हा-दुसरी' तिसरी काही गोष्ट बोलू नका. आगगाडीकडे म्हणजेच ह्या सुधारणेच्या प्रतीकाकडे पहा.'' कधी' कधी आगगाडी' ऐवजी पाण्याच्या नळाचे चित्र छापलेले असे व त्याखाली' लिहिलेले असे' “रक्त' साऱ्या श'रीरात फिरते. वायूचा दाब सगळीकडे असतो. जर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल तर ह्या पाण्याच्या नळाकडे पाहून खात्री करून घ्या.”
ह्याच वेळेला एकीकडे 'आर्यसमाज', ' थिऑसॉफिकळ सोसायटी" व * श्रेयसाधक अधिकारी वर्ग' अशा संस्था निघाल्या आणि त्यांचा हेतू जीवना- विषयीचा लोकांचा कल जो ऐहिक सुखाकडे जास्त जास्त होऊ लागला होता. तो ऐहिक सुखाच्या पलीकडे असलेले पारमार्थिक श्रेय साधणे जरूर आहें, असा व्हावा.
अशा ह्या निरनिराळया विचारधारांमुळे १९ व्या शतकाच्या पहिल्या अर्ध्या भागात गुजराती साहित्यात दोत निरतिराळ्या प्रकारचे प्रवाह समांतरच चाललेळे दिसून येतात. एक प्रवाह - जुन्या परंपरेप्रमाणे चालत' आलेला व' आपल्या
८४ : गुजराती साहित्याचा इतिहास
पुरातन संस्कृतीचे 'हार्द' रक्षण करणारा आणि दुसरा-परंपरागत रिवाज व अंध- श्रद्धेच्या विरुद्ध बुद्धिनिष्ठ प्रयत्नाने समाजाला सुखी करणाऱ्या पश्चिमात्य संस्कृतीला अनूसरणारा. त्यामुळे नव्या विचारधारेने प्रभावित झालेल्या काव्याबरोबरच जुन्या परंपरेला चिकटून राहणाऱ्या कवींची काव्येही लिहिली जात होती व लोकांना ती आवडतही होती. ती जुन्या प्रकारची काव्येही, नव्या काव्यापेक्षा संख्येने, जराही कभी नव्ह्ती व त्या काव्यांचा वाचकवर्गही' संख्येने खूप मोठा' होता.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातही' साहित्यातील नवा व जुना असे दोन्ही प्रवाह बरोबरच चालू होते; पण ज्ञान व वैराग्य हे परंपरागत विषय हळूहळू दूर झाले व पौरणिक कथानकांतील प्रसंगांवर काव्ये न करता जुने कवी हळूहळू गद्याकडे वळले ब पद्यात लिहिण्याचा प्रघात कमी होऊ लागला, फक्त "भक्ती? हा विषय मात्रं पूर्वीप्रमाणेच आपल्या स्थानावर स्थिर राहिला; पण त्ररपिराय, त्रिभुवन, प्रेमशंकर व सागर ह्या कवींनी' जरी मुख्यत्वे भवितविषयकच रचना केल्या तरी त्यांच्या लिहिण्याच्या पद्धतीवर आधूनिकते'चा प्रभाव पडलेला दिसून मेतो.
परंपरागत जीवनपद्धती व रीतरिवाज' ह्यांत अनेक वर्षापासून असलेल्या सामाजिक दूषणांकडे १९ व्या शतकाच्या पूर्वार्धातील गुजराती' लेखकांचे जेवढे लक्ष वेधले होते' त्यापेक्षाही १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील लेखकांचे लक्ष' त्या दुषणांकडे जास्तच वेधले गेळे आणि मध्यकालीन कवींच्या काव्यापेक्षा ह्या काळातील कवींच्या काव्याचे स्वरूप व आशय अजिबात निराळेच झाले.
पूर्वीचे मध्ययूगीन साहित्य आणि १९ व्या शतकाच्या अखेरीस लिहिले गेलेले साहित्य ह्यांत संपुर्ण कायापालट झाला. कारण तेव्हा विश्वविद्यालयीन पदवीधर आणि त्यांच्या प्रभावाखाली आलेळे लेखक हे साहित्यक्षेत्रात चमकू लागले. नवलराम, भोळानाथ, नथुराम सुंदरजी इत्यादी लेखकांवर दलळपतराम अथवा नर्मद ह्यांच्या काव्याचा जितका प्रभाव पडलेला दिसतो, तितका तो तरसिहराव दिवेटिया हे ज्यांचे अग्रणी होते, असे' युनिव्हसिटीशिक्षित लेखक व त्यांच्या प्रभावाखाली आलेले इतर लेखक ह्यांच्या लेखनावर तादृशपणे झालेला दिसत नाही. ह्या उच्चशिक्षणसंपन्न नव्या लेखकांच्या लेखनावर संस्कृत, इंग्रजी, पशियन साहित्य व लोकसाहित्य ह्यांचा विशेष प्रभाव पडलेला दिसून येतो. एवढेच' तव्हें तर त्या युनिव्हसिटीतून नवशिक्षण घेतलेल्या पदवीधर लेखकांची व त्यांच्या प्रभावाखाली आलेल्या इतर लेखकांची गद्यशैली' ही दलपत-नरसैद-युगातील लेखकांच्या गद्यशेलीपेक्षा स्पष्टपणे भिन्न अशी' दिसुत येते.
युनिव्हसिटींच्या अभ्यासक्रमात संस्कृत भाषेला स्थान व महत्त्व प्राप्त झाले १८५ साली इंडियत नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली'. स्थानिक स्वराज्याची चळवळ आणि इत'र चळवळी सुरू झाल्या आणि ह्या सर्वांचा परिणाम म्हणून की काय
एकोणिसावे शतक : सभान्तर वाडमयीन प्रवाह : ८५
देशात' सांस्कृतिक व राजकीय जागृतीचा प्रादुर्भाव झाला आणि त्याने सुशिक्षित वर्गाला पाश्चिमात्य संस्कृती व भारतीय संस्कृती ह्यांत दृष्ट व अनिष्ट काय आहे, ह्याचा मुळापासून विचार करण्यास प्रवृत्त केले.
गुजरातेत' गोवधनराम व इतर बहुतेक लेखक यांची अशी बालंबाळ खात्री' झाली होती की', भारताचा ब्रिटिशांशी आलेला संबंध म्हणजे ईश्वरी कुपेचेच फळ होय, आणि देशाच्या आत्यंतिक हितासाठी ब्रिटिश लोकांशी सहकार करणेच आवशयक आहे. त्यावेळच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीमुळे खेडेगावातील महत्त्वाकांक्षी आणि बृद्धिमात यूवकांना शहराचे आकर्षण वाटू लागले. विशेषतः: संस्थाने वगळता ब्रिटिशांच्या सत्तखाली असलेल्या प्रांतात3 तर हे शहरात' येण्याचे ग्रामीण युवकांचे प्रमाण बरेच वाढले, कारण तेथे खूप स्वातंत्र्य व मोकळीक मिळत होती. त्यांना ब्रिटिश संस्कृती व जीवनपद्धती स्वतंत्रतेंची दिशा दाखवू लागली होती. शतकानुशतके रूढ झालेली एकत्र कुटुंबपद्धती टिकणे हळूहळू अशक्य झाले. त्या पद्धतीतील नियंत्रित व संकुचित विचार सोडून सुखशांती मिळविण्यासाठी व प्रगती साधण्यासाठी नवे' विचार धैर्याने आचरणात आणले पाहिजेत. कुटुंब, जात व समाज ह्यांच्या निर्बंधातुल मुक्त होण्याची चालून आलेली संधी घालविता उपयोगी' नाही, कारण नवप्रभात उजाडली' आहे, असे' विचारवन्तांता वाटू लागले,
गुजरातेत गोवधंनरामसारख्या दीघंदृष्टीच्या विचाखंतांना वाटू व फ्टू लागले की, पॅएचिमेकडून आलेल्या वाप्याकडे पाठ न फिरवता आपल्या प्राचीन संस्कृतीतील चांगले असेल ते टिकवणे व सुधारणे, अनिष्ट गोष्टींचा त्याग करणे व पोश्चिमात्य संस्कृतीत जे योग्य व हितावह आहें ते घेऊन, सुबुद्धपणे पुर्वेच्या व॒ पश्चिमेच्या संस्कृतींचा समन्वय करण्याचा हा काळ आहे. आपण पुर्वेच्या संस्कृतीत मुरलेले आहोत'; पण त्यात असलेल्या जडप्राय, भाररूप विचारांचा व आचारांचा त्याग केला पाहिजे. पश्चिमेच्या संस्कृतीतील बुद्धिवाद, व्यक््तिस्वातंत्र्य, उदारबुद्धी समाज घडविण्यास लागणारे चातुयं आपण आत्मसात' केळे पाहिजे, इ. विचारांना अग्रस्थान मिळू लागले.
नर्मंद-दलपत' यांच्या काळातील समाजसुधारकांप्रमाणे ह्या वेळच्या समाज- सुधारकांना व विचारवन्तांनाही वाटू लागले की, आपली चुकीची लग्नसंस्थाच आपल्या सगळ्या अतिष्ठांचे मूळ आहे. नर्मंद-दळ्पतच्या काळातील समाज- सुधारकांना वाटे कौ, आपली' लग्नपद्धती सुधारावयाची' असेळ तर बालविवाहाची प्रथा बंद केली पाहिजे व अमुक वर्गातल्या विधवांना परिस्थितीप्रमाणे पुनविवाह करावयास परवानगी दिली पाहिजे; पण सन १८८५ सालानंतरच्या गोवघंतराम वगेरे विचारवंतांना वाटले की, हया प्रश्ताकडे अधिक खोलवर जाऊन पाहिले पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी विचार करून त्यावर पुढील तोडगा शोधूत काढला. त्यांच्या
८६ ! गुजराती साहित्याचा इ तिहास
मते आपल्या लग्नव्यवस्थेची वाईट स्थितो सुधारायची असल्यास मुलांची लग्ने आई- बापांनी ठरवता कामा नयेत; कारण त्यांची दृष्टी पैसा, समाजातील स्थान, कुटुंबाची खानदानी वगेरे बाबींकडेच असते व मुख्य त्या गोष्टीकडे तर त्यांचे दुलंक्षच होते आणि ती गोष्ट म्हणजे नवरा मुलगा व नवरी मुलगी ह्यांचे एकमेकांवर प्रेम आहें की' नाही ते पाहणे. ते न पाहिल्यामुळे दोघांच्यात शारीरिक, बौद्धिक अथवा भावनिक विसंवाद उत्पन्न होतो व ह्या विसंवादामुळे फक्त त्या दोघांचेच जीवन दुःखी होते असे नाही, तर त्यामुळे ते सबंध कुटुंबच दुःखी होऊन त्याला शांती व सुख मिळत ताही आणि त्याचा विकास खुंटतो. ही' व्यवस्था सुधारण्यासाठी हृया विचारवन्तांनी दोन उपाय सूचविले. एक म्हणजे प्रेमविवाहाची पद्धती रूढ करणे, मात्र त्या दोघांचे प्रेम टिकणारे, खरे व दुढ असले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मुलींना सुशिक्षित करणे म्हणजे त्या आपल्या पतीच्या बरोबरीने शारीरिक, बौद्धिक व भावनिक जबाबदाऱ्या अंगावर घेऊ शकतील.
थोडक्यात सांगावयाचे त'र असे' म्हणता येईल की, ज्याला 'पंडितयूग' म्हणून संबोधतात त्या १८८५ नंतरच्या काळाच्या साहित्यामध्ये 'प्रेम' हा जीवनाचा धुव" तारा भाहे असे मानणे व स्त्रीदाक्षिण्यावर भर देणे, ह्या दोन गोष्टी पायाभूत' आहेत असे' म्हटलें पाहिजे. फक्त गोवर्धेनराम वगेरे जूत्या मताच्या लेखकांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोण आणि रमणलाल व नरसिंहराव यांसारख्या जहाल लेखकांचा स्त्रियांकडे पाहाण्याचा दृष्टिकोण ह्यात थोडा फरक आहे, पण हा फरक अंशमात्र आहे.
तळटीपा
१, सजो रे सुधारो, तजो वात आडी, सुधाराथी थे आ जुओ आगगाडी.
'२. शारीरमां गोणित संवरे 5, वायू दबाणो सघळे फरे छ;
ए वातथी जो उपज अचंबो; जुभो जुओ आ जलयंत्र बंबो.
३. त्याकाळचा हिंदुस्थान तीन इलाख्यात विभागला गेला होता. मुंबई, मद्रास व बंगाल. ह्या प्रत्येक इलाख्यातील काही भागांवर ब्रिटिश इंडियन सरकारची प्रत्यक्ष सत्ता होती व काही भागांवर देशी राजे राज्य करीत होते. पहिल्या भागाला “ब्रिटिश इंडिया' असे म्हणत व दुसऱ्या भागाला 'देशी संस्थाने' असे नाव होते.
४, मुलगे ह्यापुर्वीच शाळा ब कॉलेजांत जाऊ लागले होते.
प्रकरण नववे
१८५० ते १८८५ चा कालखंड
[१]
नमंद-दलपत-युग
अर्वाचीन गुजराती साहित्याचे दलप्तराम व नर्मदाशंकर हे मुख्य अग्रणी होते. दोघेही आपापल्या विशिष्ट पद्धतीने त्या वेळच्या सामाजिक सुधारणांचा' पुरस्कार करीत होते. आणि त्या काळच्या साहित्यिक प्रवृत्तींसही ' त्यांनी आपापल्या परीने समृद्ध करण्यास हातभार लावला.
दलपतराम [ १८२०-१८९८]
पुर्ण नाव दलपत'राम डाह्याभाई त्रवाडी (त्रिवेदी). त्याचा जन्म काठेवाडात' (आताच्या सौराष्ट्रात) वढवाण येथे १८२० साली' झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्याते स्वामितारायण-संप्रदायाचे देवानंदस्वामी त्यांच्यापाशी 'पिंगळ' म्हणजे छंदःशास्त्र व अलंकारशास्त्र यांचा अभ्यास केला. त्याला इंग्रजीचे ज्ञात नव्हते; पण त्याला व्रज-भाषा व संस्कृत-भाषा चांगल्या अवगत होत्या, लहानपणापासूनच त्याला कविता करण्याचा नाद होता.
१८४८ मध्ये सर अलेक्झांडर किनलोच फॉंबंस्* यांना गुजरातबहल माहिती गोळा करण्यासाठी एका योग्य मनुष्याची जरूर होती. भोलानाथ साराभाई, म्हणजे प्रश्यात साहित्यिक नरसिंहराव दिवेटिया ह्यांचे वडील, ह्यांच्या शिफारशीवरून फॉर्बस्नी' दलपत'रामला ह्या कामावर, नेभले. पहिल्याच मुलाखतीत दलपतरामाच्या बुद्धिमत्तेचा व योग्यतेचा फॉर्बस्वर इतका प्रभाव पडला की, तो दलपतरामला । कधीशवर ' असे संबोधू लागला. फॉर्बस् साहेबांती दलपत'रामच्या जीवनाला एक मवीन व महत्त्वाचे वळण लावले. जेव्हा फॉबंस् इंग्लंडला गेला तेव्हा त्याने महसुली खात्यात, सादरा येथे दलपतरामची नेमणूक करून दिठी, पण 'गुजरात व्हर्नाक्यिळर
८८ : गुजराती साहित्याचा इतिहास
सोसायटी'चा नवा सेक्रेटरी कटिस, ह्याने विनंती वोेल्यावरून फॉंबेसूनी दखपतरामला १८५५ मध्ये पत्न लिहून त्या सोसायटीचा आसिस्टंट सेक्रेटरी म्हणून काम करावे' असे कळविले. आपला साहाय्यक व मित्र फॉंबेस् ह्याच्या इच्छेला भान देऊन दलपंतरामने सरकारी तोकरी' सोडली' व 'गुजरात व्हर्नाक्यूलर सोसायटी'त सेक्रेटरी म्हणून तो काम करू लागला. ह्या घटनेमुळे दलपतरामच्या जीवनाला नवेच बळण' मिळाले व त्यामुळे त्याची विनोदबृद्धी, हुणारी, सार्वजनिक संबंध जोडण्याची त्याची शक्ती यांता' त्याच्या जीवनात 'चांगळा वाब मिळाला.
ह्या सोसायटीचा असिस्टंट सेक्रेटरी म्हणून त्याने १८७८ पर्यंत काम केळे व' ह्या सोसायटीने १५ मे १८५० पासून चालविलेल्या 'बुद्धिप्रवाश' ह्या मासिकाचा संपादक म्हणून त्याने समथंपणे कामगिरी केली.
आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांत त्याला अंधत्व आले; परंतु तरीही त्याने आपले काव्यलेखनाचे काम ऐवटपर्यंत अव्याहत चालू ठेवले, १८९८ मध्ये ७८ व्या वर्षी त्याचे तिधत क्षाले, त्याला खूपच प्रसिद्धी मिळाली आणि संस्थातिक व साभान्य लोक ह्यांच्या आदरास तो सारखाच पात्र झोला, व्हिक्टोरिया राणीने त्याला 0. [. 5. (ठजणच्याला ल ता8 [ताधा ४1110) हा किताब दिला,
दलपतराभने जीवनभर मुख्यत्वे काव्येच लिहिली; पण त्याशिवाय त्याने नाटके व बोधपर निबंधह्ी लिहिले आहेत.
त्याच्या काव्यरचना 'विजयक्षमा', 'हंस काव्य शतके', 'हुन्नरखाननी चडाई', 'गमारबावनी', क्तुवर्णन', 'संप-लक्ष्मी संवाद', 'जडावस्थली', 'वेनचरित्र', 'फॉर्बस् विलास” व 'फॉ्बेस् विरह' वगैरे आहेत. त्याने त्यापिवोथ गरबी, लग्नगीते व विविध विषयांवर शकडो लहान लहान वाविता रचल्या आहेत', त्याने 'लक्ष्मीनाटक' व ' मिथ्याभिमान ' ही दोन नाटके लिहिली, त्याने * भूतनिबंध', ज्ञातिनिबंध' व 'बाळ-विवाहू-निबंध' हे तीत ग्यग्रंथ लिहिले. त्याने ब्रजभाषेत 'ज्ञानचातुरी' व “बरजचातुरी' ही दोन पुस्तके आणि 'श्रवणार्यान' हे पुस्तक हिंदी' भाषेत लिहिले आहे.
'ह्यात १८५१ मध्ये लिहिळेळे 'हुन्नरखाननी चडाई' हे एक रूपककाव्य आहे. परदेशातून आलेल्या पक्क्या मालामुळे भारताच्या कलाकारागिरी व उद्योगधंदे कसे नाश पावले, हें हयात रूपकाद्वारे दाखविळे आहे. ह्यात हुघर (उद्योग) हा एक राजा आहे. यंत्रखान (यंचसामग्री) हा त्याचा प्रधात. मावरपाट (मांजरपाट-एक प्रकारचे कापड") हा मुख्य सेंनाधिपती व चीच, इंग्लंड यांसारख्या परदेशांतून भारतात' आयात' केळेल्या असंख्य लहान मोठ्या वस्तु ह्या म्हणजे सैन्य. ह्यांच्या लढाईचे तपशीलवार वर्णेंन फार बहारीचे केले आहे. ह्या अगदी नवीनच रीतीच्या वस्तूंच्या व प्रसंगांच्या वर्णंनामुळे आणि निवेदन-पद्वतीमुळे हे काव्य त्यावेळी फारच लोकप्रिय झाले होते व त्यातील विषयामुळे ह्या काव्याने बरीच खळबळही उडवून दिली होती
१८५० ते १८८५ चा कालखंड : ८९ वेतचरित्र (१८६८) -
हे एक आख्यान आहे. मध्यकालीन आशख्यानकारांनी उपयोगात आणल्या- प्रेमाणे ह्यातही' कडव्यांचा उपयोग करून आख्यानाचे निरनिराळे भाग पाडले आहेत व त्यांच्यासारखेच छंद उपयोगात आणले आहेत. ह्या काव्याचा विषय विधवा-पुनविवाह हा आहें.
वेन नावाचा एक तरुण राजकुमार आपल्या राज्याची पाहणी' करण्याचे काम पूर्ण करून राजधानीकडे परत येत असतो. त्याला कमला नावाची एक तरुण स्त्री दिसते. ती चितेवर सती' म्हणून आपल्याला जाळून घेण्याच्या तयारीत असते. तपास केल्यावर त्याला कळते की, कमला बाळपणीच विधवा झालेली असते व तिला अशा स्थितीत कुटुंबात राहून दिवस कंठणे अगदी असह्य होते भाणि ह्या दुःखातून सुटण्याचा एकच मार्गे तिला दिसतो, तो म्हणजे सती जाऊन जीवनाचा अंत करणे. वेन तिची परोपरीने समजूत घालून तिला ह्या विचारापासून परावृत्त कतो व तो कमलाला आपल्या बरोबर राजधानीत घेऊन जातो आणि तो तिला समजावतो की पराशर ह्या प्रख्यात स्मृतिकाराने आपल्या 'पराशर-स्मृतीत”* विधवा-विवाहाला मान्यता दिलेली आहे. तिची समजत पटल्यावर तो तिच्या जातीचाच एक अनुरूप वर शोधून काढतो व त्याच्याशी तिचे लग्न लावून देतो.
ह्या काव्यात विशेष असे साहित्यिक गुण नाहीत; पण त्या काळी सामाजिक दुषणांच्या विरुद्ध मोहीम चालू होती. अशा वातावरणात हे काव्य लोकांना इतके आवडले व ते इतके यशस्वी झाले की, लोक त्याला 'सामाजिक सुधारणेचे पुराण असे' संबोधू लागले.माणभट्ट हे इतर आख्यानाप्रमाणेच हेही. आख्यान घागरिया पुराणासारखे लोकापुढे जाहीरपणे गाऊन दाखवू लागले. जरी ह्या काव्यात
काही' मूलभूत दोष आहेत, भावनांची कृत्रिमता माहे, तरी काही करुण भाव व' विनोद फार चांगले चितारलेले आहेत.
फॉर्बस् बिरह (फाँबंसूच्या मृत्यूनंतरचे शोकगीत) (१८६५) -
हे काव्य दळ्पतरामाच्या दीघं वर्णनात्मक काव्यात सर्वात उत्तम काव्य आहे. हे गुजराती भाषेतील पहिलेच शोकगीत आहे. सर ए. के. फॉर्बंस् हा दलपत'रामाचा मोठा सहायक होता व तो नसता तर दलपतरामाचा जो लौकिक झाला आणि त्याला जे उच्च स्थान प्राप्त झाले, ते झाले असते की' नाही ह्याची शंका वाटते. त्या दोघांचा सहवास झाला व त्या सहवासाचे रूपांतर त्यांच्या गाढ व्यक्तिगत मेत्रीत झाले आणि दोघांनाही एकमेकांबद्दळ आदर वाटू हागला व ते एकमेकांची कदर
करू लागले. ४४ व्या वर्षी झालेला फॉर्बंसचा मृत्यू हा दलू्पतरामच्या दृष्टीने एक कठोर वजा घात'च होता.
९० : गुजराती साहित्याचा इतिहास
'फॉबेस् विरहा!त फॉबेसूच्या उच्च गुणांबद्दल केलेलीं प्रशंसा आहे. फॉर्बसूने दळूपतरामबद्दल जे काही केळे व दलपत्तरामला फॉर्बसूची विती किंमत वाटत होती त्याबद्दल ह्या काव्यात त्याने आपली विशेष क्रृतज्ञता व्यक्त केली आहे. फॉर्बसूच्या मृत्यूचे दलपतरामची फार मोठी व्यक्तिगत हानी झाली व आयुष्यात कधीही' भरून न येणारी पोकळी निर्माण झाली. ह्याची कल्पना ह्या काव्यावरून दिसुन येते. दलपतरामाच्या काव्याचे खास लक्षण शब्दांची कसरत, ती ह्याही काव्यात असली
त'री' काही ठिकाणी ही कविता बरीच चांगली वठली आहे.
अल्ला ह्या दीघंकाव्याव्यतिरिक्त दलपत'रामाने' गरबी, पदे, भुक्तके (चटकदार दोन अथवा चार पंक््तींची' अथेग्भ रचना) व छप्पे ह्यांसारख्या शेकडो स्फुट कविता लिहिल्या आहेत. ह्या कवितांत कवीने निरनिराळ्या प्रकारच्या देशी व जुन्या छंदांचा उपयोग केला आहे. 'दलपतराम'ने पिंगळचे छंद:शास्त्र, रस व अलंकार- शास्त्रांचा सखोळ अभ्यास केला होता. त्याने जवळ जवळ सर्वच छंद आपल्या कवितांत उपयोगात आणले आहेत'. त्याला शब्दही अगदी सहज' स्फुरत' असत', ह्या सर्वं ज्ञानामुळे दलपतरामाच्या कवितांचे बाह्य स्वरूप अगदी निर्दोष झाळे आहे.
विषयर्वविध्याच्या बाबतीतही दलपंतरामाची सुसंपन्नता दिसून येते. त्यात' विविध स्थळांच्या व प्रदशतांच्या वर्णतापासून आणि साभाजिक सुधारणांच्या वर्णनापासून ते निरनिराळया संस्थांच्या इतिहासापर्यंतचा समावेश झालेला आहे.
त्याची मूळची बुद्धिमत्ता, संस्कृत व ब्रजभाषांचे ज्ञान, मध्यकालीन गुज'राती साहित्य व॑ लोकसाहित्य ह्यांचा त्याला असलेला चांगला परिचय, देशभर केलेला विपुळू प्रवास व जगाचा सखोल अनुभव ह्यांमुळे दळपतरामाचे लेखत आशयघन व विविध विषयांनी परिपूर्ण आहे. त्या काळचा एकही सामाजिक, राजकीय मथधा इतर बाबींसंबंधी-विषय त्याच्या लेखणीतून सुटला नाही. भाषांवरचे प्रभुत्व व कवित्व करण्याचा सतत अभ्यास ह्यांमुळे त्याची काव्ये सुंदर झाली आहेत भाणि त्यात सहजतेचा व स्वस्थतेचा गुण आलेला आहे. दिलेल्या कोणत्याही विषयावर शीधाकवित्व करणे, हा त्याच्या हातचा मळ होता. त्याच्याहून थोडा लहान पण त्याचा समकालीत प्रतिस्पर्धी तमेद ह्याची बरोबरी करण्यासाठी त्याने देशभक्ती, निसर्गसौंदर्य ह्या विषयांवरही काव्ये केली आहेत. खरे पाहिले तर हे. दोत विषय त्या वेळी तवे होते व ह्या विषयांवर नमंदने प्रभावीपणे लेखन केले होते; पण त्यातही आपण मागे नाही, हें दाखविण्यासाठी दलपत'रामने ह्या दोनही विषयावर आपली लेखणी चालवली.
एकंदरीत पाहता दलपतरामच्या काव्यात छंद, बाह्यस्वरूप द विषय ह्यांची विविधता आढळूत येते. अनुप्रास, अन्तिम अनुभ्रास, यमक, एलेष व इतर काव्यालंकार ह्यांचा उपयोग हे दलपतरामाचे वैशिष्ट्य आहे. त्याची दुसरी विशेषता म्हणजे
१८५० ते १८८५ चा कालखंड: ९१
उपदेश. त्याची बहुतेक सर्वे काव्ये बोधप'र-उपदेशपर-आहेत. त्याची दृढ मान्यता होती की, कविता मनोरंजक तर असावीच; पण त्याचबरोबर ती उपदेणपरही असली पाहिजे व म्हणून त्याने आपल्या काव्यात काही ठिकाणी प्रत्यक्ष उपदेश केला आहें किंवा काही ठिकाणी प्रसंग, उदाहरणे, कोणाच्या जीवनात घडलेल्या मजेदार घटना व वक्रोक्ति ह्यांचा उपयोग करून अप्रत्यक्ष उपदेश केला आहें. त्याच्या अडपलो जीवो', 'माखीनुं बच्चू, ' गंडू राजा ', ' भोळो कणबी ', 'शरणाईवाळो', ' भोळो भाभो' 'तमेली डोशी', 'ऊँट कहे' इ. कविता अशा ह्या दुसऱ्या प्रकारच्या आहेत.
अत्यंत साधी शब्दरचत्ता आणि सरळ व साधी वणंनपद्धती हें दळप्तरामाच्या काव्याचे खास विशेष गुण आहेत. त्यात काहीही गूढ व दुर्बोध असे नाही आणि त्यापासून जनमानसाला अभिजात मनोरंजताची' प्राप्ती होत होती. दलपतरामला साभाजिक जबाबदारीची पहिल्या प्रतीची जाणीव असल्यामुळे त्याचे लक्ष सतत आपल्या धोत्यांकडे व वाचकांकडे असे आणि त्यामुळे त्यांच्या आवडीला वाईट वळण लागेल असे काहीही अश्लील अथवा हलके असे' त्याच्या लेखणीतुन कधीही काहीही लिहिले गेले ताही. त्याची अशी मान्यता होती की, कोणतेही काव्य असे असावे' की जे एखादा वृद्ध पिता व त्याची तरुण मुल्गी हे दोघे बरोबरच ते काव्य नि:संकोचपणे वाचू शकतील.
त्याच्या बुद्धीला काही मर्यादा पडल्यामुळे महान् कवीच्या प्रतिभेला सहज- साध्य अशा अत्युच्च शिखरापर्यंत जरी त्याची कविता पोहोचली नाही तरीपण त्यात व्यावहारिक शहाणपण व बुद्धिमत्ता भरपूर प्रमाणात आहे. जगाच्या व्यवहाराचे शांतपणे व निष्पक्षपातीपणाने निरीक्षण करून जी जी घटना घडेल त्या त्या प्रत्येकी- पासून काहीतरी बोध शोधून काढणे, हें त्याचे ध्येय होते.
दलपंतराम हा काव्याचा खरा भक्त होता. १८४५ साली. त्याते आपली पहिली कविता ' बापानी पीपर ' लिहिली. तेव्हापासूत ते १८९८ मध्ये त्याचे निघत होईपर्यंत जवळ जवळ ५५ वर्षे त्याचे काव्यलेखन अखंडपणे सतत चालू होते. त्याचे साहित्य मध्यकालीन व अर्वाचीन गुजराती' काव्यांना जोडणारा एक दुबाच होता.
दलपतरामने लिहिलेले ' गुजराती पिंगळ ' म्हणजे गुजरातीचे छंदःशास्त्र. हे पाठयपुस्तक त्या काळी इतके गाजले होते की, त्यालाच “दलपत पिंगळ' या नावात लोक ओळखू लागले. मराठीतील 'वृत्तदर्पणा'शी हे समकालीन व समधर्मे आहें
नमंव [१८३३ ते १८८६]
नर्मदाशंकर लालपांकर दवे - हे 'तमंद' ह्या लोकप्रिय नावाने प्रसिद्ध झाले आहेत. ते दलपंतरामपेक्षा १३ वर्षांनी वयाने लहान होते. दलपतरामती भारतात
९२ : गुजराती साहित्याचा हतिहास
उगवणाऱ्या नव्या युगाचे स्वागत वेळे; पण नर्मंद ह्याला खऱ्या अर्थाने नव्या युगाचा 'अरुण' म्हणणे उचित ठरेल. कारण विषय, प्रकार, शेली, भावना इत्यादी साहित्याच्या अनेक बाबतीत नर्मंदनेच अर्वाचीन साहित्य-युगाचा आरंभ केला.
नमंद'चा जन्म सुरत येथे १८२३३ मध्ये झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण सुरत येथे झाले व माध्यमिक शिक्षण मुंबईच्या 'एल्फिस्टन इन्स्टिटयूट'* (स्थापना १८२७) मध्ये झाले. त्याची पत्नी वयात आल्यामुळे त्याला मुंबईतील शिक्षण सोडून सुरतेला यावे' लागले व त्याच्या श्वशूरांच्या सांगण्यावरून त्याने एका शाळेत. शिक्षकाचा सामान्य पेशा स्वीकारला; पण त्याची पत्नी लवकरच वारल्यामुळे तो मुंबईला परत' गेला व त्याने पुन्हा शिक्षण सुरू केले. त्याबरोबरच तो सामाजिक सुधारणेच्या चळवळीत भाग घेऊ लागला. त्या वेळी मुंबई हे सामाजिक सुधारणेचे केंद्र बनले होते. बुद्धिवधंक-सभेच्या (१८५१) संस्थापकांपैकी तो एक होता व॑' तेथे त्याने आपले पहिले लिहिलेले भाषण “* मंडळी मळवाथी थतां लाभ विशे ' (समूहात भेटण्याने होणारे फायदे) हे वाचून दाखविले.
' अशा रीतीने समाजसुधारणेचे साधन म्हणून त्याच्या साहित्यिक जीवनाची सुरुवात झाली. कॉलेजमध्ये अभ्यास करीत असताना त्यांला एकदम धी'रोच्या एका 'काफी'ची' नक्कल करण्याची स्फूर्ती झाली व ती' रचत. असताना त्याला इतका अवर्णनीय आनंद आला की, लेखन हाच आपला मुख्य व्यवसाय असावा, असे त्याने ठरविले. 'एक मूठभ'र ज्वारी काय, कशीही मिळेल' असे म्हणून त्याने आपले मन साहित्याकडेच एकाग्न केले. ह्याच वेळी' त्याला कॉलेज सोडून मुंबईच्या एका शाळेत शिक्षकाची नोकरी करावी लागली; पण थोड्याच दिवसात शाळेतील अशांत, अप्रिय वातावरणाचा त्याळा वीट आला. त्याने पुर्णपणे जाणले की, आपण जर ह्याच वातावरणात राहिलो तर साहित्य-निमितीला आवशयक असा उत्साह व' मानसिक शांती आपल्याला मुळीच मिळणार नाही. म्हणून त्याने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि घरी येऊन अशरुपूरण॑ डोळ्यांनी आपल्या लेखणीकडे पाहून तो तिला उद्देशून म्हणाळा, “ आजपासूत भी. सर्वेस्वी तुलाच शरण आलो आहे. ”४ आपल्या 'ह्या निश्चयाला चिकटून राहण्यासाठी नमंदला अनेक अडचणींना तोंड' द्यावे लागले ब अनेक संकटांशी झगडावे' लागले. ह्या रीतीने २४ वर्षे धडपड करून त्याला शेवटी माघार ध्यावी लागली.
नमंद हा ह्या परिवर्तनशील युगाचा प्रतिनिधी होता. त्यांचे अध्ययन फार सखोल किवा पद्धतशीर नव्हते व त्याची निर्णयशक्ती बऱ्याच प्रसंगी त्याच्या लहरी- नुसार बदलत असे; पण काहीतरी नवे' व सर्वांपेक्षा काहीतरी निराळे करून दाखविण्याच्या बाबतीतच त्याला अमर्याद उत्साह होता. हया उत्साहामुळे त्या काळच्या इतर अनेक युवकांप्रमाणे तर्मेद पाश्चिमात्य संस्कृतीकडे आक्रष्ट झाला व
१८५० ते १८८५ चा कालखंड : ९३
त्याप्रमाणे आपल्या संस्कृतीला वळण देण्याची त्याने जणू शपथच' घेतली; त्याचे नैतिकबळ व आपल्या मतासाठी धैर्याने झगडण्याची त्याची शक्ती हघामुळे त्याने हया कार्यासाठी खूप परिश्रम केले; पण अनेक वेळा निराशा पदरी आल्याने आणि त्याचे प्रयत्न फसल्याने' त्याची खात्री झाली की, मनुष्याला कितीही शक्ती असली तरी शेवटी तो अज्ञात व गूढ अशा नियतीच्या हातातील एक खेळणे आहें आणि त्याला पटले की कोणत्याही देशाची परिस्थिती व परंपरा बदलायची झाल्यास त्यासाठी अतिशय चिकाटीने व संपूर्ण तयारीने योग्य समय येण्याची वाट पोहिली' पाहिजे. नमेदची व्यक्तिगत लोकप्रियता! लक्षणीय होती; पण त्याची विशेष पर्वा न करता त्याने आपल्या मित्रांना व॒ अनुयायांना स्पष्टपणे समज दिली, “ बंधूनो, मागे परत' फिरा. आपण एक महान् चूक करत होतो” आणि त्याप्रमाणे तो स्वतः रूढीचे दृढ केलेल्या हिंदूंच्या जीवनमार्गाकडे वळला. ही वैचारिक माघार त्याच्या काव्यात मात्र प्रतिबिबित झालेली दिसून येत नाही
नमंदला इंग्रजी साहित्यात जे जे काही आकर्षेक वाटले ते ते सव गुजराती साहित्यात आणण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला.' त्याने निसर्ग, देशभक्ती. शौय व प्रेम इ. विषयांवर भावनोत्कट कविता लिहिल्या. 'बीरसिह' ह्या नावाचे महाकाव्य लिहिण्याचा त्याने प्रयत्न केला. इंग्लिशमध्ये 31811: ४०156 नियंमक कविता विषयाला अनुरूप अशी भव्यता व जोर आणण्यास समर्थ आहें आणि तशा प्रकारचे एकही वृत्त गुजरातीत नाही कौ, जे त्याच्या विषयाची भव्यता योग्य रीतीने प्रगट करू शकेल. म्हणून त्याने रूढ असलेल्या एका वृत्तात थोडासा फेरफार करून एक नवे वृत्त बनवले व त्याला 'वीरवृत्त' असे नाव दिले. तसेच त्याते 'रोला' नावाचे एक वृत्तही लिहिले.
गद्याच्या निरनिराळ्या क्षेत्रातही तो आद्यप्रवर्तेक होता. नमंदच्या पुर्वी गुजराती' गद्यसाहित्य लिहिलेच गेळे नाही असे' नाही. भुनी जिनविजयजींनी म्हटल्याप्रमाणे चांगल्या प्रतीचे गद्य १४ व्या, १५ व्या व १६ व्या शतकांत खूप लिहिले गेले होते.* १७ व्या व १८ व्या शतकांतही आपणास गद्याचे काही नमूने आढळतात. नमंदच्या जन्मापूर्वी छापखाने सुरू झाले होते व गुजराती' पुस्तके आणि वृत्तपत्र छापली जाऊन बाहेर पडत होती; $ पण नर्मद हा अर्वाचीन गद्यलेखकात पहिला गद्यलेखक होता. कारण त्यात्ते गद्य हे विचारविनिमय किवा माहिती पुरविण्याचे साधन आहे असे न मानता, ते सुंदर, आनंद देणारे, ललित माध्यम बनविले.
नमेदने गद्यात निबंध, चरित्रे, विपुल आत्मचरित्रपर टिपणे, * इतिहास," संवाद व नाटके,** पत्रे, संपादकोये*१२ व साहित्य-समीक्षा वगेरे लिहिली आहेत" तसे'च गद्यामध्ये त्याने धर्माची मूलतत्त्वे,१2 छंद:शास्त्र, "४ अलंकारणास्त्र१* व
९४ : गुजराती साहित्याचा इतिहात
काव्यशास्त्र" इ. विषयांची चर्चा केली आहे. त्याने ९ वर्षे परिश्रम करून एकट्याने गुजराती भाषेचा शब्दकोण*७ बनवला. तसेच त्याने एकट्याने पौराणिक कथांचा एक कोश बनवला.१€ नर्मद हा अर्वाचीन गद्य व पद्य साहित्याचा जनक समजला जातो, कारण अर्वाचीन गद्य व पद्याची?* बहुतेक सव॑ लक्षणे पहिल्यानेच आपल्याला नर्मदच्या गद्य ब पद्य लेखनात विपुल प्रमाणात पाहावयास मिळतात.
'नमंगद्य', 'नर्भकविता' 'नमंकोश” 'राज्यरंग!, 'मारी' हकीकत" व 'धर्भविचार' हें तमंदचे मुख्य ग्रंथ आहेत'. नरमंदच्या सर्व कविता 'नर्मंकविता' व सर्वे गद्यलेखन 'नर्मंग्य' ह्यात' संग्रहित केलेले आहे.
कॉलेजमध्ये शिकत असतानाच नर्भदने काव्यलिर्मिति हे. आपले मुख्य जीवनध्येय मानले होते 'व पुणे निए्चय करून लेखतावरच आपला उदरनिर्वाह करावयाचा हेंही त्याने ठरवले होते; पण १८६५-६६ मध्ये त्याने आपला "राज्यरंग' (जगाचा इतिहास) ग्रंथ लिहिण्यास सुमवात केली तेव्हा त्याला इतिहासाचे सखोल व विस्तृत अध्ययन करावे' लागले, तेव्हा त्याच्या पूर्वीच्या विचारात भोठी क्रान्ती घडून आली. त्याने आपल्या पुर्वीच्या कल्पना व विचार हांचे विचारपुर्वक अवलोकन केले आणि तसे करताना त्याने आपल्या पूर्वीच्या कित्येक कल्पता व विचार त्याज्य ठरवून सोडून दिले. ह्यामुळे त्याच्यात कविता लिहिण्याचाही उत्साहू व मतीपा राहिली' नाही. म्हणूनच त्याच्या बहुतेक सवे कविता १८५५ ते. १८६५-६६ सालापर्यंतच लिहिल्या गेल्या आहेत; पण त्यानंतरच्या जवळ जवळ २० वर्षांत म्हणजे त्याने आपल्या वेचारिक भूमिकेत बदल केल्यापासून त्याचे कवितालेखत जवळ जवळ संपुष्टातच आले.
तथापि नर्मदचा एकंदर कवितासंभार विपुल आहे. दलपतरामशी स्पर्धा करण्यासाठी त्याने जो विषय हाती येईल त्यावर वाविता लिहिण्याचा सपाटा चालविला. कवितांच्या गुणवत्तेपेक्षा त्यांच्या संख्याबाहुल्याकडे त्याने अधिक लक्ष होते तरी पहिल्यापासून काव्याचे हार्द समजून घेण्याचा त्याचा प्रयत्न असे' व प्रथमपासूनच काव्यातील अलंकारवैभव आणि वृत्तरचनेतील नेपुण्यापेक्षा रसाला प्राधान्य देत असे. चांगली कविता व वाईट कविता ह्यांतील फरक त्याच्या 'चटकन् ध्यानात येत असे. म्हणून कवितेचे स्वरूप व कविता लिहिण्याची कळा ह्यांत तो अनभिज्ञ होता असे म्हणता येणार नाही; पण कवितेच्या स्फूर्तीबद्दलची २" त्याची चुकीची कल्पत्ता, त्याचा स्वतःविषयीचा फोजील अभिमान** व थोड्याशा विकृत मानसिक वृत्तींमुळे त्याच्या कवित्वशक््तीची फारच मोठी हानी झाली होती, ह्यात' काही शंका नाही', 'कारण आपल्याला असे' दिसून येते की, त्यांची सर्वात उत्तम कवितासुद्धा फार उच्च कोटीची वाढत नाही.
१८५० ते १८८५ चा कालखंड: ९५
नर्मदने ज्ञान, भक्ती व वैराग्य ह्या विषयांवर मध्यकालीत कवींच्या पद्धतीप्रमाणे शेकडो फुटकळ पदे केली आहेत. त्याने दीघ वर्णनात्मक काव्ये *गोपीगीत' व 'रक्मिणीहरण' एकाच पद्धतीने लिहिली आहेत.
पण नमंद विशेष चमकतो तो आपल्या अर्वाचीन शैलीच्या कवितांमध्येच, प्रेमाने व रास्त अभिमानाते गुजरातची अस्मिता ठळकपणे अंकित करणारा पहिला कवी तर तो आहेच. त्याचे उदाहरण म्हणजे त्याची “जय जय गरबी गुजरात ही कविता व गुजरातविषयी दुसऱ्या काही कविता. एवढेंच नाही तर तो गुजरातचा पहिला भावनोत्कट ऊ्मिशील कवीही आहे. त्याने आपल्या मनातील ऊर्मी, भावना, विचार व आंतरिक संघर्ष आपल्या कवितांत नि:संकोचपणे आणि निर्भीडपणे चितित केले आहेत. त्याच्या कवितांत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटलेला आपणास स्पष्ट दिसतो. ह्याच शऐेळीत न्मंदने सामाजिक सुधारणा, स्वातंत्र्य, निसर्ग, प्रेम, वगैरे विषयांवर कविता केल्या आहेत. त्याने तीत दीघं काव्ये लिहिळी आहेंत, ती अशी' - 'वीरसिह', 'रुदनरसिक' व 'हिंदुओनी पडती'. ह्यांतील 'बीरसिह' व 'रुदनरसिक' अपुर्णच राहिली आहेत. 'हिंदुओोनी पडती' हे काव्य नमंदने धावत्या ओोळींच्या एकाच “*रोला' नावाच्या छंदात लिहिले आहे. ते १५०० ओळींचे आहे. नमंदने स्वतः त्या कवितेचे वर्णन समाजसुधारकांचे बायबल' असे केले आहे. हें रूपकात्मक महाकाव्य आहें. ह्या काव्यात अशी कथा आहे-सुधारादित्य नावाचा राजा (सुधारणा) वहेम यवनाशी (अंधश्रद्धा) लढाई करतो. नमेंद हा त्याचा सरसेनापती असतो. धर्म व इतिहास ह्यांच्या अभ्यासाने एकत्र केलेले सवे ज्ञातकण नमंदने ह्या काव्यात उपयोगात आणले आहेत. भारत वैभवाच्या शिखरावर भेसलेल्या काळापासून घसरत' घसरत येत त्याची कशी अधोगती झाली, त्याचे अगदी स्पष्ट वर्णन केलेले आहें. ह्या अधोगतींचे कारण रूढींचे अवास्तव प्राबल्य, अंधश्रद्धा, अदूरदृष्टी, जातीयता व सामाजिक विषमता हे होय. त्याने केलेले वीररस व करुणरसाचे चित्रण मनावर प्रभाव पाडणारे आहे आणि काव्याचा शेवट मात्र आशाबादाते झाला आहें. हो कविता काहीजणांच्या मते दलपतरामाच्या * वेतचरित्रा'पेक्षा काव्यगुणात श्रेष्ठ आहे.
ह्या संदर्भात ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की, तर्मदने वर्णन केलेला भारत हा फक्त हिंदूचा भारत देश आहे. म्हणून हिंदूंचे वेभव म्हणजेच भारताचे वैभव अशी त्याची निष्ठा आहे आणि हिंदूंच्या स्वभावातील दोष व सामाजिक आथिक विषमता ह्याचमुळे भारताचा ऱ्हास व अधोगती क्षाळी, असे तो ठामपणे मानतो.
नमंदने गुजराती' गद्यलेखनात घातलेली भर त्याने पद्यात घातलेल्या भरीपेक्षा अधिक मोलाची आहे. गद्यात त्याचे विविध विषयांवर लेखन आहे. 'नमंगद्य' हा त्याच्या निबंधांचा व लेखांचा संग्रह आहे. 'राज्यरंग'. ह्या सर्वे जगातील मुख्य
९६ : गुजराती साहित्याचा इतिहास
देश व संस्कृती हयांच्या उन्नतती ब अधोगतीचा इतिहास आहे. 'मारी' हकीकत' (माझ्या विषयीची सत्य हकीकत) व 'उत्तर नर्मद'चरित्र' ह्यांत आपल्या जीवनातील अनेक घटत्तांचे सविस्तर वणंन त्याने केळे आहे. ह्यात त्यांचे वडील लाभशंकर ह्यांचे आळेखिलेले चित्र फारच सुंदर आहे. 'धर्मविचार' हयात नर्मदच्या वैचारिव' परिवतैतानंतर'च्या लेखांचा संग्रह आहे. हया सवे पुस्तकांतील गद्य फारच सुंदर रीतीने लिहिलेले आहे आणि ते अजसुद्धा वाचताना आनंद होईल, असे आहे.
वलपतराम व तमंद
दळपत'राम व नर्मंद हे आपल्या सामाजिक सुधारणांच्या युगातील दोन महत्त्वाचे कवी' आहेत. युयुत्सू वीराच्या आवेशाने नर्मदने आपली सामाजिक सुधारणेची चळवळ सुरू केली हे त्याचे युद्धपीत आहे. “ मारू किंवा मरू असा निश्चय करून समरांगणात उडी घ्या-पुढे तुम्हाला विजय मिळेळ.”११ दलपत'रामने आपल्या वाचकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. तो म्हणतो- “ बंधूनो, लोकांना हळूहळू सुधारणा करायला शिकवा, जर तुम्ही एक सबंध लाडू उचलून मुंग्यांच्या समूहावर टाकाल तर त्या चिरडल्या जाऊन मरून जातील; पण जर तो फोडून त्याचा चुरा करून त्यांच्यापुढे पसरा तर त्या आनंदाने तो खातील.”*3 * हेघावरूत ह्या दोघांच्या स्वभावातील फरक दिसून येतो. नर्मद सुधारणांच्या बाबतीत अधीर, उतावळा होता. दलपत'राम धीरोदात्त ब शान्त होता. आवेश व उत्साह ह्या नमंदच्या प्रेरणा तर स्वस्थपणाने विचारपुर्वक सर्वे बावतींचा विचार करूस पुढे जाणे ही' दलपतरामची' वृत्ती. भावतांचा आविष्कार हा नमेदच्या काव्याचा विशेष, त'र दलपतरामाच्या काव्यातून व्यावहारिक विचार व कलाकौदाल्य दुग्योचर होतात शिवाय दलू्पतमध्ये एक भोठी गोष्ट होती, जिचा नर्मदमध्ये भभाव होता, ती म्हणजे विनोदबुद्धी, दलळपतराम आपल्या स्वतःच्या चुवांबद्दढ अथंवा मूखंपणाबद्दल स्वत:लाच' हसणारा होता. हे आपल्याला त्याच्या जीवनातीळ एका प्रसंगावरून दिसून येते. त्याने एकदा शेअरबाजारात पृष्कळ पैसा घातला ब १८६५ मध्ये शेअरमाकेट पडले व त्याचा पैसा बुडाला. तेव्हा त्याते आपल्या मूर्खेपणाबद्दल आपलीच थट्टा केली. शब्दावर एलेष करून त्याने म्हटले आहे : *। शेर-सिंह व शेर-गुंतवलेला पैसा- शिकारी 'शेर' ची शिकार करायला गेला पण पारडे उलटेच फिरले व शेरानेच शिकार्याला मारून टाकले” * 4५
१८५० ते १८८५ चा कालखंड : ९७
विनोद, उपहास व परिहासयुक्त अशा कविता दलपतने जितक्या लिहिल्या तितक्या गुजरातच्या दुसर्या कोणत्याही कवीने लिहिल्या नाहीत.
नमंद उत्साही व स्वप्से पाहुणारा होता तर दलपतराम व्यवहारी बुद्धीचा व विचारवन्त होता; पण दोघेही 'नव्या युगाच्या प्रभात' चे स्वागत करणारे होते. दोघानाही हें पूर्णपणे पटले होते की, जग पुर्वपिक्षा खूपच बदलले आहें व झपाट्याने एकसारखे बदलतच चालले आहे. जर आपल्या देशाला ह्या सर्वांशी टक्कर देऊन टिकून राहायचे असेल तर आपल्यालाही आवश्यक ते बदल केलेच पाहिजेत ब जगाशी सामंजस्य साधले पाहिजे. माणसाने देश, समाज व आपल्या स्वत:बहलचे क्तव्य काय आहे, त्याचा पुर्ण विचार करून योग्य ते बदल केळे पाहिजेत, असे' दोघांनीही प्रतिपादन केळे. बालविवाह, शारीरिक दृष्टीने विषमता असलेल्या वुधूवरांची लग्ने, म्हातारपणी जीणे झालेल्या पुरुषांची लग्ने, मृत्यूनंतर काही दिवस देण्यात येणाऱ्या जेवणावळी वगैरे सामाजिक अपप्रवृत्ती व रीतरिवाजांचा दोघांनीही सारखाच धिक्कार केला. दोघांनीही वाचकांच्या मनावर पुढील गोष्टी जोरदारपणे बिंबविण्याचा प्रयत्न केला. “वेमतस्य, आळस, परनिदा ह्यांचा त्याग करा. भुतेखेत, चेटकिणी, जारण-मारणादि क्रिया ह्यांसारख्या अंधश्रद्धा सोडून द्या.” दोघांनी' व्यापार व उद्योगधंदे ह्यांचे महत्त्व काय आहें ते सांगितले. दोघांनी जवळ जवळ एक- सारख्याच विषयावर लिहिले व त्याबद्दल दोघांचीही मतते जवळ जवळ एकसारखीच होती. फक्त त्यात एक मोठा फरक होता. तो म्हणजे नमंदची मते जास्त जहाल होती व ती तो प्रखरपणे प्रगट करी; पण दलपतरामाचे विचार जास्त व्यवहारी होते व दलळपतरामाची भव्य शब्दसंपत्ती, विचार प्रगट करण्याची संस्कारी' पली, छंदांची पूर्णता वगेरे गोष्टींचा तर्भदमध्ये अभाव दिसून येतो.
दळूपतरामने सुद्धा ग्यलेखन केले आहे; पण गद्यकछेखनात नर्मदचा वाटा फार मोठा आहे. नर्मेद व दलपत ह्यांची तुलना करण्याचे बरेच प्रयत्न झाले आहित', अशा एका प्रयत्तात नवलरामने नर्मदळा दलफ्तरामपेक्षा महान व अधिक सरस कवी ठरविले होते; पण काही वर्षांनी त्याने आपले मत बदलले व॒झसे' प्रतिपादन केले की, दोघेही सारखेच अलौकिक होते. १९३३ साली जेव्हा नमंदची पहिली जन्मणताब्दी गुजरातममध्ये अनेक ठिकाणी साजरी करण्यात आली तेव्हा नर्मेदचा साहजिकच जास्त उदो उदो करण्यात आला. विश्वनाथ भट्टला नमंदचे लहातसे चरित्र लिहिण्याचे काम सोपविले होते. त्याशिवाय त्याला नर्मदच्या गद्यलेखांचा एक संग्रह व पद्यांचा एक संग्रह, चांगळ चांगले उतारे पसंत करून प्रकाशित करण्याचे काम देण्यात आलें होते. ते त्याने उत्तम रीतीने पार पाडले, त्याचे लेखन म्हणजे एखाद्या निष्ठावान प्रशंसकाने आपल्या दैवताची केळेली प्रशंसा
गु.सा.इ....७
९८ ; गुजराती साहित्याचा इतिहास
होती. व ज्या प्रशंसा विशिष्ट प्रसंगाला उद्देशून विशवनाथभट्टला ही कामगिरी सोपविण्यात आली होती. त्या दृष्टीने त्याने ज्या प्रकारे लिहिले ते योग्यच होते; पण त्यामुळे अजाणतेपणे अथवा बितहेतुपुरःसर का होईना, ज्या लोकांती नर्मंद व दलपतच्या लेखनाचे बरोबर वाचन केले नव्हते ते लोक दलपतरामला योग्य न्याय न देता नमंदपेक्षा कमी लेखू लागले.
आणखी थोड्या वर्षांनी उच्चभ्रू पंडित श्री. जे, ए. संजाता ह्यांनी ह्या अवास्तव स्तुतीला कंटाळूत नर्मद व दलफ्त ह्या दोघांच्या ग्रंथांचा व काव्यांचा अभ्यास केला आणि म्हटले, 'मी दलप्तरामची एक कवी व' एक मतुष्य म्हणून फार स्तुती केली, कारण माझे असे ठाम मत आहे की, त्या स्तुतींला तो पात्रच आहे व मला मनापासून असे वाटठे की' गुजरातने (आपलेच नुकसान करून) गुजरातच्या ह्या कवीएवरावर अन्याय केला आहें. व त्याचा काही अप'राध नसताना त्याला उच्च स्थानापासून (सिहासनावरून) दूर केला आहे. ह्या जगातील खऱ्या राजपुत्रांना सिहासनावरून कायमचे दूर करता येईल अथवा त्यांना कायमचे त्यांच्या स्थानाला मुकावे लागेल; पण ह्या कवीएवराला तुम्हाला कायमचे त्याच्या उच्च स्थातावरून दूर करता येणार नाही. तो आज' ना उद्या आपले उच्च स्थान प्रापत केल्याशिवाग्र राहणार नाही. कारण समय हा त्याचा साहायक आहे व तो कल्पातत्तापर्यंत वाट पाहू एकेल. आज नाही तर आणखी २० वर्षांनी अथवा आणखी ५० वर्षांनी दलपत पुन्हा आपले स्थान प्राप्त करील. गेल्या सहाशे वर्षांतीक श्रेष्ठ गुजराती कवींची गादी करू गेल्यास पहिल्या ६ नंबरात दलपतचा नक्की समावेश' होईल. इतकेच नव्हे, तर त्या यादीत तो फारच मानाचे व उच्च स्थान प्राप्त करील, '**
संजानाच्या ह्या मताशी आपण णब्दशः सहमत' झालो नाही त'री' आपल्याला असे. कबूल करावे' लागेल की, काही. आपल्याला अज्ञात अशा कारणांनी दलप्तरामाची प्रमाणाबाहेर उपेक्षा करण्यात आली व' नर्मदची' अवास्तव अशी' फार स्तुती करण्यात आली.
झोळाताथ साराभाई
प्राथंना समाजाच्या स्थापकांपैकी एक (१८२३-१८८६) 'ईशएव'रप्नार्थनामाला' ह्या काव्यासाठी प्रसिद्ध आहे. ह्या भक्ताच्या ईश्वराबद्दलच्या भकक््तिभावनेचे एक निराळेच रूप आढळते. मध्यकालीन भक्त आपल्या व्यक्तिगत देवाची पुजा, उपासना वगैरे करून ईश्वराला याचना करीत असे. आपल्यावर देवाची कुपा व्हावी' ब आपल्या सांसारिक अडचणी दुर व्हाव्यात, असा वैयक्तिक दृष्टिकोण त्यांच्या भक्तीत असे'.
१८५० ते. १८८५ चा कालखंड : ९९
“प्राथना समाज' व कलकत्त्याचा ब्राह्मो समाज” ह्यांची तत्त्वे एकच आहेंत, फक्त फरक एवढाच कौ सुदुवातीला जातिभेदाचे समूळ उच्चाटन करणे ह्या गोष्टी'चा अंतर्भाव प्राथंता समाजाने आपल्या पंथात केला नव्हता. बाकी दोघांनाही ईश्वराचे निराकार रूप मान्य होते. मध्यकालीन भक्त-कवी ईऱवराच्या साकार रूपाला मानीत असत बाकी ईश्वर सर्वेक्ञ, सर्वशक्तिमान व सरवंत्र असणारा असा आहे, ह्या बाबतीत ब्राह्मो समाज', 'प्रार्थता समाज” व मध्यकालीन कवी! ह्यांचे एकमत' होते; पण एक मोठा फरक हा आहे की, मध्यकालीन भक्त-कवी अनेंक देवांना भजत असत; पण 'प्राथंना समाजा'चे अनुयायी असे मातत की देव फक्त एकच आहे. तोच एक जगाचा उत्पत्तिकर्ता, नियंता व संहारकर्ता आहें. त्याने' तिर्माण केलेल्या अनेक वस्तूयेक्षा तो निराळा आहे व त्या एकाशिवाय दुसरा कोणीही' ईश्वर नाही.
“प्राथना समाजा'च्या सभासदांची' (प्रा ्थनासमाजी ) मध्यकाळींन भक््ताप्रमाणे प्राथ॑नेवर श्रद्धा होती; पण त्यांचा पुजेच्या कोणत्याही बाह्य उपचारावर विश्वास नव्हता. तसेंच सांसारिक गोष्टींसाठी ईशवराची' प्राथेना करणे हे त्यांना मान्य नव्हते. ते ईश्वराकडे - एखादे बालक आपल्या मातापित्यांकडे ज्या भावनेने जाते- तसे' जातात (प्रेमी किवा प्रेमिकेप्रमाणे नाही) व त्याला अनव्यभावे' शरण जाऊन प्राथंता करतात-
असतो मा सत् गमय तमसो मा ज्योतिर्गमय भृत्योर्मा अमृतं गमय' ॥
*“ मला असत्यातून सत्याकडे ने. अंधारातून प्रकाशाकडे ने व मृत्यूपासून अमृताकडे (शाश्वत सत्य) घेऊन जा. मला सदाचरणाचे पालन करण्याची शक्ती दे”. एकाच शुद्ध पवित्र देवावर (शक्तीवर) श्रद्धा ठेवूत आपले व्यक्तिगत औऑचरण सात्त्विक व निःस्वार्थी असावे, हें त्यांच्या भक्तीचे मर्म होते. ह्या प्रकारच्या भक्तीमुळे ईश्वरही प्रसन्न होतो आणि तो भक्ताच्या आत्म्याला इहलोकी व प'रलोकीही साहाय्य करतो, अशी' त्यांची मान्यता होती.
भोळानाथची ईशव रप्नार्थंतामाला' ह्याच प्रकारच्या भक्तीचा मुद्रालेख आहे. ह्याचे दोन मोठे ग्रंथ आहेत व त्यात ३० अंक आहेंत. त्यातील २८ भोळानाथने लिहिले व त्याच्या मृत्यूनंतर शेवटचे दोन अंक त्याचा मुलगा नरसिंहराव ह्याने पूर्ण केळे, एक एक अंक महिन्याच्या प्रत्येक दिवशी वाचला जावा, असा हेतू होता.
'इइवरभार्थतामाले'च्या एकेका भागात थोडी थोडी पदे आहेत. ती चांगली सुस्वर गाण्यासारखी आहेत. गद्यात एक एक प्रार्थना आहे. ती त्या वेळच्या
१०० : गुंजराती साहित्याचा इतिहास
कोणत्याही' छेखकाच्या गद्याशी बरोबरी करू शकेल अशी आहे. सर्वात ऐवटी आरती आहें. आरती अभंग व दिंडी वृत्तात आहे. मुंबईच्या 'भरार्थना समाजा'च्या आरतीवरून हया आरतीची रचता सुचली असादी.
'फर्दर माईलस्टोन्स इन गुजराती लिटरेचर' ह्यात स्व. कृष्णलाल मो. झवेरी हे सारांशरूपाने लिहितात, “प्रत्येक गद्य-प्रार्थना नग्न, भक्तियुक््त 'माषेने तटलेली' आहे. अत्यंत नम्रतेने व भावनापुर्ण शब्दांनी' ईश्वराला विनंती केली आहे. आपले दोष व' अपुणंता विसरून ग'रीव व निःसीम उपासकाला शवती' द्यावी, अशी' मागणी' केली आहे. चांगली प्रेरणा लाभून ईश्वरी आज्ञा व मार्गदर्शनापासून आपण ढळू नये अशी' विनंती केलेली आहें. 'सदाचार बल दे', ईश्वराची भक्ती, त्याची दैवी दया, मानवाची क्षृद्रता व त्याची' दुर्बलता ह. त्याच्या प्राथंतेचे विषय आहेत'.”
भक्ती हा भोलानाथाच्या कवितेचा स्थायिभाव आहे.
त्याते ईश्वराची उपासना केली; ण त्याच्या उपासनेच्या काव्यात' नरासिह, मी'रा किवा दयारामासारखी प्रखरता किंवा भावनोत्कटता नाही; पण भोलाताथाचे अंत:करण हे खऱ्या भक्ताचे अंत:करण आहें व कोणत्याही' मध्यकालीन भक्त'कवबी'च्या कवितेत दिसून येते तशीच शुद्ध सन्निष्ठा त्याच्या कवितेत दिसून येते. त्याचे सम- कालीन नर्मद व दलपत ह्यांच्या भक्तिकाव्यापेक्षा भोलाताथाचे विचार व शब्द ह्यात जास्त सुसंस्कृतता उठावाने दिसून येते.
भोलानाथाची संबंध ' ईएवरप्रार्थनामाला ' हिन्दीत अनुवादित झाली आहे. त्याच्या काही कवितांचे तर बंगालीत'ही भाषांतर क्षाले आहे.
समहिपतराम रूपराम नीलकंठ [ १८२९-१८९१ ]
महिपत'राम *रूपराम नीलकंठ ह्याचा जन्म सुरत येथे झाला. तो समाजसुधा- 'रक व' शिक्षणखात्यात सरकारी' अधिकारी होता. त्याने एक सामाजिक कादंबरी ' सासू-बहुनी' हडाई' (सासु-सुनेचे भांडण) व दोन ऐतिहासिक कादंबऱ्या ' वनराज चावडो ' व ' सुधारा जेसंग ' (सिद्धराज जयसिंह) ह्या लिहिल्या आहेत. त्याशिवाय त्याने करसनदास भूळजी व त्यांची पत्ती पार्वती कुंवर ह्यांची जीवन- चरित्रे व ' इंग्लेंडती मुसाफरीनुं वर्णन ' ( इंग्लंडच्या प्रवासाचे वर्णन) हे प्रवासवर्णन लिहिले. हे गुजराती भाषेतील पहिलेच प्रवासवर्णन आहें. त्यात त्याने ब्रिटि लोकांचे' जीवन व त्यांचा समाज 'ह्यांचे वर्णत केळे आहे. महिपतरामने 'भवाईसंग्रह' नावाच्या पुस्तकात भवाईचा संग्रहही प्रसिद्ध केला आहे. |
ह्यांपैकी 'सासू-बहूनी लडाई' (१८६६) ही गुजरातीतील पहिलो' सामाजिक कादंबरी आहें. इतकेच नव्हे तर ती गुजराती भाषेतील पहिठीच कादंबरी आहे,
१८५० ते १८८५ क्षा कालखंड: १०१
2
कारण ती ' करण घेलो' ह्या कादंबरीच्याही पुर्वी लिहिली आहे; परंतु । करणघेलो ” त्यात जरी काही दोष आहेत तरी ती त्या काळाचे जास्त चांगले प्रतिनिधित्व करणारी असल्याने तिलाच गुजराती भाषेतील पहिली' कादंबरी मानण्यात येते.
* सासू-बहुनी लडाई ' मध्ये गुजरातमधील मध्यमवर्गीय कुटूंबाचे गृहजीवन विनोदी भाषेत चितारले आहे. त्यात आपल्याला दुष्ट सासूची अरेरावी व जुलूम त्यामुळे साऱ्या कुटुंबातील झालेले दु:खी वातावरण ह्यांचे स्पष्ट चित्र दिसुन येते. ह्या कादंबरीत तत्कालीन समाजाची स्थिती व लेखकाचा सुधारक दृष्टि-बिदु प्रतिबिबित झालेला दिसतो; पण त्याची शब्दसंपत्ती तोकडी आहें व विचार व्यक््त' करण्याची पद्धतही अगदी' सामान्य असल्यामुळे ती' कमी' दर्जाची झाली आहे. साहित्याच्या दृष्टीने त्यात चांगले गुण आढळत नाहीत; पण त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीचा एक पुरावा म्हणूनच फक्त ह्या पुस्तकाला महत्त्व आहे. ह्यात लेखकाने प्रत्यक्ष घडलेल्या काही प्रसंगांचे वर्णन केलेले असल्यामुळे त्यात आपल्याला त्या वेळच्या समाजाचे प्रतिबिंब आरशाप्रमाणे स्पष्ट दिसते.
* वनराज चावडो ' आणि ' सुधारा जेसिंग ! ह्या दोन कादंबऱ्यात साहित्यिक गुण' फारसे' नाहीत.
महिपतराम हा जरी फार मोठा लेखक नसला तरी साहित्याचे तीन प्रकारचे लेखन करण्यात तो अग्रणी आहे. त्याने पहिली सामाजिक कादंबरी ' सासू-बहूनी' लडाई! (१८६६) ही लिहिली, पहिले प्रवासवर्णन ' इंग्छेंडनी मुसाफरीनुं वर्णत ' लिहिले (१८६२) व तिसरे म्हणजे सविस्तर चरित्र ' उत्तम कपोळ करसनदास मूळजी ' (१८७८) लिहिले.
करसनदास मूळजी [१८३२-१८७१ ]
करसनदासचा जन्म मुंबईत झाला. तो एक मोठा समाजसुधारक म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. त्याने मोठ्या हिरिरीने ' महाराज लायबल केस ' लढवली.
नभेदचा सुरतच्या 'वेष्णव संप्रदाया'च्या मुख्य अधिपती महाराज जदुनाथ-ह्यांच्याशी वाद झाला. करसनदासने आपल्या 'सत्यप्रकाश' ह्या वृत्तपत्रात त्याविषयी लिहिले व जदुनाथ महाराजांवर खूप' टीका केली. महाराजांनी करसतदासवर अब्ूनुकसानींची फिर्याद दाखल केली, त्याने महाराज जदुनाथ सारख्या एका श्रीमान्, तशिलेबाज व एका संप्रदायाच्या मुख्यावर जे आरोप केले होते ते सर्व खरे ठरले व करसनदासने ही केस जिंकली. ९
करसनदास पत्रकारही होता व लेखकही' होता. त्याने जवळ जवळ १५ पुस्तके लिहिली. त्या सर्वात 'इंग्लेंडमां प्रवास' हें पुस्तक उत्तम आहे. त्यातीळ
१०२ ! गुजराती साहित्याचा इतिहास
माहितीमुळे व लेखकाच्या लिहिण्याच्या कौशल्यपूर्ण पद्चतीमुळे ते फार गाजले. त्याचे मराठीतही भाषांतर झाले आहे.
नंद्शकर [ १८३५-१९०५ ]
नंदग्रांकर तुळजाशंकर महेता ह्याचा जन्म सुरतेला झाला. शिक्षणाधिकारी मिस्टर रसेल ह्यांच्या हाताखाली तो काम करत' होता. त्यांच्या प्रोत्साहनाने नंदर्णकरने १८६६ मध्ये 'करण घेलो' ही कादंबरी लिहिली. ती' गुजरातीतील पहिली ऐतिहासिक कादंबरो अथवा तिला पहिली अद्भुत कादंबरी म्हणता येईल. गुजरात'चा शेवटचा हिंदू राजा करण वाघेला ह्याच्या पराभवाच्या प्रसंगावर ही कादंबरी आधारलेली आहें. त्याच्या विचित्र स्वभावाभुळे त्यांचे नाव वाघेलो (वंशाचे नाव) ऐबजी घेलो (बेडा) असे' पडले. करण वाघेलोने आपला मंत्री माधव ह्याची पत्ती स्वप्नसुंदरी हिचे अपहरण केले. ह्या जुलमाने अतिगाय क्रोध येऊन माधवने दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिळजी ह्याला गुजरातमध्ये येऊन गुजरात जिंकून घेण्यास आमंत्रण दिले. अल्लाउद्दीनने गुजरातवर चढाई केळी; पण दुसरा कोणताही हिंदू राजा करण घेलोच्या साहाय्यासाठी धावून आला नाही. शेवटी करण घेलोचा पराभव होतो. तो दक्षिणेकडच्या एका लहानशा संस्थानात बागलाण येथे पळून जाऊन आश्रय घेतो. तेथील किल्ल्यात तो आपले उवंरित आयुष्य घाळवितो जाणि मानहानी व निराशेत त्याचा तेथेच अंत होतो.
ही पहिलीच ऐतिहासिक कादंबरी असल्यामूळे तीत बऱ्याच उणिवा राहिल्या आहेत. ह्या कादंबरीच्या कथावस्तृत व पात्रातही खास उल्लेखनीय असे काही नाही आणि ह्यात आपल्याला करण वाघेलोच्या वेळच्या गुजरातचे दर्शन त' घडता लेखकाच्या वेळच्या गुजरातचे व विशेषकरून सुरतचेच दर्शन घडते.
नंद्शंकरच्या वेळी सुरत हे सामाजिक सुधारणेच्या चळवळीने गाजत होते व त्यामुळे लेखकाने ह्या पुस्तकात बऱ्याच ठिकाणी आपले स्वत''चे प्रगत विचार प्रगट बोळे आहेत'. तसेच त्याने त्यात आपले नैतिकता, नीतिशास्त्र, धर्म, देशभक्ती ह्यां विषयीचे व त्याच्या समकाळीन वाचकांच्या आवडीचे इतर विषय 'ह्या विषयींचे आपे विचार प्रगट केळे आहेत.
ह्या पुस्तकाचे दोन मुख्य गुण म्हणजे हुबहुब वर्णन व उत्तम दली. जेव्हा जेंव्हा एखाद्या स्थळाचे स्वरूप व प्रसंग ह्यांचे वर्णन येते ते अतिशय उच्च कोटींचे असते.
त्या वेळी करण घेलो' ह्या कादंबरीचे नाव इतके गाजले कौ त्यापासून स्फूर्ती येऊन त्याच धर्तीवर महिपतरामने 'वनराज चावडो' व 'सुधोरा जेसिंग' आणि अनंत प्रसाद त्रिकमलाल वेष्णव ह्यांनी 'राणकदेवी” हया ऐतिहासिक कादंबः्या लिहिन्पा. करण घेलो'चे मराठीतही भाषांतर झाले आहे.
१८५० ते १८८५ चा कालखंड : १०३
नवलराम पंड्या [ १८३६ ते १८८८ ]
नवलराम' लक्ष्मीशंकर पंड्याचा जन्मही सुरतेलाच झाला. कुटुंबाच्या वाईट आथिक परिस्थितीमुळे त्याला शाळा सोडून सुरतेच्या एका शाळेत' शिक्षकाची' नोकरी पत्करावी' लागली; पण परिश्रम, चिकाटी, भनोबल व आत्मविश्वास हृया गुणांच्या जोरावर त्यांची पहिल्याने सुरतेच्या 'टीचर्से ट्रेनिंग कॉलेज'च्या प्रिन्सिपॉलच्या जागेवर नेमणूक झाली. नंतर त्याची' अहमदाबादला व शेवटी' राजकोटला प्रिन्सिपॉल म्हणून नेमणूक झाली आणि त्याचे आपल्या वयाच्या ५२ व्या वर्षी राजकोट येथ निधन झाले.
नवळरामाला उच्च शिक्षणाचा लाभ झाला नव्ह्ता तरी' तो आपल्या चिकाटी, बुद्धिमत्ता व प्रामाणिकपणा ह्या गुणांमुळे एक प्रस्यात साहित्य-समीक्षक, कवी, नाटककार व परिपक्व विचारक म्हणून शिक्षणक्षेत्र आणि सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात तो 'चांगळाच गाजला.
नर्मंद त्याचा निकटचा स्नेही होता. त्याच्याशी व दलपत'रामशी' तुलता करता नवलरामचे लेखत विपुल नव्हते; पण एकंदरीत त्याच्या ठेखताची' गुणवत्ता ह्या दोघांपेक्षा अधिक दर्जाची आहें.
नवलराम बरीच वर्षे 'गुजरात णालापत्रा'चा संपादक होता. ह्या शालापत्रात' मुख्यत: शिक्षणविषयक लेख असत'. महान कवी काली'दासाच्या मेघदूताचे' गुजरातीत भाषांतर करणारा तो पहिला ळेखक होय.
ह्याशिवाय नवळरामचे ग्रंथ पुढे दिल्याप्रमाणे आहेत- 'भटनूं-भोपाळूं', “बी'रमती”, 'बाळ-लग्न-बत्रिशी', इंग्रजी छोकोनो संक्षिप्त इतिहास' आणि 'नवळ ग्रंथावली”.
“झटनुं भोपाळुं' व 'वीरमती' ही दोन नाटके आहेत. 'भटनं भोपाळ हे नाटक फोल्डिंग ह्या' इंगिलश लेखकाने केलेल्या 702 2709 ॥.वबळ य ९ 7००८६ 1००07 ) हंघा भोलिअरच्या फरेंच नाटकाच्या ( (7 अट्वालाह हवयॉषट्रा०-॥) अनुवादाचे गुजराती रूपान्तर आहे. ह्यात नवळरामने युरोपातील सामाजिक राहणी, रीतरिवाज वगैरे बदलून त्याऐवजी गुजराती राहणी', रीतरिवाज' हांचे चित्र रंगविले आहे. मूळच्या पुस्तकातील हास्यरस' व सॉंदर्यस्थळे फारच उत्तम 'रौतीने नवळरामने हयात आणली' आहेंत.
* वीरमती ' ह्या नाटकात' माळव्याचा राजपुत्र जगदेव परमार ह्यांचे फार सुंदर वणंन केळे आहें. ह्याचे कथानक काही अंशी इतिहासावरून व' काही अंशी दंतकथांवरून घेतले आहे. ए. के. फॉर्बैसूच्या रासमालेतुन हे कथानक घेतले आहे. दुदैवाच्या तडाख्यांनी जगदेवची जी' दुदेशा झाली तिचे वर्णन करणारी काही भाषणे व' गाणी' फार सुंदर आहेत; पण एकंदरीत हे नाटक सामान्य प्रतीचेच आहे.
१०४ : गुजराती साहित्याचा इतिहास
* बाळ लग्न बत्रिशी' ब 'बाळगरबावली' ' ही गावितांची पुस्तथे, आहेत. नवलरामने थोड्याच कविता लिहिल्या आहेत. प्रण त्यातील काही नरगंद व दलपतराम'च्या कवितांपेक्षा वरच्या दर्जाच्या आहेत; ' बाळ लग्न बत्रिशी ' त ३२ कविता आहेत. ह्यामध्ये कवीने उपहास', कटाक्ष, विनोद वगैरेंचा उपयोग करून बालविवाह पद्धतीवर प्रहार केले आहेत. लहान वयाच्या नवरदेवाबरोबर येणार्या वऱ्हाडी लोकांचे वर्णेन करताना त्यांची जनावराच्या समूहाशी तुलना केली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या दर्जाप्रमाणे त्याची त्या त्या दर्जाच्या श्रेष्ठ व हलक्या प्राण्याशी त्याची तुलना केली आहे.९७ ही कटाक्ष करण्याची पद्धत फार अभिनव आहे. * बाळगरबावलीत ' तरुण अनिवाहित मुलींसाठी रचलेल्या सुंदर गरबींचा संग्रह केलेला आहे.
* गुजरातनो प्रवास ' ह्या कवितेत ' रमीयरे गुजराते ' ( गुजरात मध्ये फिरूया चला ) हें पाठूपद वापरून केलेळे वणंन सुंदर आहे. ह्यात गुजरातमधील सुरत, अहमदाबाद वगेरे शहरातील लोकांची वृत्ती, राहणी, विचारसरणी वगेरेंचे सुक्ष्म दृष्टीने वर्णन केळे आहे. तेव त्यातील विनोद फार सुंदर आहेत'. ' इतिहासनी' आरसी ' (इतिहासाचा आरसा) ह्या त्याच्या ' गरबी'ची सुरुवात. अशी आहें. “मी इतिहासाचा आरसा समोर धरून त्यात' पाहिले. त्यात' ग्राश्वत व स्थिर असे मला काहीच दिसले नाही. मला फक्त पळणाऱ्या सावल्याच दिसल्या. ”"< ह्या कवितेची' शऐेली' व शब्दसंफ्तती उल्लेखनीय आहे.
त्याची “ इंग्रज राज्य करतात ब ह्या देशाचे लोक दबून राहतात.”*" ही कविता-गांधीजींनी आपल्या आत्मचरित्रात लिहिल्याप्रमाणे-गांधीजी शाळेत शिकत' होते तेव्हा-तरुण व प्रौढ ह्यांना एकसारखी'च प्रिय होती."
* नबल ग्रंथावली"चे चार खंड आहेत. हा तवलरागच्या गद्यललेखांचा व कवितांचा संग्रह आहे. त्यापैकी ' कवि-जीवन' - नर्मदचे चरित्र-पहिला खंड त्याच्या शैली व अभ्यासाबद्दळ उल्लेखनीय आहे.
नवलराम हा गुजरातीतील श्रेष्ठ साहित्य-समीक्षकांपैकी एक आहे. तोच पहिला असा समीक्षक आहें को, ज्याने आपल्या लेख व टीपा ह्यांमध्ये साहित्याच्या आंत'र व बाह्य रूप -आकार, प्रकार व आशय ह्चांबद्द चर्चा केली आहे. त्याने साहित्यातील सर्वे पैलूंचा विचार केळा आहे. शब्द, शब्दकोश, छंद, व्युत्पत्ती, लिपी' हचा बाह्य अंगांपायून ते रस, कल्पनाणक्ती, मनाचे तरंग व पलेष आदी आंत'र अंगांविषयीही त्याने चर्चा केली आहे. त्याशिवाय त्याने सबंध देशाची एकच भाषा व एकच लिपी असावी? व गुजरातीत शब्दांच्या जोडणीत' (9981118) समानता असावी, असे जोरदारपणे प्रतिपादन केले. वास्तेववाद व आदर्शवाद, कवींचे शब्दभांडार, ऐतिहासिक कादंबऱ्यात कल्पनांचा भाग किती असावा आणि
१८५० ते १८८५ चा कालखंड : १०५
संगीत व कविता ह्यांचा परस्पर संबंध ह्या सर्वे विषयांवर त्याने चर्चा केली आहे. शिक्षणाचे माध्यम मातृभाषाच असले पाहिज असे त्यत्चे म्हणणे होते व त्यासाठी' त्याने ह्या कार्यात प्रत्यक्ष उडी घेतली. नरसिंहराव हयांनी म्हटले भाहे, “ नवलराम हा नुसता विद्वान् असून सामान्प प्रतीचा साहित्य-समीक्षक होता असे नव्हे तर त्याला अतिशय दुरदृष्टी होती, ती दूरवरच्या भविष्याचासुद्धा वेध घेऊ हकत होती. आज आपल्यापुढे ज्या महत्त्वाच्या समस्या उभ्या आहेत त्या स्पष्टपणें पाहणारा व त्यावर चर्चा करणारा नवलराम हा सर्वांत पहिला समीक्षक होता.”
एखाद्या विशिष्ट ग्रंथाची समीक्षा करताना तवलराम स्वस्थ चित्ताने, सहानृभूतिपूणे पण सडेतोड व निर्भयपणे त्याचे मूल्यांकन करीत असे. “ चांगल्या ग्रंथाची स्तुती करणे व वाईट ग्रंथाचा धिक्कार करणे, हे जगातील प्रत्येक समीक्षकाचे कतंव्य आहे. ”74* असे' तो म्हणत असे व त्याप्रमाणे त्याने संनिष्ठापुवक आपले समीक्षाकार्य केले. केव्हा मनुष्याच्या अंग्री असलेल्या दुर्बलतेमुळे त्याच्या हातून क्वचित् प्रसंगी पक्षपात झाला असेल; पण बहुतेक सवेच प्रसंगी त्याने निष्पक्षपाती- पणाने समीक्षा केलेली आहे.
समीक्षा करताना नवलराम नेहमी अगदी जागृत व तत्पर असे. आपली मते चुकीची वाटली तर जरूर असेल त्या वेळी त्याने विचारपुर्वेक ती बदललेली आहेत. न्मंदच्या बाबतीत त्याने ह्याप्रमाणे केलेले आहे. जेव्हा तो तरुण होता व' त्याला अशी महत्त्वाकांक्षा होती कौ, असा समीक्षक म्हणून आपली गणना झाली पाहिजे, ज्याला गुजरातेत नव्याने उदयास येणाऱ्या कवितांचे अस्तित्व व त्यांतील सौंदर्याची प्रथमच जाणीव झालो आहे. त्या वेळी त्याने नर्मंदबद्दल असे म्हटले की? नमेद हा अशा प्रकारचा कवी आहे. की असा कवी गुज'रातेत ह्यापूर्वी कधी' झोला नाही व पुढे कधी होणार नाही; पण पुढे काही' वर्षांनी जेव्हा त्याची मते जास्त परिपक्व झाली तेव्हा त्याने असे म्हटले, नर्मद हा त्या वेळच्या दोन मुख्य कवींपैकी3 3 एक आहे आणि आता भविष्यकाळच नक्की करील की त्यांपैकी कोणता कवी आपल्या स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून पुढे गेला आहे.
रणछोडभाई उदयराम [१८३७-१९२३]
रणछोडभाईचा जन्म नडियादजवळ महुधा येथे झाला. त्यांनी गुजराती नाट्यसाहित्यात फार मोलाची भर घातली. त्यांनी सामाजिक व पौराणिक मिळून १४ नाटके लिहिली. त्यातील ' हरिश्चंद्र ', 'जयाकुमारी विजय', ललितादुःखदर्शक', 'नलूदभयन्ती' 'तारामती स्वयंवर', 'प्रेमराय अने चारुमती' ही उल्लेखनीय आहेत.
ह्यांपैकी 'हरिश्चंद्र हे मूळ तामीळ भाषेतील नाटकाचे इंग्रजीत केलेल्या भाषांतराचे गुजराती रूपांतर आहे. गांधीजी झाळेत शिकत असताना ह्याच
१०६ : गुजराती साहित्याचा इतिहास
नाटकाचा फार त्यांच्या मनावर खोल परिणाग झाला होता. 'जयावुमारी विजय' १८६२ मध्ये प्रसिद्ध झाले. ते त्यांचे स्वतःच रचलेले स्वतंत्र नाटक आहे. त्याची नायिका जयाकुमारी ही एक सुशिक्षित मुलगी आहे. ती एका अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेली आहे व नायक प्राणलाल हा सुसंस्कारी आणि श्रीमंत कुटुंबात
जन्मलेला युवक आहे. जयाकुमारीच्या सद्गुणांनी आकर्षित होऊन तो तिच्याशी लग्न करण्याचे ठरवतो. त्याच्या मार्गात खूप' मोठी विघ्ने येतात ती पार करूत तो शेंबटी आपल्या कामात' यशस्वी होतो. ह्या नाटकात जरी फारशी कलात्मकता नाही तरी रंगभूमीवर ते फार यशस्वी ठरले व त्यानंतर झालेल्या अनेक नाटकांचा ते नाटक आदर्दोरूप ठरले. 'ललिता दुःखदर्शक' हे एक दुःखपयंवत्तायी ताटक आहे. समाजातील रूढ प्रणालिकांच्या भाराखाली व्यक्ती कशी चेंगरून जाते, हे ह्यात दाखविले आहे. ळलिता ही' ह्या नाटकाची नायिका आहे. ललितेचे आई-बाप तिचे लग्न नंदनकुमार नावाच्या वराशी ठरवितात. त्यांनी त्याचे खानदानी कुळच फक्त लक्षात घेतलेले असते. नंदनकुमार हा एक उधळा, नीच, व्यसनाधीन व'बाहेंरख्याली' मनुष्य असतो आणि आपल्या रखेलीचा गुलाम असतो. त्याची आई व बहिणी' ह्यांना आपल्या कुटुंबाच्या मोठेपणाचा फार अभिमान असतो आणि त्यामुळे त्या नंदकुमार- पेक्षाही ललिताचा असह्य छळ करतात. तिला अत्यंत दारुण दिव्यातून जावे लागते. नंदनचा खून होतो व ललिता घर सोडून जाते; पण तरी तिला सुरक्षितता ब शांती न मिळता मृत्यू येईपयंत झगडत राहावे लागते. ह्या नाटकाच्या कथानकाची रचना सुव्यवस्थित नाही; प'ण त्या वेळी ह्या नाटकाते फारच खळबळ उडवून दिली' होती' व त्याचा गुज'रातच्या सामाजिक जीवनावर फार प्रभाव पडला होता आणि खोल परिणाम फझ्ताळा होता. असे' म्हणतात की ललिते'ची दुदेशा पाहून कित्येक आई- बापांनी' आपल्या मुलींची ठरलेली लग्ने मोडली' व कित्येक वर्षे तंदन ह्या नावांचा उपयोग मूखं व व्यभिचारी व्यक्तीसाठी गुजराती कादंबऱ्यांचे वाचक करीत असत.
भवाई'च्या ओबडधोबडप'णाचा व बीभत्सपणाचा तिरस्कार वाटून रणछोड- भाईनी शिष्ट व सुसंस्कृत' नाटके लिहून ते रंगभूमीव'र आणू लागले. त्यांच्या दृष्टीने नाटव' म्हणजे तुसते प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे असे नसून नाटक हें प्रेक्षकांची मनोवृत्ती व दृष्टी सुधारून त्यांना चांगले जीवन कसे जगावे, हें शिकवण्याचे एक साधन होते. ह्या मुद्दयावर त्यांनी कोणाणीही' केव्हाही तडजोड केली' नाही.
रणछोड'भाईनी' ' विक्रमोवैशीयम्, 'मालविकाग्तिमित्र ' व “रत्नावली ' ह्या संस्कृत नाटकांचे व' चाल्सं लँब ने' लिहिलेल्या 2७5 ॥'०॥८ ४६८४७८७” ह्या इंग्लिश पुस्तकाचे गुजराती'त भाषांत'र केले आहे.
त्यांनी ' नाठ्यप्रकाश' व 'रणपिंगल ' हे ग्रंथही लिहिळे,' नाट्यप्रकाश' ' ह्या
१८५० ते १८८५ चा कालखंड ; १०७
ग्रंथात नाटयशास्त्राचे सिद्धांत वणिळे आहेत. व रणपिंगल हा छंद:झ्ास्त्रावरील ग्रंथ आहें. त्यात मराठीतून घेतलेले ' अभंग ' ' दिडी ' व ' ओवी ' ह्यांचेही सविस्तर वणेंन आहें. * रर्णपिंगल ' हा ग्रंथ तपशीलवार व सविस्तरपणे लिहिलेला असा छंदःणास्त्रावरचा पहिलाच ग्रंथ आहे.
भगवानलाल इंद्रजी [| १८३९-१८८८ ]
पंडित भगवानलाल इंद्रजी ह्यांचा जन्म जुनागढ येथे झाला. त्यांना शिक्षण जवळ जवळ मुळीच मिळाले नव्हते; पण त्यांनी स्वतःच परिश्रमाने लक्षपुर्वक एतिहासिक संशोधन व शिलालेखांचा अभ्यास केला. त्यांनी ह्या क्षेत्रात इतकी बहुमोल व महत्त्वाची कामगिरी केली आहे की १८८४ मध्ये लंडन युनिव्हसिटीते त्यांना ' डॉक्टर ऑफ लिटरेचर ' ही पदवी बहाल केली आणि हेंगच्या ' रॉयल इंस्टिट्यूटने' त्यांना विदेशातील आपला सदस्य म्हणून नेमले.
गिरनार पवंताच्या पायथ्याशी असलेळा अशोक शिलालेख पुर्णपणे वाचून भगवानलाल इंद्रजीनी त्याचा संपुणे अर्थ विशद केला व॒ जेम्स प्रिन्सेप ह्या पहिल्या . विद्वाताने केलेल अशोक शिलालखासंवंधीचे गैरसमज व चुका दुरुस्त केल्या.
भगवानलाल इंद्रजीला उपलब्ध असलेल्या पुराव्यावरून इतिहासाची बरोबर भांडणी करण्याची फार तीब्र बुद्धी होती. फक्त नाणेशास्त्राचा उपयोग करून क्षत्रप राजवंशाचा अनुक्रम लावण्याचे जवळ जवळ अशक्य असे' कार्य भगवानलालनी' करून दाखविले. खारवेळ शिलालेखाचा अथे लावून त्यांनी केलेली निदाने ही अगदी खरी आहेत व आजपर्यंत कोणताही इतिहाससंशोधक त्याळा अमान्य करू शकलेला नाही' किवा त्याच्यांत जरा सुद्धा बदल करू शकलेला नाही.
प्रोफेसर बळवंतराय ठाकोर म्हणतात, '“ दुसर्या अनेक क्षेत्रात ज्याप्रमाणे आपल्या गुजरात-काठेवाडच्या भूमीने अनेक रत्ने पैदा केली आहेत, त्याप्रमाणे इतिहाससंशोधनाच्या क्षेत्राही ह्या भूमीने आपल्याला एक असे तररत्त बहाल केळे आहे की, जे जगातील नामांकित व निवडक विद्वान इतिहाससंशोधकांच्या पंकतीमध्ये आपल्या तेजाने जास्त उठून दिसेल. ते नररत्न म्हणजे पंडित भगवानलाल इंद्रजी होय. ४" ।* ॥॥८ टयावाण्ट्यट टा टात कर वगव ०पवळ, 202 प्राय ढा, 00८यचा 27 याव प्रश भोग्य 2149” ह्या ग्रंथाचा कर्ता प्रो. ई. जे. रॅपसत हा आपल्या प्रस्तावनेच्या शेवटी म्हणतो, हे माजे आभार प्रदर्शन श्री. पंडित भगवातलाल इंद्रजी ह्यानी भाझ्यावर केलेल्या उपकारांचा शौरवपुर्ण उल्लेख केल्याशिवाय पुण होणार नाही. मी भारतीय नाणेशास्त्राचा एक विद्यार्थी आहे व पंडित भगवानलाळ इंद्रजी ह्या महान भारतीय विद्वाताच्या कार्यामुळे माझ्यावर फार उपकार झाले आहेत. भगवानलालजींच्या कार्याचे स्मारक
१०८ : गुजराती साहित्याचा इतिहास
म्हणून ह्या म्युझियममध्ये जे शील्ड ठेवण्यात आळे आहे त्यागध्ये भगवानलालच्या वैभवशाली कार्याचा गौरव केलेला आहेच. ह्या ग्रंथाचा वरवर अभ्यास करणाऱ्यालाही स्पष्टपणे सभजून येईल की, भगवानलालती घातलेल्या पायावरच माझ्या संशोधनाची इमारत बहुतांशी उभी आहे.”3"
जयकृष्ण इंद्रजी [ १८४९-१९२९ ]
हा भगवानळालचा मित्र व शिष्य होता. त्यालाही विशेपसे' शालेय दिक्षण मिळाले नव्हते; पण त्याने एक श्रे वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणून नाव कमावले आहे. त्याचे 'वनस्पतिशास्त्र' हे. पुस्तक तज्ज्ञांकडून गौरवात्वित झाळेले आहे. त्यांची 'बरोडानी वनस्पति" व 'कच्छनी वनस्पति ही पुस्तके आजसुद्धा संदर्भ-अंथ म्हणून फार मौल्यवान मानर्ल! जातात. ऐतिहासिक संशोधताच्या बाबतीत' भगवातनलालला जसे' भानाचे स्थान प्राप्त झाळे तसेच मानाचे स्थात जयकृष्ण इंद्रजीला वतस्पतिशास्त्रात प्राप्त झाले.
जहांगीर आदसर तल्यारवान [१९२३-१९४६]
हे बडोदा सरकारचे' पोलौस कमिशनर होते. आपल्या ' मुरा व कुलीन ' ह्या कांदबरीबद्दळ ते विशेष प्रसिद्ध आहेत (१८८४). त्या काळी लिहिलेल्या दुसऱ्या असेक कादंबऱ्यांप्रमाणे ह्या कादंबरीवर कर्ल मेडोज टेलरच्या कादंबऱ्यांचा प्रभाव पडलेला आढळतो. ' मुद्रा अने फुलीन ' ह्यात नायक कुलीनसिंह् व नायिका मुद्रा अतेंक संकट-प'रंपरांतृत्त गेल्यानंतर शेवटी शक्तिशाली भ्रिटिश सिंहाने दिलेल्या संरक्षण व मदतीने सुखी होतात असे दाखविले आहे. कथानकातील मुख्य गोष्टींचा हैदरअल्लीचा उदय व! त्याने व त्याचा पुत्र टिगु सुळतान हयांनी केलेला जुलूम ह्या गोष्टींशी संबंध जोडला आहे. ही' कादंबरी व ' रत्नलक्ष्मी' (१८८१) ही कादंबरी ह्या चांगल्या लिहिल्या आहेत'. पात्रांचे रेखाचित्र स्पष्टपणे रेखाटलेले असून, हयांत' सववत्र ल॑खका'ची मानवी स्वभावाचे निरीक्षण करण्याची' सुक्ष्म दृष्टी दिसून येते" १९ व्या शतकाच्या शेवटची २० वर्षे तल्यारखानाच्या कादंबऱ्यानी असामान्य लोकप्रियता प्राप्त केली. गुजराती कादंबऱ्यांच्या वाचकांत कित्येक वर्षे तल्यारखानाचे नाव अतिशय परिचित व प्रिय झाल होते.
त्याशिवाय त्याने 'काव्यगुटिका अथवा स्थिति-प्रदर्शन' (१९०६) हा कविता- संग्रहही रचला आहे. त्यातील काही कविता शुद्ध गुजरातीत' तर काही' कविता पारसी गुजरातीत लिहिल्या आहेत. पारसी गुजराती म्हणजे पारसी' लोकांनी वापरलेले वाक्यप्रचार जीत अधिक आहेत. अशो भाषा. कवी' सुत्दरमूनी म्हटले आहे को, “त्या काळी' समाजातील वर्गभेदाची इत'की विदारक जोणी'ब कवीने व्यवत' केली' आहे
१८५० ते १८टप५ चा कालखंड : १०९
ही' एक आश्चर्याची गोष्ट आहे. उदाहरणार्थ पुढील ओळी-''हे धनवन्ता, तुला गरीब लोकांच्या दुर्देशेची कशी कल्पना येणार ? त्यांच्या हालअपेष्टा, दु:ख तुला कशी कळणार ? भुकेल्या माणसाचा भुकेचा भडका म्हणजे काय हें तुला अनृुभवाशिवाय कळायचे नाही. भुकेने व्याकुळ झालेल्या मुलांची तू कशाला काळजी करशील ? तग्त माणसाच्या थंडीची तुला काय कल्पना येणार ? तु तर चांगला शाल लपेटून बसला आहेंस.”3६
हरगोविददास दारकादास कांटावाला [ १८४९-१९३२ ]
ह्यांचा जन्म खेडा जिल्ह्यात उमरेठ येथे झाला. साहित्याचे संशोधन व मध्यकालीन साहित्याचे संपादन ह्यांबद्दल ते जास्त प्रसिद्ध आहेत. 'प्राचीत काव्य त्रैमासिक' ह्याच्या ३० अंकांतूुत व 'प्राचीन काव्यमाला' ह्याच्या ३५ अंकांतून हे सवं त्यांनी प्रसिद्ध केळे. ही मासिके बडोदा सरकारतर्फे प्रसिद्ध होत असत. श्री. कांटावाला हें त्या वेळी बडोदा संस्थानात शिक्षणाधिकारी होते. 'प्रेमानंदनां नाटको? व इतर काही' वादग्रस्त ग्रंथही ह्याच मालिकेतुन प्रसिद्ध झाले.
हरगोविददासनी एक कविताही' लिहिली आहे. तिचे नाव 'पानिपत' अथवा 'कुरुक्षेत्र'. त्यानी 'बे बहेनो' आणि अंधेरी तगरीनो गर्देभसेन' ह्या दोन गोष्टी व 'केळवणीनुं शास्त्र अने कला', 'संसार सुधारो' व 'देशी कारीगरीने उत्तेजन' ही तीन पुस्तके लिहिली आहेत. 'पानिपत्त? ह्या कवितेत दिल्लीजवळच्या पानिपत नावाच्या रणक्षेत्रावर झालेल्या कित्येक निर्णायक लढायांचे वर्णन आहे. ह्यांत साहित्यिक गुण फारसे ताहीत; पण त्यात प्रखर देशभक्तीचा उद्रेक दिसून येतो आणि लढाईतील काही प्रसंगांचे जोरदार व उत्साहपुर्ण भाषेत केलेळे वर्गन माढळूत' येते. हरगोविददास हे साहित्यात दैतंदिन व्यवहारातील साध्या व सरळ भाषेचे पुरस्कते होते.
इच्छारास देसाई [ १८५३-१९१२]
इच्छाराम सूर्यराम देसाई ह्यांचा जन्म सुरत येथे झाला. जबाबदारीचे पुण भान असलेला एक श्रेष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ख्याती आहें. मध्यकालीन ग॒जराती कवींच्या हजारो अप्रसिद्ध अशा कविता उजेडात आणून त्या 'बूहत् काव्यदोहन”च्या आठ खंडांत प्रसिद्ध करण्याचे महत् कार्य त्यांनी' केले
दलपतरामने हधापूर्वी * काव्यदोहना'चे दोन खंड तयार केळे होते; पण बऱ्याच वर्षांपूर्वी त्याच्या सवं प्रती खलास झाल्या होत्या व सरकारी आदेशानसार
: ओखाहरण * व “ नलाख्यान ' ह्या प्रेमानंदाच्या आख्यातातील भडक शंगाराचा झग वगळून ते दोन खंड इच्छारामाने पुन्हा प्रसिद्ध केले
११० : गुजराती साहित्याचा इतिहास
१८१८ मध्ये ' स्वतंत्रता! ह्या नावाचे' मासिक प्रसिद्ध वरून त्यांनी अपली पत्रकाराची कारकीर्द सुरू केली. 'स्वतंत्रता' ह्या मासिकाच्या तिसर्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ' आम्हाला राजकीय स्वातंत्र्य द्या! ह्या लेखामुळे इच्छारामला अटक कशूतत त्याच्याव'र राजद्रोहाचा खटला भरण्यात आला; पण त्यात तो तिर्दोषी ठरला व त्याची सुटका करण्यात आली; पण १८८९ मध्ये 'स्वतंतता' मासिक भात्र बंद पडले.
नंतर १८८० च्या जून महिन्याच्या ६ तारखेस इच्छारामने 'गुजराती' ७ हे साप्ताहिक मुंबईहून सुरू केले. नर्मदचे बरेच लेख 'गुजराती'तून प्रसिद्ध झाले. पुढ ते लेख त्याच्याच 'धर्मविचार' ह्या पुस्तकात व मणिलाल द्विवेदींच्या 'नारीप्रतिष्ठा, ह्या पुस्तकात संग्रहित करण्यात आळे. १८८५ मध्ये इंडियन नॅशतल काँग्रेस'ची स्थापना झाल्यातंतर 'गुजराती' हे साप्ताहिक काँग्रेसच्या राजकीय विचारांचा पूरस्कार करणारे पंत्र झाले. गुजरातच्या राजकीय व सांस्कृतिक जीवनावर पुष्कळ वर्षेपर्यंत 'गुजराती'चा फार मोठा प्रभाव होता.
सरकारला अर्थातच 'गुजराती”"चे स्पष्ट व तिर्भीड विचार-दृष्टिकोण सहन होणे किवा त्याकडे लक्ष न देणे शक्यच नव्हते. म्हणून १९१० मध्ये सरकारने 'गुजराती/कडून २५०० रु. चा जामीन मागितला. इच्छारामच्या मनावर हृामुळे मोठा आघात झाल्याने त्याने 'गुजराती”तून आपले अंगच काढन' घेतले, १९१२ मध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मुलगा मणिराम ह्याने 'गुजराती'चे संपादक" पद स्वीकारले व ते १९२९ पर्यंत चालविले. नंतर त्याचे दिवाळे निघाल्यामुळे ते' बंद पडले. इच्छारामने' काही कादंबऱ्याही लिहिल्या आहेत'. त्यांपैकी 'गंगा--एक गुर्जरवार्ता', “हिंद अने ब्रिटानिया” आणि 'चंद्रकांत”- ३ भाग, उल्लेखनीय आहेत. गपांगा-एक गुर्जरवार्ता' (१८८८) ही. एकेकाळी एक चांगल्यापैकी कादंबरी' म्हणून ग्राजली होती. मणिलाल ह्विवेदींती गुजराती' साहित्यातील उत्तम अशा १०० ग्रंथांच्या यादीत' तिचा समावेश केला आहे, हृया कादंबरीचे मराठीत भाषांतर झाले आहे.
“हिंद अने ब्रिटानिया' (१८८६) ह्था कादंबरीत भारत व ब्रिटन ह्यांचा ऐतिहासिक संबंध व॒ ब्रिटिशांची येथील राजवट हयाची चर्चा आहें. काही अँस्लोइंडियन पत्रकारांना त्यात राजद्रोहाचा वास आला व त्यांनी इच्छारामला अटक केली पाहिजे असा आरडाओरडा चालविला; 2८ पण दोन इंग्लिश सद्गूहस्थांनी हें पुस्तक वाचळे व खाजगी रीतीने सरकारला कळविले की, त्यांत राजद्रोह किंवा आक्षेप घेण्याजोगे काहीच नाही. ह्या पुस्तकाचेही मराठीत भाषांतर झाळे आहें. 'चंद्रकान्त' (तीन भाग १८८९, १९०१ व १९०७) ह्या पुस्तकास कादंबरी असे म्हणता येणार नाही. ह्या पुस्तकाचा लरा कर्ता कोण
१८५० ते १८८५ चा कालखंड: १११
ह्याबद्दल वाद चालू होता. काही लोकांनी असे उठविले को, इच्छारामाने ते पृस्तक कोणा वेदान्ती पंडिताकडून लिहवून घेतले. त्यामध्ये आणखी एक घोटाळा म्हणजे हरजीवन केवलराम नावाच्या डाकोरच्या एका हरदासाते तो ग्रंथ आपण स्वतः लिहिला, असा प्रचार चालू केला.3*
खरे पाहता इच्छारामचा मुलगा नटवरलाल ह्याने म्हटल्याप्रमाणे इच्छाराम त्या वेळी इतका कर्जबाजारी झाला होता की कोणाकडूनही ग्रंथ लिहवून घेणे त्याला शक्यच नव्हते. उलट ज्या ज्या वेळी इच्छारामने शास्त्र्यांकडून संस्कृत ग्रंथांची भाषांतरे करवून घेतली त्या प्रत्येक वेळी त्याने त्या त्या ग्रंथांवर अनुवाद करणाऱ्यांची नावे लिहवून प्रसिद्ध केली आहेत. 'चंद्रकान्त' ह्या कादंबरीचा मराठी व हिंदी अनुवाद झालेला आहे. हा समय पुढील साहित्यिकांबद्दलही उल्लेखनीय आहे.
दुर्गाराम मंछाराम दवे [ १८०९-१९७८ ]
दुर्गाराम मंछाराम दवे हा शाळेत शिक्षक असल्यामुळे दुर्गाराम महदेताजी ह्या नावाने प्रख्यात' होता. हा आपल्या दैनंदिनी (डायरी) बहल प्रेसिद्ध आहे. ह्या दैनंदिनीत सुरतेच्या 'मानवधमेसभे'च्या १८४३ ते १८४५ हया वर्षांतील कार्याच्या अहवालाची टिपणे व त्याच्या स्वत:च्या जाहीर जीवनातील कार्याची नोंद केलली आहे." ही दैनंदिनी म्हणजे गुजरातीतील पहिली आत्मचरित्रात्मक टिपणे आहेत. दुर्गारामाने दलपतराम, नमंद व रणछोडभाई गिरधरलाल हृययांच्या पूर्वी गद्यात लिहिण्याची सुरुवात केली. म्हणून ही देनंदिनी म्हणजे चांगल्या चितनात्मक गद्यीलीचा - सर्वात जुना नमुतता म्हणता येईल व' ह्यापासूनच पुढे निबंध कला उदयास आली.
वज्त्रलाल कालिबास शास्त्री [१८२५-१९०३]
हृघांचे नाव भाषाशास्त्राचा पहिला लेखक म्हणून प्रख्यात आहे.
वल्लभजी ह्रिदत्त आचाय [ १८४०-१९११]
ह्याने भगवानलाल इंद्रजीला अशोक शिलालेखाच्या नकला करण्यास मदत केली. त्याचप्रमाणे स्वतः पाटण येथील अनेक शिलालेखांच्या नकलाही केल्या. त्याने इतिहास व पुरातत्त्वविद्ये- (1८18९०1०९५) - चा अभ्यास केला होता. त्याने' *रामायणा'चे समदलोकी गुजराती भाषांतर केळे असा निर्देश केला जातो; पण ते संपूर्ण 'रामायणा'चे भाषांतर होते की, त्यातील फक्त कांही. थोड्या भागांचेच भाषांतर होते हें समजण्यास मार्ग नाही. हें भाषांतर छापून प्रसिद्ध झाळेळे नाही. त्याने काही कविताही लिहिल्या आहेत.
११२ : गुजराती साहित्याचा इतिहास
अंबालाल साकरलाल देपाई [१८४४-१९१४]
ह्यांचे नाव उद्योगधंदे, राजकारण, राज्यकारभार, अथंशास्त्र वगेरे विपयांवर
परिपक्व समतोळ बुद्धीने केलेल्या चर्चेबद्दल प्रसिद्ध आहे. काही बाबतीत ते महात्मा गांधोंचेही पु्वंगामी अहेत. त्यांची 'शांतिदास” (१९००) ही गुजरातीतील पहिली स्वतंत्रपणे रचळेळी लघुकथा आहे, असे' काही तज्ज्ञांचे मत' आहे.
१.
तळटीपा [ भाग १]
ए. के. फॉबस् (१८२१-१८६५) हा स्कॉटलंडचा होता; पण त्यांचा जन्म लंडनला झाला होता. त्यांची 'ईस्ट इंडिया कंपनी'च्या सिव्हिल सव्हिसमध्ये नेमणूक झाली'. म्हणून ते १८४३ साठी मुंबईला आले. १८४६ मध्ये ते असिस्टंट जज्ज म्हणून अह्मदांबादला (गुजरात) आले. त्यांना गुजरात'च्या जुन्या पुरातत्त्वविषयक व ऐतिहासिक अवशेषांमध्ये फार रस होता. त्यांनी इंग्लिशमध्ये 'रासमाला' पुस्तक लिहिले. हे पुस्तक म्हणजे प्राचीन ब मध्य- युगीन गुजरातच्या इतिहासाचा फार महत्त्वाचा पुरावा आहे. त्यांनी 'गुजरात व्हनक््युळर सोसाथटी'ची (आताची गुजरात व्रिद्यासभा) १८४८ मध्ये भहूमदाबाद येथे स्थापना केली. ह्यात त्यांचा हेतू, जुनी गुजराती हस्तलिखिते एकत्र करून ती सांभाळून ठेवणे, तसे'व इंग्लिश भापेतीळ व इतर भोपांतील पुस्तकांची गुजरातीत भाषांतरे करण्याची योग्य व्यवस्था करणे व॒ मूळ गुजरातीतच प्रसिद्ध होणाऱया पुस्तकांना उत्तेजन देणे, हा होता. ज्या लोकांच्यात त्याला थोडे दिवस तरी राहावयाचे होते त्या लोकांच्याबद्दल त्यांच्या मनात गाढ ब खरी सहानुभूती असल्यामुळे त्यांनी गुजराती साहित्याच्या प्रगतीसाठी चिवटपुर्वक काम केले. पुढे त्यांची बदळी सुरत' येथे क्षाली. तेथे त्यांनी सुरत अठ्ठाविसी सोसायटी” स्थापन केली व त्यामार्फत त्यांनी 'गुरत समाचार' हे वर्तमानपत्र गुरू करवले. जेव्हा ते मुंबईला हायकोटं जज्ज म्हणून गेले तेव्हा १८६५ साली स्थापन झालेल्या 'फार्बस् गुजराती सभा” नावाच्या सोसायटीशी त्यांचे नाव जोडले गेळे. सर अँलेब्झ्षांडर फॉर्बंस् १८६१ मध्ये मुंबई युनिव्हसिटीचे व्हाईस चान्सेलर होते. ते १८६५ मध्ये पूणे येथे मृत्यू पावले. 'फॉर्बेस्' या नावाचे 'फॉर्बेस' असे' रूप गुजरातमध्ये एकदा चालू झाले ते कायमचे.
स्मृती'
७9, वि ५,
१०. ११.
१२. १३. १४. १५. १६. १७. शट, १९, २०.
२१. २२. २३.
१८५० ते १८८५ चा कालखंड: ११३
ह्या संस्थेचे १८५६ मध्ये एलफिन्स्टन हायस्कूल व एलफिन्स्टन कॉलेज असे' दोन भाग झाले. ह्या संस्थेचे प्रो. रीड (17२०10) ह्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर असे' ठसविले की त्यांचे स्वतःचे शिक्षण पुर्ण झाल्यावर त्यांनी अशिक्षित लोकांना शिक्षण देण्याचे व आपला समाज सुधारण्याचे कर्तव्य बजावावे. 'ह्या संस्थेच्या दादाभाई नौरोजी, नीं रोजी फारदुनजी, मोहनलाल रणछोडदास झवेरी, महिपतराम रूपराम, करसनदास मूळजी वगैरे विद्या- ्थ्यांनी' आपल्या देशाच्या जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी' बजावली.
आजथी' हुं तारे खोळे छउं.
कृपया पृष्ट ९ पहावे'
'मुंबई समाचार? पहिले गुजराती वर्तमानपत्र, हे पत्र अजूनही चालू आहे. ते पहिल्याने १ जुल, १८२२ मध्ये प्रकाशित झाले.
नर्म-गद्य
नरसिह; दयाराम (कविचरितरास)
'मारी' हकीगत? आणि 'उत्तर नर्मद चरित्र.
"राज्यरंग', 'सुरतती मुख्तेसर ह॒कीकत', मिंवाडनी मुख्तेसर हकीकत.' *राम-जानकी-दर्शन', 'कृष्णाकुमारी,' 'सीता-ह्रण,' 'श्री सार ज्ञाकुन्तल,' 'श्री बालकृष्ण विजय', 'द्रौपदी' दर्शन.'
'दंडियो'चा संपादक म्हणून.
धर्म विचार.
पिंगळ प्रवेश.
अलंकार प्रवेष.
'रस-प्रवेश.
*त्मेकोश” अथवा 'गुजराती शब्दार्थसंग्रह' १८७२३ मध्ये प्रकाशित झाला. नमे-कथा-कोश.
१८५० नंतरचे पद्य व गद्य,
त्यांचा असा विश्वास होता की औषधींचा उपयोग करून हृवी तेव्हा स्फूर्ती आणता येते.
ते स्वतःला एक महान् कवी प्रत्यक्ष 'पेगंबर' देवाचा संदेशवाहक मानीत असत. *याहोम' करीने पडो, फतेह छे आगे.
सज्जन, संभळावजो रे, धीरे धीरे सुधारानो सार-लाखो कौडी पर लाडबो आखो मेल्यि तो मरी जाय : भूको करी भभरावीए तो ते खासी रीतेथी
ग.सा.इ....८
११४ ; गुजराती साहित्याचा इतिहास
२४.
२५. २६,
२७, र्ट, २९, ३०, २३१.
२१२.
३३. ३४.
२५. २६.
खाय, सज्जन, गया शिकारे ऐेरने